शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

लिंगभेदाच्या भावनेत पोटातच कुस्करतात ‘कळ्या’ !

By admin | Updated: March 8, 2016 00:26 IST

नवऱ्याला मुलगी नको असते, ती लिंगभेदाच्या भावनेने. पण त्या होणाऱ्या मुलीच्या आईला मुलगी नको असते...

आज जागतिक महिला दिन : महिलांच्या अवस्थेबाबत चिंतनाची गरजप्रशांत देसाई भंडारानवऱ्याला मुलगी नको असते, ती लिंगभेदाच्या भावनेने. पण त्या होणाऱ्या मुलीच्या आईला मुलगी नको असते ती निरूपाय म्हणून. मुलगी म्हणून किंवा बाई म्हणून आपण काय भोगत आहोत हे तिला अनुभवाने माहीत असते. म्हणून असे भोग भोगणारा एक जीव जन्माला न घातलेलाच बरा, अशी तिची अगतिकतेची भावना असते. परंतु असे असले तरी आपण मुलीला जन्म देऊ आणि या समाजातल्या दुय्यम वागणुकीशी टक्कर देऊन सन्मानाने जगायला तिला शिकवू, परंतु कोणत्याही परिस्थितीत तिला जन्म देऊ असा तिचाही निर्धार नसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात भारतामध्ये कोट्यवधी स्त्री अर्भक (कळ्या) पोटातच खुडल्या गेल्या असतानाही डॉक्टरला शिक्षा झाल्याचे प्रमाण बोटावर मोजण्या इतकेच आहे.आज जागतिक महिला दिन पाळला जात आहे. या निमित्ताने महिलांची स्थिती, त्यांची प्रगती आणि त्यांच्या विषयी समाजात असलेला दुजाभाव याच्या निमित्ताने काही चिंतन व्हावे, अशी आज अपेक्षा असते. जगाची किंवा देशाची लोकसंख्या मोजलीच तर साधारणपणे लोकसंख्येचा ५० टक्के भाग महिलांचा असतो हे तर उघडच आहे. परंतु समाजामध्ये लिंगभेदाची भावना एवढी प्रबळ असते की, लोकसंख्येच्या ५० टक्के असून सुद्धा महिलांची अवस्था वाईटच असते आणि एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या महिलांच्या अवस्थेचा विचार करण्यासाठी वर्षातून केवळ एक दिवस पाळला जातो. वास्तविक पाहता वर्षातले ३६५ दिवस महिला दिनच पाळला पाहिजे आणि महिलांच्या अवस्थेविषयी समाजात सातत्याने चिंतन केले गेले पाहिजे. पण तसे होत नाही आणि केवळ महिला दिन पाळून फारसे काही साध्य होत नाही. कारण महिलांविषयीची हिणकस भावना आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेली असते. लिंगभेदामुळे महिलांच्या वागण्याला, बोलण्याला, प्रगती करण्याला आणि पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर काम करण्याच्या तयारीला खूप मर्यादा येत असतात. स्त्री-पुरुष समानता पाळण्याचे कितीही निश्चय केले तरी या मर्यादा काही संपत नाहीत. त्यामुळेच या मर्यादांचे भान ठेवूनच महिलांच्या स्थितीचा विचार केला जात असतो. असे असूनही अनेक महिलांनी काही क्षेत्रामध्ये पुरूषांनाही मागे टाकून खऱ्या अर्थाने पुरूषार्थ घडवलेला आहे. पण तरी सुद्धा महिलांना समान अधिकार देण्यास पुरूष तयार नसतात. प्रत्यक्षातल्या व्यवहारामध्ये पुरूष महिलांना समान लेखायला आणि त्यांना तशी वागणूक द्यायला सहजासहजी तयार होत नाहीत. त्यामुळे मुख्य प्रश्न मनोवृत्तीचा आहे. महिलांच्या संदर्भात विचार करताना एक दुर्दैवी वस्तुस्थिती फारच ठळकपणे जाणवत असते आणि ती म्हणजे महिलांची अवनत अवस्था आणि त्यांचे गौण स्थान यांना पुरूषांइतक्या स्त्रियाच जबाबदार असतात. अलिकडच्या काळामध्ये स्त्री आणि पुरूष या दोघांच्याही मनातल्या या गौण स्थितीसंबंधीच्या भावनेमुळे लोकसंख्येतले मुलींचे प्रमाण कसे कमी होत चाललेले आहे याची आकडेवारी तर आपण नित्त्यच वाचत असतो. गेल्या काही वर्षापासून लग्नाच्या बाजारातली स्थिती बदलली आहे. पूर्वी मुलींच्या बापाला वर संशोधनासाठी भटकावे लागत असे. परंतु आता मुलांचे बाप वधू संशोधनासाठी भटकायला लागले आहेत. विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या काही सोयींचा गैरवापर केल्यामुळे समाजातल्या श्रीमंत आणि सुशिक्षित लोकांमध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे. समाजातली एक विसंगती अशी की, ज्या लोकांपर्यंत वैद्यकीय व्यवसायातल्या त्या आधुनिक सोयी पोचलेल्या नाहीत त्या गरीब आणि अशिक्षित वर्गामध्ये मात्र ही विसंगती आढळत नाही. संख्या कमी मात्र प्रथा सुरूचसुशिक्षित वर्गालाच मुलीच्या हुंड्याची जास्त काळजी आहे. मग यांना सुशिक्षित का आणि कसे म्हणावे, असा प्रश्नच पडतो. मुली कमी असल्या तरी अजूनही मुलीच्या बापाने मुलाच्या बापाला हुंडा दिला पाहिजे, हा आग्रह कायमच आहे. मुलाचा बाप गरजू असला तरी मुलीच्या बापानेच हुंडा दिला पाहिजे अशा या आग्रहातूनही या बदलत्या स्थितीत सुद्धा मुलीलाच गौण मानण्याची प्रथा कशी जारी आहे, हे लक्षात येते.पुरूषांची मनोवृत्ती बदलणे गरजेचेअनेक कार्यालयांमधून महिला अधिकारी आणि पुरूष शिपाई असतात. मात्र या शिपायांना आपण एका महिलेच्या हाताखाली काम करतोय याची एक वेगळी खंत वाटत असतेच. महिला कितीही सुधारल्या तरी त्या शेवटी महिलाच आणि बायकांना मुळात अक्कलच कमी असते, असा पुरुषांचा सरसकट समज असतो. ही पुरूषी मनोवृत्ती जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत समाजातला महिलांचा सन्मान कधी वाढणार नाही.