शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बीज गुणन केंद्र अंधारात

By admin | Updated: July 14, 2014 23:47 IST

भंडारा तालुक्यातील पहेला येथे तालुका बीज गुणन केंद्र आहे. या केंद्रात शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करून शेती कशी करावी, कोणते खत किती वापरावे, उत्पन्न कसे वाढवावे इत्यादी विषयावर

६५ एकर क्षेत्र पडीत : दोन वर्षांपासून मजूर मजुरीपासून वंचितपहेला : भंडारा तालुक्यातील पहेला येथे तालुका बीज गुणन केंद्र आहे. या केंद्रात शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करून शेती कशी करावी, कोणते खत किती वापरावे, उत्पन्न कसे वाढवावे इत्यादी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. परंतु ुत्यांच्याच विभागाची पहेला येथे असलेली ६५ एकर शेती दोन वर्षापासून पडीत ठेवत आहेत. एकूणच बीज गुणन केंद्राचा दिव्याखाली अंधार असाच प्रकार सुरु आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रकल्प या गुणन केंद्रात कार्यान्वित झालेल्या नाही. परिणामी सदर बीज गुणन केंद्र शोभेची वास्तू ठरत आहे.येथे ६५ एकरांचा शेतीचा ओलिताखाली भूखंड आहे. यात धान मळणी यंत्र, गांढूळ खत प्रकल्प, ट्रॅक्टर, थ्रेशर असे अनेक प्रकल्प आहेत. परंतु कृषी विभागाच्या गलथान कारभाराने येथे बारमाही व रोवणी करणारे, निंदा काढणारे, धान कापणारे व इतरही काम करणारे मजुरांना दोन वर्षापासून मजुरी मिळाली नाही .ट्रॅक्टरचे भाडे मिळत नाही. त्यामुळे या तालुका बीज गुणन कृषी केंद्रात काम करायला मजूर मिळत नाही. त्यामुळे दोन वर्षापासून ६५ एकर शेती शासनाला पडीत ठेवावी लागते. ६५ एकर शेतीमध्ये गेल्या दोन वर्षापासून आणि यावर्षीही कोणत्याही प्रकारची पेरणी करण्यात आलेली नाही. जिकडे तिकडे गवत उगवले आहे. त्यामुळे पहेला येथील सर्व गुरे या बीज गुणन कृषी केंद्रात दिवसभर फिरत दिसतात. एकंदरीत हे केंद्र गुरे चारण्याचे साधन ठरत आहे. पूर्वी या केंद्रात ६५ एकर शेतीला लोखंडी अँगलचा तारेचा कंपाऊंड होता. परंतु दोन वर्षात अनेक चोरट्यांनी येथील कंपाऊंडचे लोखंडी अँगल कापून नेले. परंतु कृषी विभागाने याची साधी दखल घेतली नाही. उलट यावर्षी सिमेंट खांबाचे कंपाउंड करण्याचे काम सुरु केले. पडीत शेतीला कंपाउंड करण्यापेक्षा आधी मजुरांचे वेतन दिले असते तर यावेळी मजूर पुन्हा कामावर आले असते. परंतु मजुरांची मजुरी देऊन अधिकाऱ्यांना पैसे मिळाले नसते. त्यामुळेच सिमेंट खांबाचे कंपाउंडचे काम सुरु केले व शेती पडीत ठेवली.याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या केंद्रात असलेल्या झाडांचीही पडक्या भावात विक्री करण्यात आल्याची चर्चा आहे. या कृषी केंद्रातील सर्वच कामे आलबेल असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसत असली तरी चित्र मात्र वेगळेच आहे.विविध समस्याने ग्रासलेल्या या तालुका बीज गुणन केंद्राकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे आणि ६५ एकर शेतीशासनामार्फत जर करीत नसतील तिचे तुकडे पाच पाच एकर शेती ठेक्याने द्यावे अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)