शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षीही वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST

भंडारा : आषाढी वारी म्हटले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांची पावले आपसुकच पंढरपूरच्या दिशेने पडतात. वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी ...

भंडारा : आषाढी वारी म्हटले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांची पावले आपसुकच पंढरपूरच्या दिशेने पडतात. वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी वर्षभर चातकाप्रमाणे वाट पाहतात. भंडारा जिल्ह्यातूनही शेकडो वारकरी पंढरीला जातात. मात्र गतवर्षी पहिल्यांदाच कोरोनामुळे परंपरा खंडित झाली. यंदा तरी पंढरपूरला जाण्याची संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र शासन मोजक्याच पालखी, दिंड्या, निवडक ४०० वारकऱ्यांनाच पंढरीत प्रवेश देणार असल्याने जिल्ह्यातील वारकऱ्यांची निराशा झाली आहे.

पंढरपुरात संचारबंदी लागू केली असून, शहरात पोलीस बंदोबस्त केला आहे; मात्र राज्यातील लाखो वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन ऑनलाईन तरी घेता यावे म्हणून मंदिर संस्थानने ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे. वारीची सर ऑनलाईन दर्शनाला येत नाही, अशी भावना वारकऱ्यांनी बोलून दाखविली. मंगळवारी आषाढी वारीचा सोहळा पंढरपुरात प्रतिकात्मक पद्धतीने निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी अनेक जिल्ह्यातील प्रत्येक वयोगटातील वारकरी आपल्या जिवाची पर्वा न करता सामील होतात. काही झाले, तरी आपल्याला आपल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन होणार, हा आनंदच वारकऱ्यांना सुख देणारा असतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे भंडारा जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या मनात हुरहूर आहे.

बॉक्स

डोळ्यांचे पारणे फेडणारा वाखरीचा रिंगण सोहळा

पंढरीची वारी म्हणजे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा आहे. वारी ही अनेक वर्षांपासून चालत आलेली एक परंपरा आहे. राज्यातील वारकरी मंडळींनी वारीचा वसा अनेक पिढ्यांपासून चालवला आहे. पंढरपूरची वारी अनुभवण्यासाठी अनेक वारकरी पायीच प्रस्थान करतात. वाखरीचा मुक्काम म्हणजे लाखो वारकऱ्यांसाठी जणूकाही महाकुंभमेळावाच असतो. वारकऱ्यांच्या उत्साहात हा वाखरीचा रिंगण सोहळा पार पडतो. हा रिंगण सोहळा वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

कोट

पांडुरंगाकडे आमची एकच मागणी आहे. कोरोनाचे संकट दूर होऊन पंढरपूरची वारी पुन्हा एकदा चालू होऊ दे. आषाढी वारीचा आनंद आम्हाला परत मिळू दे. जशी सासूरवाशीण सून आपल्या माहेरी येताच सुखाची शांत झोप येते, तीच अवस्था पंढरपूरला पोहोचताच वारकऱ्यांच्या मनाची होते. वारीचा आनंद आम्हा वारकऱ्यांना लवकरच अनुभवायला मिळू दे.

फटिंग महाराज, जवाहरनगर