शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यात बियाणे कंपन्यांचे जाहिरात युद्ध

By admin | Updated: May 23, 2016 00:38 IST

लाखांदूर तालुक्यात रबी हंगामातील शेतीची कामे संपत नाही तोच खरीप हंगामाच्या पीक लागवडीसाठी विविध बी-बियाणे कंपनी ...

खरीपासाठी कंपन्यांची तयारी : बोगस बियाणे निघाल्यास कंपन्यांचे वर हात, विक्रेत्यांकडून विविध प्रकारचे आमिष प्रमोद प्रधान लाखांदूरलाखांदूर तालुक्यात रबी हंगामातील शेतीची कामे संपत नाही तोच खरीप हंगामाच्या पीक लागवडीसाठी विविध बी-बियाणे कंपनी विक्रेत्यांनी ग्रामीण भागातून आकर्षक जाहिरातींचा भडीमार शेतकऱ्यांवर सुरू केला. एकदा नामांकीत कंपनीचे विकलेले बियाणे बोगस निघाल्यानंतर वरहात करतात. यामुळे बळीराजा मात्र आर्थिक तोटा सहन करित आपली फसगत झाल्याचे मान्य करुन कपाळावर हात ठेवतो. मोजता येईना ईतक्या बियाणांच्या कंपण्यांनी उत्पन्न वाढीचे आमिष देत तालुक्यात धुडगूस घातला. धान, तूर, सोयाबीन या पिकांच्या बियाण्यांची जाहिरात करताना कमी दिवसांत येणारे वाण, अत्यल्प प्रमाणात व कमी दिवसांत येणारे वाण, कमी पावसावर येणारे वाण, भरघोस उत्पादन देणारे वाण, सर्वाधिक बाजारभाव मिळवून देणारे वाण केवळ आमच्याच कंपनीने विकसित केले आहे, असा दावा बियाणे कंपन्या करीत आहेत. काही बियाणे निर्मिती कंपन्या तर भारूड, पथनाट्य, विनोद अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून गावागावांतून हजारोंची गर्दी खेचत आहे. धानासारख्या वाणाची जोरदार जाहिरात केली जात आहे. शेतकऱ्यांचे कर्ज, अनियमित पाऊस यामुळे झालेली वाताहत, दुष्काळ बाजारभाव, अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आत्मियतेने बोलत शेतकऱ्यांच्या भावनेला हात घातला जात आहे. आपल्या कंपनीने तयार केलेल्या बियाण्यांची लागवड केल्यास शेतात सोनेच पिकेल. तुम्ही कर्जमुक्त व्हाल, असा विश्वास शेतकऱ्यांवर लादत शेतकऱ्यांना चांगलीच भुरळ पाडत आहेत. आकर्षक फलकाने सजविलेल्या वाहनातून बियाण्यांची जाहिरात बियाणे कंपनीकडून केली जात आहे. मुख्य रस्त्यावरचे दिशादर्शक फलक तर कंपन्याच्या जाहिरातीने बुजून गेले आहेत. शासकीय फलक सुद्धा कंपन्यांना जाहिरातीकरिता कमी गेले आहेत. औषधी बी-बियाणे यांच्या अवाजवी किमती लावून जाहिरात तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशाची लूट करीत आहेत. आकर्षक तंत्र वापरून तयार केलेले पोस्टर्स गावागावांत लावले जात आहे. याला कार्यक्रमातून आमच्याच कंपनीचे बियाणे किती फायद्याचे आहे, हे पटवून देण्यात येत आहे.या विविध कंपन्यांच्या मोहक जाहिरातीला बळी पडून कर्जाचे डोंगर उचलून बळीराजा पारंपारीक बी - बियाणांकडे पाठ फिरवतो व महागडे बियाणे विकत घेतो. मात्र त्याच महागड्या बियाणांची उगवण क्षमता वेळेवर दिसत नसल्याने जेव्हा बळीराजा कंपनीकडे दाद मागतो, तेव्हा तेच कंपणीवाले बळीराजावर वरचढ होवून शास्त्रशुद्ध पध्दतीने शेती न केल्याचा उलट आरोप करतात. तशाही परीस्थीतीत शेतकरी धानाची रोवणी आटोपतो. परंतु धान पिकाची जेव्हा गर्भावस्थेत वाईट परिस्थिती असते व एकुणच उत्पादनाची टक्केवारी निम्यावर येते, तेव्हा मात्र शेतकरी रडकुंडीवर येउन फसगत झाल्याचे मान्य करतो. या वेळी शेतकऱ्यांची ऐकुण घेणारा कुणीही नसतो. मग नामांकीत कंपन्यांचे बियाणे ब्रॉण्डेड कसे असा प्रश्न आपसुकच निर्माण होतो. मागील वर्षी शेतकऱ्यांच्या बियाणांच्या बाबतीत अनेक बोंबा होत्या मात्र तो विषय कुणीही गांभीयार्ने हाताळला नाही.महागड्या बियाण्यांच्या जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्चबियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्या आपल्या मालाचा सर्वाधिक खप घेण्यासाठी जाहिरातीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च करतात. गावागावांतील कृषी केंद्रधारकांना आकर्षक सवलती देऊन अँडव्हान्स बुकिंग केली जाते. सरासरी व सर्वाधिक खप करणाऱ्या डिलरला विविध आकर्षक बक्षिसे, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पर्यटनस्थळांच्या सहली कधी देशात तर कधी विदेशातही विमान प्रवास दिला जात आहेकृषी विभागाच्या भरारी पथकांची भूमिका संशयास्पदतालुक्यातील सर्व परवानाधारक कृषि केंद्रावर तालुका कृषि विभाग व पंचायत समिती कृषि विभागाच्या संगातमताने भरारी पथक तयार करुन बियाणे, औषधी, रासायनिक खते खरेदी व विक्रीवर तसेच त्यांची गुणवत्ता बरोवर आहे की नाही, या सर्व बाबी तपासण्याचे अधिकार असतात. मग हे सर्व असताना बळीराजाची फसगत कशी काय होते, बोगस बियाणे निघाल्यास शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण होतो. कृषी विभागाच्या भरारी पथकाची भूमीका संशयास्पद असल्याने हा सर्व प्रकार पडद्याआड केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो. यंदाच्या खरीप हंगामात तरी भरारी पथक आपली भूमीका प्रामाणीकपणे पार पाडणार काय ? असा प्रश्न उपस्थीत करुन शेतकऱ्यांची होणारी फसगत थांबेल का म्हणून लक्ष आहे.