शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

लाखांदूर तालुक्यात बियाणे कंपन्यांचे जाहिरात युद्ध

By admin | Updated: May 23, 2016 00:38 IST

लाखांदूर तालुक्यात रबी हंगामातील शेतीची कामे संपत नाही तोच खरीप हंगामाच्या पीक लागवडीसाठी विविध बी-बियाणे कंपनी ...

खरीपासाठी कंपन्यांची तयारी : बोगस बियाणे निघाल्यास कंपन्यांचे वर हात, विक्रेत्यांकडून विविध प्रकारचे आमिष प्रमोद प्रधान लाखांदूरलाखांदूर तालुक्यात रबी हंगामातील शेतीची कामे संपत नाही तोच खरीप हंगामाच्या पीक लागवडीसाठी विविध बी-बियाणे कंपनी विक्रेत्यांनी ग्रामीण भागातून आकर्षक जाहिरातींचा भडीमार शेतकऱ्यांवर सुरू केला. एकदा नामांकीत कंपनीचे विकलेले बियाणे बोगस निघाल्यानंतर वरहात करतात. यामुळे बळीराजा मात्र आर्थिक तोटा सहन करित आपली फसगत झाल्याचे मान्य करुन कपाळावर हात ठेवतो. मोजता येईना ईतक्या बियाणांच्या कंपण्यांनी उत्पन्न वाढीचे आमिष देत तालुक्यात धुडगूस घातला. धान, तूर, सोयाबीन या पिकांच्या बियाण्यांची जाहिरात करताना कमी दिवसांत येणारे वाण, अत्यल्प प्रमाणात व कमी दिवसांत येणारे वाण, कमी पावसावर येणारे वाण, भरघोस उत्पादन देणारे वाण, सर्वाधिक बाजारभाव मिळवून देणारे वाण केवळ आमच्याच कंपनीने विकसित केले आहे, असा दावा बियाणे कंपन्या करीत आहेत. काही बियाणे निर्मिती कंपन्या तर भारूड, पथनाट्य, विनोद अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून गावागावांतून हजारोंची गर्दी खेचत आहे. धानासारख्या वाणाची जोरदार जाहिरात केली जात आहे. शेतकऱ्यांचे कर्ज, अनियमित पाऊस यामुळे झालेली वाताहत, दुष्काळ बाजारभाव, अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आत्मियतेने बोलत शेतकऱ्यांच्या भावनेला हात घातला जात आहे. आपल्या कंपनीने तयार केलेल्या बियाण्यांची लागवड केल्यास शेतात सोनेच पिकेल. तुम्ही कर्जमुक्त व्हाल, असा विश्वास शेतकऱ्यांवर लादत शेतकऱ्यांना चांगलीच भुरळ पाडत आहेत. आकर्षक फलकाने सजविलेल्या वाहनातून बियाण्यांची जाहिरात बियाणे कंपनीकडून केली जात आहे. मुख्य रस्त्यावरचे दिशादर्शक फलक तर कंपन्याच्या जाहिरातीने बुजून गेले आहेत. शासकीय फलक सुद्धा कंपन्यांना जाहिरातीकरिता कमी गेले आहेत. औषधी बी-बियाणे यांच्या अवाजवी किमती लावून जाहिरात तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशाची लूट करीत आहेत. आकर्षक तंत्र वापरून तयार केलेले पोस्टर्स गावागावांत लावले जात आहे. याला कार्यक्रमातून आमच्याच कंपनीचे बियाणे किती फायद्याचे आहे, हे पटवून देण्यात येत आहे.या विविध कंपन्यांच्या मोहक जाहिरातीला बळी पडून कर्जाचे डोंगर उचलून बळीराजा पारंपारीक बी - बियाणांकडे पाठ फिरवतो व महागडे बियाणे विकत घेतो. मात्र त्याच महागड्या बियाणांची उगवण क्षमता वेळेवर दिसत नसल्याने जेव्हा बळीराजा कंपनीकडे दाद मागतो, तेव्हा तेच कंपणीवाले बळीराजावर वरचढ होवून शास्त्रशुद्ध पध्दतीने शेती न केल्याचा उलट आरोप करतात. तशाही परीस्थीतीत शेतकरी धानाची रोवणी आटोपतो. परंतु धान पिकाची जेव्हा गर्भावस्थेत वाईट परिस्थिती असते व एकुणच उत्पादनाची टक्केवारी निम्यावर येते, तेव्हा मात्र शेतकरी रडकुंडीवर येउन फसगत झाल्याचे मान्य करतो. या वेळी शेतकऱ्यांची ऐकुण घेणारा कुणीही नसतो. मग नामांकीत कंपन्यांचे बियाणे ब्रॉण्डेड कसे असा प्रश्न आपसुकच निर्माण होतो. मागील वर्षी शेतकऱ्यांच्या बियाणांच्या बाबतीत अनेक बोंबा होत्या मात्र तो विषय कुणीही गांभीयार्ने हाताळला नाही.महागड्या बियाण्यांच्या जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्चबियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्या आपल्या मालाचा सर्वाधिक खप घेण्यासाठी जाहिरातीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च करतात. गावागावांतील कृषी केंद्रधारकांना आकर्षक सवलती देऊन अँडव्हान्स बुकिंग केली जाते. सरासरी व सर्वाधिक खप करणाऱ्या डिलरला विविध आकर्षक बक्षिसे, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पर्यटनस्थळांच्या सहली कधी देशात तर कधी विदेशातही विमान प्रवास दिला जात आहेकृषी विभागाच्या भरारी पथकांची भूमिका संशयास्पदतालुक्यातील सर्व परवानाधारक कृषि केंद्रावर तालुका कृषि विभाग व पंचायत समिती कृषि विभागाच्या संगातमताने भरारी पथक तयार करुन बियाणे, औषधी, रासायनिक खते खरेदी व विक्रीवर तसेच त्यांची गुणवत्ता बरोवर आहे की नाही, या सर्व बाबी तपासण्याचे अधिकार असतात. मग हे सर्व असताना बळीराजाची फसगत कशी काय होते, बोगस बियाणे निघाल्यास शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण होतो. कृषी विभागाच्या भरारी पथकाची भूमीका संशयास्पद असल्याने हा सर्व प्रकार पडद्याआड केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो. यंदाच्या खरीप हंगामात तरी भरारी पथक आपली भूमीका प्रामाणीकपणे पार पाडणार काय ? असा प्रश्न उपस्थीत करुन शेतकऱ्यांची होणारी फसगत थांबेल का म्हणून लक्ष आहे.