शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

नक्षलमुक्तीच्या नावाखाली विकासाला कात्री

By admin | Updated: January 28, 2015 23:10 IST

पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे प्रभावक्षेत्र आहे. हे प्रभाव क्षेत्र भंडारा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे आघाडी शासनाने या जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश नक्षलग्रस्त तालुक्यात

भंडारा : पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे प्रभावक्षेत्र आहे. हे प्रभाव क्षेत्र भंडारा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे आघाडी शासनाने या जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश नक्षलग्रस्त तालुक्यात केला होता. परंतु राज्यातील युती शासनाने हे तालुके नक्षलमुक्त करुन या भागात येणाऱ्या निधीवर निर्बंध घातले असल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे.केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून विकासकामांना कात्री लावत आहे. त्याचा परिणाम मागास जिल्ह्याच्या विकासावर होणार आहे. तत्कालीन केंद्र शासनाने भंडारा जिल्ह्यात सुरु केलेली ‘डावी कडवी विचारसरणी’ योजना बंद केली आहे. त्यामुळे ही विकासकामे ठप्प होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने ‘अच्छे दिन’ च्या योजना सुरु ठेऊन विकासात आघाडी घेण्याची गरज आहे. राज्य सरकारने या भागात देण्यात येणारा निधी बंद केला आहे किंवा केवळ कर्मचाऱ्यांचे भत्ते बंद करण्यात आले, याबाबत सरकारने, प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त भागात साकोली विधानसभा क्षेत्राला सामावून घेण्यासाठी आपण आवाज उचलला होता.त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या क्षेत्रातील तीन तालुक्यांचा नक्षलग्रस्त भागात समावेश करण्यात आला होता. आता हे तालुके वगळण्यात आल्यामुळे हा निधी बंद होणार आहे. परिणामी विकासावर त्याचा परिणाम होणार असल्याचेही वाघाये यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)