शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षीही वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST

भंडारा : आषाढी वारी म्हटले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांची पावले आपसुकच पंढरपूरच्या दिशेने पडतात. वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी ...

भंडारा : आषाढी वारी म्हटले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांची पावले आपसुकच पंढरपूरच्या दिशेने पडतात. वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी वर्षभर चातकाप्रमाणे वाट पाहतात. भंडारा जिल्ह्यातूनही शेकडो वारकरी पंढरीला जातात. मात्र गतवर्षी पहिल्यांदाच कोरोनामुळे परंपरा खंडित झाली. यंदा तरी पंढरपूरला जाण्याची संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र शासन मोजक्याच पालखी, दिंड्या, निवडक ४०० वारकऱ्यांनाच पंढरीत प्रवेश देणार असल्याने जिल्ह्यातील वारकऱ्यांची निराशा झाली आहे.

पंढरपुरात संचारबंदी लागू केली असून, शहरात पोलीस बंदोबस्त केला आहे; मात्र राज्यातील लाखो वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन ऑनलाईन तरी घेता यावे म्हणून मंदिर संस्थानने ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे. वारीची सर ऑनलाईन दर्शनाला येत नाही, अशी भावना वारकऱ्यांनी बोलून दाखविली. मंगळवारी आषाढी वारीचा सोहळा पंढरपुरात प्रतिकात्मक पद्धतीने निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी अनेक जिल्ह्यातील प्रत्येक वयोगटातील वारकरी आपल्या जिवाची पर्वा न करता सामील होतात. काही झाले, तरी आपल्याला आपल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन होणार, हा आनंदच वारकऱ्यांना सुख देणारा असतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे भंडारा जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या मनात हुरहूर आहे.

बॉक्स

डोळ्यांचे पारणे फेडणारा वाखरीचा रिंगण सोहळा

पंढरीची वारी म्हणजे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा आहे. वारी ही अनेक वर्षांपासून चालत आलेली एक परंपरा आहे. राज्यातील वारकरी मंडळींनी वारीचा वसा अनेक पिढ्यांपासून चालवला आहे. पंढरपूरची वारी अनुभवण्यासाठी अनेक वारकरी पायीच प्रस्थान करतात. वाखरीचा मुक्काम म्हणजे लाखो वारकऱ्यांसाठी जणूकाही महाकुंभमेळावाच असतो. वारकऱ्यांच्या उत्साहात हा वाखरीचा रिंगण सोहळा पार पडतो. हा रिंगण सोहळा वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

कोट

पांडुरंगाकडे आमची एकच मागणी आहे. कोरोनाचे संकट दूर होऊन पंढरपूरची वारी पुन्हा एकदा चालू होऊ दे. आषाढी वारीचा आनंद आम्हाला परत मिळू दे. जशी सासूरवाशीण सून आपल्या माहेरी येताच सुखाची शांत झोप येते, तीच अवस्था पंढरपूरला पोहोचताच वारकऱ्यांच्या मनाची होते. वारीचा आनंद आम्हा वारकऱ्यांना लवकरच अनुभवायला मिळू दे.

फटिंग महाराज, जवाहरनगर