शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल फेज योजना शेतकऱ्यांसाठी जीवघेणी

By admin | Updated: December 13, 2014 01:01 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मोठा गाजावाजा करीत सन २००५ पासून सिंगलफेज विद्युतीकरणाला प्रांरभ केला.

दिघोरी/मोठी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मोठा गाजावाजा करीत सन २००५ पासून सिंगलफेज विद्युतीकरणाला प्रांरभ केला. ही योजना शेतकरी, लघु उद्योजक व सामान्य नागरिकांसाठी खुपच फायदेशीर असल्याची बतावणी करुन लाखांदूर तालुक्यातील काही गावात सिंगलफेज जोडणी सन २००६ मध्ये करण्यात आली. मात्र सदर योजना ही फसवी व निरर्थक असल्याचे जोडणी झाल्यानंतर लगेच कळायला लागल्याने शेतकरी व लघुउद्योजकांची पुरती वाताहत या योजनेमुळे झाली असल्याचे दिसून येते.लाखांदूर तालुक्यातील दिघोरीसह अनेक गावातील नागरीकांनी सिंगल फेज जोडणीला विरोध केला असता वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही योजना अत्यंत लाभदायी असून या योजनेत भारनियमन अजिबात असणार नाही. याशिवाय १६ ते २४ तास सलग थ्रिफेज विद्युत पुरवठा मिळणार असल्याचे सांगितले. मात्र, योजनेत केवळ आठ तासांचे थ्रिफेज विद्युत पुरवठा मिळतो. थ्री फेज विद्युत पुरवठा हा जीवघेणा ठरत आहे. याचे कारण असे की रविवार ते मंगळवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत थ्रीफेज व सिंगलफेज विद्युत पुरवठा पूर्णत: बंद ठेवला जातो. यानंतर गुरुवार ते शनिवार रात्री १२ ते सकाळी ८ वाजतापर्यंत थ्रीफेज पुरवठा होत असतो. यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन रात्रीला मोटारपंप विंचू, साप व हिंस्त्र प्राण्याच्या दशहतीत सुरु करावयास जावे लागते. रात्रीला मोटारपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना आपला जीवसुध्दा गमवावा लागला आहे. मात्र, यांची अजिबात दखल सदर विभाग घेत नसल्याने शेतकऱ्यामध्ये वीज विभागाविरुध्द असंतोष खदखदत आहे.याप्रमाणेच लघुउद्योजक राईस मिल, आॅईल मिल, आटाचक्की, वेल्डींग, वर्कशॉप व विविध लहान उद्योजकांचे उद्योग पार रसातळाला गेलेली आहेत. कुटुंबाचे दोन वेळेचे जेवणाचीसुध्दा व्यवस्था करण्यात सदर उद्योजक कमी पडत असल्याचे दिसून येते. सदर लघु उद्योजकांनी बँकांचे कर्ज घेऊन उद्योग सुरु केला. तो कर्ज कसा फेडावा, असा गंभीर प्रश्न त्यांचे पुढे पडला आहे.दिघोरी/मोठी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान व भाजीपाला पिकांची लागवड केल्या जाते. भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘कणा’ संबोधल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला मात्र स्वत:च्या पाठीचा कणा सरळ ठेवणे कठीण झाले आहे. भाजीपाला पिकाला तूट पाणी द्यावे लागते. जास्त पाणी झाल्यास संपूर्ण पीक नष्ट होते. त्यासाठी स्वत: शेतकरी शेतात राहून काही प्रमाणात पाणी देत असतो. परंतु बुधवार ते शनिवार रात्री १२ वाजता थ्रीफेज विजेचा पुरवठा होत आहे. रात्रीला तुटपाणी कसे द्यावे व द्यायचेच झाल्यास स्वत:चा जीव मुठीत घेऊन पिकाला पाणी देऊन पीक वाचवावे लागते. धान पिकाला पाण्याची सर्वाधीक गरज असते. पाणी देणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाचा पेरा कमी केला आहे.एका बाजूला शासन सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देत आहे तर दुसऱ्या बाजूला दिघोरीत सिंचनाची सोय असुनसुध्दा पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शासनाने ताबडतोब सिंगलफेज योजना बंद करावी, शेतकरी व लघु उद्योजकांना मारक ठरलेली सिंगलफेज योजना बंद करुन सलग १६ ते २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा तसेच लघु उद्योगांसाठी वेगळे फिडर बसवावे अशी मागणी जोर धरत आहे. याशिवाय आजुबाजुच्या ज्या गावात सिंगलफेज योजना नाही तेथे सलग २४ तास थ्रीफेज विद्युत पुरवठा केला जातो मग आम्हीच काय गुन्हा केला? अशा शब्दात येथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली. (वार्ताहर)