शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

मुलाच्या मृत्यूला शाळा व्यवस्थापन जबाबदार

By admin | Updated: August 3, 2015 00:29 IST

तालुक्यातील पवनारखारी येथील इंदिराबाई मरसकोल्हे अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणारा...

वडिलांचा आरोप : न्याय देण्याची मागणीतुमसर : तालुक्यातील पवनारखारी येथील इंदिराबाई मरसकोल्हे अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणारा प्रफुल गळीराम वरकडे याच्या मृत्यूस शाळा व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप मृतकाचे वडील गळीराम वरकडे यांनी केला आहे.गोबरवाही जवळील पवनारखारी येथे खासगी अनुदानित इंदिराबाई मरसकोल्हे आदिवासी आश्रमशाळा असून या शाळेत संचालकाचा वाद फोफावला असल्यानेच तेथील कर्मचाऱ्यात शीतयुद्ध सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविले जात नाही. १५ दिवसापूर्वी गळीराम वरकडे रा.राजापूर यांचा मुलगा प्रफुल वरकडे (१२) हा आश्रमशाळेत गेला. त्यावेळी तो सुदृढ होता. त्याला कसलीही जखम किंवा आजार नसतानाही त्याची प्रकृती अचानक बिघडली असल्याचे सांगल्या जात असून त्याच्या मानेवर सूज आल्याचे सांगण्यात येत आहे. ती सूज कशी आली? त्याला कोणी मारले असावे? की तो खाली पडून त्याला जखम झाली हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून जर त्याच्या मानेवर सूज दिसत होती तर शाळा व्यवस्थापनाने याची माहिती पालकांना देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. इतकेच काय तर जेव्हा प्रफुल्लला दि. २९ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथे दाखल केल्यानंतर देखील त्याच दिवशी पालकांना महिती न देता दुसऱ्या दिवशी दि. ३० जुलैला सांगण्यात आले. त्यावेळी प्रथम तुमसर व नंतर भंडारा येथे रेफर केल्या गेले व नंतर नागपूर येथे रेफर करीत असतानाच वाटेतच त्याचे निधन झाले असून शाळा प्रशासन डोळ्यात सूज आल्याचे सांगते तर ती सूज आली कशी हे अजूनपर्यंत अनुत्तरीय असून माझ्या मुलावर जर वेळीच उपचार केला गेला असता तर त्याचा जीव वाचला असता. मात्र असे काहीच करण्यात न आल्यामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचे गळीराम वरकडे यांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)