शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, पऱ्हे जगवायला तरी पाणी सोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:22 IST

अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे. परंतु नेरला उपसा सिंचन प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : नेरला उपसा सिंचन प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात संताप

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे. परंतु नेरला उपसा सिंचन प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. वारंवार शेतकरी कार्यालयात जाऊन विचारपूस करीत असताना नेमके पाणी कधी मिळणार याची माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नेरला उपसा सिंचन कार्यालयाबद्दल तिव्र संताप व्यक्त होत आहे.अड्याळ परिसरातील सिंचनाची स्थिती बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. एकीकडे पावसाने ओढ दिले आहे तर दुसरीकडे अधिकारी म्हणतात, नेरला उपसा सिंचन सुरु होण्यासाठी पाण्याची २४१.२९ इतकी पातळी आवश्यक आहे.पाण्याची पातळी उंचावल्यास पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्याकडून दिले जता आहे. मात्र निश्चित दिवस सांगीतला जात नसल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे करपू लागले आहेत. तरीदेखील प्रशासनाला जाग येत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी राजेंद्र ब्राम्हणकर यांच्यासह रस्त्यावर उतरुन पाण्यासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे. गोसे धरणाच्या पाण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत. डावा व उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असताना अड्याळ परिसरात मात्र शेतकऱ्यांना पºहे जगविण्यासाठी वारंवार मागणी होत असताना अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या पाणी मागणीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहेत.यापूर्वीच जर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन आवश्यक पाणीसाठा शिल्लक ठेवला असता तर शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळच निर्माण झाली नसती. परंतु अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे शेतकऱ्यांना पऱ्हे जगविण्यासाठी देखील ऐन खरीप हंगामात पाणी मिळण्याची चिन्हे दिसेनासे झाले आहे. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी एकत्र येऊन लवकरात लवकर पाणी न मिळाल्यास जिल्हाधिकाºयांसमवेत पाणी प्रश्नासाठी एक बैठक घेणार असल्याचे सांगितले.उपसासिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्नआता प्रकल्पात पाण्याची पातळी किती दिवसात पूर्ण होणार आहे, याबाबत अधिकाऱ्यांना निश्चित माहिती नाही. त्यामुळे शेकऱ्यांना फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे नेरला उपसा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फक्त दिवास्वप्न ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पाखाली जाऊनही शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न आजही प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्वरित मार्ग काढण्याची मागणी होत आहे.