शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिखल तुडवत जावे लागते शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:15 IST

गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेने उड्डाणपुलाचे काम सुरू केले. परंतु पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे चिमूकल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ७०० लोकवस्ती असलेल्या गावाला बसत आहे. शासन व प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.

ठळक मुद्देरेल्वेचे ढिसाळ नियोजन : पर्यायी रस्ता न करता सिवनी येथे पूलाचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिवनी (तुमसर) : गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेने उड्डाणपुलाचे काम सुरू केले. परंतु पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे चिमूकल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ७०० लोकवस्ती असलेल्या गावाला बसत आहे. शासन व प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.तुमसर शहरापासून अवघ्या तीन कि़मी. अंतरावर सिवनी हे ७०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. गाव शिवारातून तुमसर तिरोडी रेल्वे ट्रॅक आहे. रेल्वे प्रशासनाने येथे उड्डाणपूल तयार करीत आहे. येथील ग्रामस्थांना तुमसर शहरात जाण्याकरिता हा एकमेव रस्ता आहे. पावसाळा सुरू झाला. उड्डाणपूलाकरीता जूना रस्ता खोदण्यात आला. या खड्ड्यात कंबरभर पाणी साचले आहे. सध्या चिमूकल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला निवेदन तथा तक्रारी देण्यात आल्या. परंतु रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले नाही. ग्रामस्थ येथे आंदोलनाच्या मार्गावर आहेत. तुमसर तालुक्यात आतापर्यंत केवळ ५२७ मि.मी. पाऊस पडला. जोरदार पावसात या खड्ड्यातून मुळीच जाता येणार नाही. पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटणार आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता तयार न करता उड्डाणपुलाचे काम येथे सुरू केले.स्थानिक महसूल प्रशासनाचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे. युवती, महिला, वृद्ध पुरूषांना पाण्यातून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे ग्रामस्थात प्रचंड रोष व्याप्त आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.सध्या रेल्वेने उड्डाणपुलाचे बांधकाम बंद केले आहे. पावसाळ्यापुर्वी येथे बांधकामाला सुरूवात करण्यात आली. किमान पावसाळाभर जीवघेण्या पाण्यातूनच ग्रामस्थांना प्रवास करावा लागणार आहे. आधी पर्यायी रस्ता व नंतर नवीन रस्ता बांधकाम असा शासनाचा नियम आहे. या नियमाला येथे तिलांजली देण्यात आली. परंतु हा जाब कोण वचिारणार हाच मुख्य प्रश्न आहे. स्थानिक महसूल विभागाशी उड्डाणपूल बांधकामापूर्वी रेल्वेने साधी चर्चा केली नाही, अशी माहिती पुढे आली आहे. येथे रेल्वे व स्थानिकांचा रस्त्यासंदर्भात समस्या असल्याचे समजते.महसूल विभागाने प्रत्यक्षात मौका चौकशी करून पाहणी केली. पर्यायी रस्त्याकरीता भूसंपादन प्रक्रिया करण्याचा अहवाल तयार केला. परंतु भूसंपादन करण्याकरीता अडचणी निर्माण होत आहेत.रेल्वेने पर्यायी रस्ता न करता प्रत्यक्ष उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले. मौका चौकशीनंतर पर्यायी रस्ता रेल्वेने तयार करण्याचा अहवाल रेल्वेला दिला. रेल्वेने तो मंजूर केला. येथे संपादन प्रक्रिया सुरू आहे, परंतु शेतकºयांचा विरोध सुरू असून त्यांना रेल्वेने मोबदला द्यावा, त्यानंतरच येथे तोडगा निघेल.-गजेंद्र बालपांडे,तहसीलदार तुमसर.