शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

साहेब, पऱ्हे जगवायला तरी पाणी सोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:22 IST

अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे. परंतु नेरला उपसा सिंचन प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : नेरला उपसा सिंचन प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात संताप

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे. परंतु नेरला उपसा सिंचन प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. वारंवार शेतकरी कार्यालयात जाऊन विचारपूस करीत असताना नेमके पाणी कधी मिळणार याची माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नेरला उपसा सिंचन कार्यालयाबद्दल तिव्र संताप व्यक्त होत आहे.अड्याळ परिसरातील सिंचनाची स्थिती बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. एकीकडे पावसाने ओढ दिले आहे तर दुसरीकडे अधिकारी म्हणतात, नेरला उपसा सिंचन सुरु होण्यासाठी पाण्याची २४१.२९ इतकी पातळी आवश्यक आहे.पाण्याची पातळी उंचावल्यास पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्याकडून दिले जता आहे. मात्र निश्चित दिवस सांगीतला जात नसल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे करपू लागले आहेत. तरीदेखील प्रशासनाला जाग येत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी राजेंद्र ब्राम्हणकर यांच्यासह रस्त्यावर उतरुन पाण्यासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे. गोसे धरणाच्या पाण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत. डावा व उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असताना अड्याळ परिसरात मात्र शेतकऱ्यांना पºहे जगविण्यासाठी वारंवार मागणी होत असताना अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या पाणी मागणीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहेत.यापूर्वीच जर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन आवश्यक पाणीसाठा शिल्लक ठेवला असता तर शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळच निर्माण झाली नसती. परंतु अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे शेतकऱ्यांना पऱ्हे जगविण्यासाठी देखील ऐन खरीप हंगामात पाणी मिळण्याची चिन्हे दिसेनासे झाले आहे. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी एकत्र येऊन लवकरात लवकर पाणी न मिळाल्यास जिल्हाधिकाºयांसमवेत पाणी प्रश्नासाठी एक बैठक घेणार असल्याचे सांगितले.उपसासिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्नआता प्रकल्पात पाण्याची पातळी किती दिवसात पूर्ण होणार आहे, याबाबत अधिकाऱ्यांना निश्चित माहिती नाही. त्यामुळे शेकऱ्यांना फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे नेरला उपसा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फक्त दिवास्वप्न ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पाखाली जाऊनही शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न आजही प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्वरित मार्ग काढण्याची मागणी होत आहे.