शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून शाळा सुरूची लगबग शिक्षण विभागाला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

कोविडमुक्त गावातील शाळा सुरू करण्याचे परिपत्रक ७ जुलैला शासनाने पारित केले. त्यानुसार शाळा सुरू करताना गाव कोविडमुक्त ...

कोविडमुक्त गावातील शाळा सुरू करण्याचे परिपत्रक ७ जुलैला शासनाने पारित केले. त्यानुसार शाळा सुरू करताना गाव कोविडमुक्त असावा. त्यानंतर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करायची होती. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत सगळं काही सामसूम होते. लोकमतमध्ये १२ जुलै रोजी ‘‘चला मुलांनो शाळेत चला’’चा मार्ग मोकळा ही बातमी प्रसिद्ध झाली. सगळे खाडकन जागे झाले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना शाळा सुरू करण्यासाठी समिती गठित केल्याचा अहवाल मागितला. तत्पूर्वी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांनी ७ जुलै रोजीच शासन निर्णय व शिक्षण विभागाकडे पृष्ठांकन क्रमांक १७४८ दिनांक ७ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा यांना माहितीसाठी प्रत दिली. तसेच सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र पाच दिवस सगळे गप्प होते. गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत काही सूचना मिळाल्या नाहीत, तर समित्या स्थापन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत गटविकास अधिकाऱ्यांना मिळायला पाहिजे होत्या; पण तसे दिसून आले नाही. मात्र, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे पत्र सर्व गटशिक्षणाधिकारी यांना १२ जुलै रोजी प्राप्त होताच शिक्षण विभाग कामाला लागले. दोन दिवसांपासून कुठे समित्या झाल्या, याची खबर घेत आहेत.

तसेच गटविकास अधिकारी मोहाडी यांनी आपल्या स्तरावर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना शाळा सुरू करण्याचा परिपत्रक व्हाॅट्सॲपवर घातला. घाईगडबडीत अनेक ग्रामपंचायतींनी सभा घेऊन समित्या स्थापन केल्या. पण, अजून ठराव पंचायत समितीकडे अनेक ग्रामपंचायतींनी पाठविले नाही. शाळा सुरू करण्याचा पुढाकार स्थानिक स्वराज्य संस्था यांचा असताना शिक्षण विभागाने पुढाकार घेतला. यात समन्वयाचा अभाव दिसून आला आहे.

बॉक्स

मोहाडी तालुक्यात ४४ शाळा आहेत. त्यापैकी ४ शाळा नगर पंचायतच्या हद्दीत येतात. आता उर्वरित ४० शाळा असलेल्या गावात ३२ ग्रामपंचायतींनी समित्या गठित केल्या आहेत. त्यातील उद्या २८ शाळांत मुलांची किलबिलाट ऐकायला येणार आहे.

बॉक्स

शाळा सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा, असे परिपत्रक म्हणतो. मात्र, खरिपाच्या हंगामात पालक व्यस्त असताना समितीने गावातील पालकांसोबत ठराव घेताना चर्चा केली असेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.