शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

बेपत्ता दोन तरुणींचा ४८ तासात शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST

भंडारा : फेसबुकवरुन झालेल्या मैत्रीतून लाखनी येथील दोन तरुणी बेपत्ता झाल्या होत्या. भंडारा पोलिसांनी या तरुणींचा शोध घेत अवघ्या ...

भंडारा : फेसबुकवरुन झालेल्या मैत्रीतून लाखनी येथील दोन तरुणी बेपत्ता झाल्या होत्या. भंडारा पोलिसांनी या तरुणींचा शोध घेत अवघ्या ४८ तासात त्यांना जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

गीता (नाव बदललेले) आणि राजश्री (नाव बदललेले) या दोन्ही २३ वर्षिय तरुणी ५ जुलै रोजी लाखनी येथे काॅलेजमध्ये जातो म्हणून घरुन निघून गेल्या होत्या. परंतु त्या परत आल्या नाही. त्यावरुन त्यांच्या वडीलांनी लाखनी ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात लाखनीचे ठाणेदार वाढीवे यांनी पथक तयार केले. सायबर पोलिसांकडून तांत्रिक माहिती मिळविली. त्यावेळी या दोन्ही तरुणी जळगाव जिल्ह्यातील कोलनवी परिसरात असल्याचे पुढे आले. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती जळगाव जिल्ह्यात यापूर्वी कार्यरत असल्याने त्यांनी पथकाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. पथक पोहचताच तरुणींनी तेथून पळ काढला. फेसबुकवरुन झालेल्या ओळखीच्या माध्यमातून त्यांचे लग्न एका मंदिरात लावून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लगेच गावातील काही मंडळी व भंडारा पोलिसांचे पथक मंदिरात दाखल झाले. त्यात दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. अवघ्या ४८ तासात ही कारवाई करण्यात आली. या पथकातील महिला पोलीस अमलदार वासंती बोरकर यांनी प्रसंगवधान राखून फेसबुकवरील माहिती आणि सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई केली.

तरुणी होत्या लग्नाच्या तयारीत

लाखनी तालुक्यातून बेपत्ता झालेल्या दोन तरुणी जळगाव जिल्ह्यातील कोलनवी येथील एका मंदिरात लग्न करण्याच्या तयारीत होत्या. मात्र पोलीस वेळीच पोहचल्याने या मुलींची सुखरुप सुटका झाली.