शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नदीतील जलवाहिनीत रेतीचा शिरकाव

By admin | Updated: November 2, 2014 22:29 IST

२८ लाख पाण्याची तुमसर शहराला गरज असताना केवळ नऊ लक्ष पाण्याचा पुरवठा एका दिवसाआड करणे सध्या तुमसर पालिकेकडून सुरु आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माडगी

तुमसर : २८ लाख पाण्याची तुमसर शहराला गरज असताना केवळ नऊ लक्ष पाण्याचा पुरवठा एका दिवसाआड करणे सध्या तुमसर पालिकेकडून सुरु आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माडगी पंपगृहाच्या इंटकवेल (जॅकवेल) जोडनलिकेत नदीपात्रातील रेतीचा शिरकाव झाल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाले आहे. येत्या एका आठवड्यात शहराला पूर्ववत पाणीपुरवठा सुरु करण्याकरिता युद्धस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी पत्रपरिषदेत दिली.महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने सुमारे दहा ते बारा वर्षापूर्वी वैनगंगा नदी शेजारी माडगी येथे तुमसर शहराला पाणीपुरवठा करणारे पंपगृह तयार केले होते. पंपगृहापर्यंत इंटकवेल (जोडनलिका) पंपगृहापर्यंत येते या इंटकवेलमध्ये रेतीने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने पंपगृहातील सहा अम्पूलरमध्ये तांत्रीक बिघाड निर्माण झाले. स्टँड बाय पंप पुन्हा लावला. तो केवळ चार ते पाच दिवस सुरु होता. पुन्हा रेतीचा येवा पंपात गेला. त्यामुळे पंपसुद्धा जळला. माडगी नदीपात्रात भरपूर पाणी असल्याने झोन नलिकेतील रेती काढता येत नाही. न.प. प्रशासन, नगरसेवकांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत पंप तात्काळ दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर येथे अ‍ॅम्पूलर दुरुस्तीकरिता पाठविण्यात आले. या अ‍ॅम्पुलरमध्ये मोठा तांत्रीक बिघाड निर्माण झाल्याची माहिती तांत्रिक तज्ज्ञांनी दिली. नगरपरिषदेचे चार कर्मचारी याकरिता सध्या नागपुरात ठाण मांडून बसले आहे. अ‍ॅम्पुरची नवीन डिझायनिंग करणे, मोल्ड करणे, कास्टींग करणे याकरिता दहा ते बारा दिवस लागणार अशी माहिती तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दिली. तुमसर शहराला कोष्टी नदीघाटावरील दुसऱ्या पंपगृहातून सुमारे नऊ लक्ष लिटर पाणी शहराकरिता जमा केले जात आहे. येथे भारनियमनाचा सध्या लटका बसत आहे. त्याकरिता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क सुरु आहे. भारनियमनाची समस्या निकाली निघाली तर १३ लक्ष मिटर पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. कोष्टी येथील पंपगृहात गुजरातमधील अहमदाबाद येथून दि. ४ नोव्हेंबरपर्यंत सबमर्सीबल पंप बोलाविण्यात आले आहे. या पंपाची क्षमता एका तासात १ लक्ष २० हजार लिटर पाणी जमा करण्याची आहे. यामुळे ७० ते ८० टक्के समस्या दूर होईल.शहरात सध्या सुमारे चार हजार नळ जोडणी आहे. यातून वार्षीक पाणी करातून केवळ ५० लक्ष जमा होतात तर या योजनेवर सुमारे १ कोटीचा खर्च येतो. दलित उत्थान योजनेतून दोन मोटार खरेदीचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीकरिता पाठविण्यात आले आहे. या योजनेला मंजुरी मिळाली तर शहराला दोन्ही वेळ पाणी देण्यास मदत होईल. शहरात सुमारे १२ वर्षापासून दिवसातून एकदाच पाणी देण्यात येते. पत्रपरिषदेला नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरेसह उपाध्यक्ष सरोज भुरे, पाणीपुरवठा सभापती प्रशांत उके, नगरसेवक आशिष कुकडे, लक्ष्मीकांत सलामे, दिपक कठाणे तथा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)