शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आजपासून शाळा सुरूची लगबग शिक्षण विभागाला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

कोविडमुक्त गावातील शाळा सुरू करण्याचे परिपत्रक ७ जुलैला शासनाने पारित केले. त्यानुसार शाळा सुरू करताना गाव कोविडमुक्त ...

कोविडमुक्त गावातील शाळा सुरू करण्याचे परिपत्रक ७ जुलैला शासनाने पारित केले. त्यानुसार शाळा सुरू करताना गाव कोविडमुक्त असावा. त्यानंतर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करायची होती. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत सगळं काही सामसूम होते. लोकमतमध्ये १२ जुलै रोजी ‘‘चला मुलांनो शाळेत चला’’चा मार्ग मोकळा ही बातमी प्रसिद्ध झाली. सगळे खाडकन जागे झाले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना शाळा सुरू करण्यासाठी समिती गठित केल्याचा अहवाल मागितला. तत्पूर्वी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांनी ७ जुलै रोजीच शासन निर्णय व शिक्षण विभागाकडे पृष्ठांकन क्रमांक १७४८ दिनांक ७ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा यांना माहितीसाठी प्रत दिली. तसेच सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र पाच दिवस सगळे गप्प होते. गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत काही सूचना मिळाल्या नाहीत, तर समित्या स्थापन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत गटविकास अधिकाऱ्यांना मिळायला पाहिजे होत्या; पण तसे दिसून आले नाही. मात्र, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे पत्र सर्व गटशिक्षणाधिकारी यांना १२ जुलै रोजी प्राप्त होताच शिक्षण विभाग कामाला लागले. दोन दिवसांपासून कुठे समित्या झाल्या, याची खबर घेत आहेत.

तसेच गटविकास अधिकारी मोहाडी यांनी आपल्या स्तरावर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना शाळा सुरू करण्याचा परिपत्रक व्हाॅट्सॲपवर घातला. घाईगडबडीत अनेक ग्रामपंचायतींनी सभा घेऊन समित्या स्थापन केल्या. पण, अजून ठराव पंचायत समितीकडे अनेक ग्रामपंचायतींनी पाठविले नाही. शाळा सुरू करण्याचा पुढाकार स्थानिक स्वराज्य संस्था यांचा असताना शिक्षण विभागाने पुढाकार घेतला. यात समन्वयाचा अभाव दिसून आला आहे.

बॉक्स

मोहाडी तालुक्यात ४४ शाळा आहेत. त्यापैकी ४ शाळा नगर पंचायतच्या हद्दीत येतात. आता उर्वरित ४० शाळा असलेल्या गावात ३२ ग्रामपंचायतींनी समित्या गठित केल्या आहेत. त्यातील उद्या २८ शाळांत मुलांची किलबिलाट ऐकायला येणार आहे.

बॉक्स

शाळा सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा, असे परिपत्रक म्हणतो. मात्र, खरिपाच्या हंगामात पालक व्यस्त असताना समितीने गावातील पालकांसोबत ठराव घेताना चर्चा केली असेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.