शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सिंगल फेज योजना शेतकऱ्यांसाठी जीवघेणी

By admin | Updated: December 13, 2014 01:01 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मोठा गाजावाजा करीत सन २००५ पासून सिंगलफेज विद्युतीकरणाला प्रांरभ केला.

दिघोरी/मोठी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मोठा गाजावाजा करीत सन २००५ पासून सिंगलफेज विद्युतीकरणाला प्रांरभ केला. ही योजना शेतकरी, लघु उद्योजक व सामान्य नागरिकांसाठी खुपच फायदेशीर असल्याची बतावणी करुन लाखांदूर तालुक्यातील काही गावात सिंगलफेज जोडणी सन २००६ मध्ये करण्यात आली. मात्र सदर योजना ही फसवी व निरर्थक असल्याचे जोडणी झाल्यानंतर लगेच कळायला लागल्याने शेतकरी व लघुउद्योजकांची पुरती वाताहत या योजनेमुळे झाली असल्याचे दिसून येते.लाखांदूर तालुक्यातील दिघोरीसह अनेक गावातील नागरीकांनी सिंगल फेज जोडणीला विरोध केला असता वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही योजना अत्यंत लाभदायी असून या योजनेत भारनियमन अजिबात असणार नाही. याशिवाय १६ ते २४ तास सलग थ्रिफेज विद्युत पुरवठा मिळणार असल्याचे सांगितले. मात्र, योजनेत केवळ आठ तासांचे थ्रिफेज विद्युत पुरवठा मिळतो. थ्री फेज विद्युत पुरवठा हा जीवघेणा ठरत आहे. याचे कारण असे की रविवार ते मंगळवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत थ्रीफेज व सिंगलफेज विद्युत पुरवठा पूर्णत: बंद ठेवला जातो. यानंतर गुरुवार ते शनिवार रात्री १२ ते सकाळी ८ वाजतापर्यंत थ्रीफेज पुरवठा होत असतो. यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन रात्रीला मोटारपंप विंचू, साप व हिंस्त्र प्राण्याच्या दशहतीत सुरु करावयास जावे लागते. रात्रीला मोटारपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना आपला जीवसुध्दा गमवावा लागला आहे. मात्र, यांची अजिबात दखल सदर विभाग घेत नसल्याने शेतकऱ्यामध्ये वीज विभागाविरुध्द असंतोष खदखदत आहे.याप्रमाणेच लघुउद्योजक राईस मिल, आॅईल मिल, आटाचक्की, वेल्डींग, वर्कशॉप व विविध लहान उद्योजकांचे उद्योग पार रसातळाला गेलेली आहेत. कुटुंबाचे दोन वेळेचे जेवणाचीसुध्दा व्यवस्था करण्यात सदर उद्योजक कमी पडत असल्याचे दिसून येते. सदर लघु उद्योजकांनी बँकांचे कर्ज घेऊन उद्योग सुरु केला. तो कर्ज कसा फेडावा, असा गंभीर प्रश्न त्यांचे पुढे पडला आहे.दिघोरी/मोठी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान व भाजीपाला पिकांची लागवड केल्या जाते. भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘कणा’ संबोधल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला मात्र स्वत:च्या पाठीचा कणा सरळ ठेवणे कठीण झाले आहे. भाजीपाला पिकाला तूट पाणी द्यावे लागते. जास्त पाणी झाल्यास संपूर्ण पीक नष्ट होते. त्यासाठी स्वत: शेतकरी शेतात राहून काही प्रमाणात पाणी देत असतो. परंतु बुधवार ते शनिवार रात्री १२ वाजता थ्रीफेज विजेचा पुरवठा होत आहे. रात्रीला तुटपाणी कसे द्यावे व द्यायचेच झाल्यास स्वत:चा जीव मुठीत घेऊन पिकाला पाणी देऊन पीक वाचवावे लागते. धान पिकाला पाण्याची सर्वाधीक गरज असते. पाणी देणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाचा पेरा कमी केला आहे.एका बाजूला शासन सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देत आहे तर दुसऱ्या बाजूला दिघोरीत सिंचनाची सोय असुनसुध्दा पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शासनाने ताबडतोब सिंगलफेज योजना बंद करावी, शेतकरी व लघु उद्योजकांना मारक ठरलेली सिंगलफेज योजना बंद करुन सलग १६ ते २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा तसेच लघु उद्योगांसाठी वेगळे फिडर बसवावे अशी मागणी जोर धरत आहे. याशिवाय आजुबाजुच्या ज्या गावात सिंगलफेज योजना नाही तेथे सलग २४ तास थ्रीफेज विद्युत पुरवठा केला जातो मग आम्हीच काय गुन्हा केला? अशा शब्दात येथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली. (वार्ताहर)