शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सक्करधरात ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST

चुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वतरांगांच्या घनदाट जंगलाशेजारी असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात सौरऊर्जेवरील आधारित दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक ...

चुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वतरांगांच्या घनदाट जंगलाशेजारी असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात सौरऊर्जेवरील आधारित दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड आल्याने गावकऱ्यांवर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. गावात पाण्याचे अन्य स्रोत नसल्याने नदीतील गढूळ पाण्याचा उपयोग गावकरी करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

गट ग्रामपंचायत असणाऱ्या सक्करधरा गावातील आदिवासी बांधवांचे जिणे उपेक्षित आहे. बावणथडी नदीच्या काठावरील १५० ते २०० लोकवस्तीचे सक्करधरा गाव. गावात तसाही रोजगाराचा अभाव आहे. गट ग्रामपंचायत अंतर्गत गावांच्या विकासकार्याचा अजेंडा १६ किलोमीटर अंतरावरून राबविला जात आहे. धुटेरा गावातून विकासकार्य केले जात आहे. या गावाला एक ग्रामपंचायत सदस्य पद मिळाले आहे. शंभर टक्के आदिवासी असणाऱ्या या गावात नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. गावात रोजगार नसल्याने मोहफूल दारूविक्री घराघरांत करायची. नंतर मुले शिक्षित झाल्याने या व्यवसायापासून गावकरी दुरावले आहेत. गावात रोजगार नसल्याने दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीवर मजूर म्हणून कामे करीत आहेत. या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने संघर्ष निर्माण केला आहे. यानंतर गावात नाले, सिमेंट रस्ते पोहोचले आहेत. घरकुले पोहोचली आहेत. रापणी बस पोहोचली आहे. गाव चकाचक झाला आहे. परंतु यंत्रणेने रोजगार पोहोचविले नाही, अशी खंत गावकऱ्यांत आहे.

गावात चार बोअरवेल्स तयार करण्यात आल्या आहेत. त्या चारही बंद झाल्या आहेत. नदीच्या काठावर गाव असतानाही बोअरवेल्स यशस्वी झाल्या नाहीत. यानंतर गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी सौरऊर्जेवरील आधारित दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. माजी सदस्य संजय सरोते यांच्या घराशेजारी नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. गत अनेक दिवसांपासून ती बंद आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात अन्य स्रोत नाहीत. दीड किलोमीटर अंतरावरील नदीपात्रातून पाणी आणावे लागत आहे. गढूळ पाणी नदीपात्रात असताना नाइलाज आहे. दूषित पाण्यामुळे गावकरी आजाराने भयभीत आहेत. गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी यंत्रणा धावत येत नाही. यामुळे गावात समस्या जैसे थे आहेत.

बॉक्स

वन विभागावर आदिवासींचा रोष

संरक्षित जंगलाशेजारी आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. जंगलात रोपे लागवड, खड्डे खोदकाम, नालीचे खोदकाम, खुंट कटाईची कामे केली जात आहेत. परंतु वन विभागाची यंत्रणा गावकऱ्यांना रोजगार देण्याचे प्रयत्न करीत नाही. वर्षभर कामे देण्याची क्षमता वन विभागाकडे आहे; परंतु आदिवासी बांधवांना ठेंगा दाखविला जात आहे. खावटी वाटपात भेदभाव केला जात आहे. आदिवासी बांधवांना न्याय देण्याचे प्रयत्न होत नाहीत. मोठ्या बाता हाकल्या जातात. यामुळे गावातील आदिवासी उपेक्षित आहेत. गावात कधी यंत्रणा येत नाही. ग्रामसेवक योजनेचा पिटारा घेऊन येत नाही. निम्म्याहून अनेक लोकांना सरपंच, सचिव माहीत नाहीत. गावात चावडी वाचन कधी झाले नाही. धुटेरा, हमेशा, मल्लालटोला, घानोड, सक्करधरा अशी गावे जोडण्यात आली असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या असे चित्र गावात आहे.

कोट

गावात सौरऊर्जेवरील नळयोजना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. निवेदन व तक्रारी केल्या आहेत. गावकरी नदीतील गढूळ पाण्याचा उपयोग करीत असल्याने आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले पाहिजे.

संजय सरोदे, माजी सदस्य, ग्रामपंचायत धुटेरा