शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

चिखल तुडवत जावे लागते शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:15 IST

गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेने उड्डाणपुलाचे काम सुरू केले. परंतु पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे चिमूकल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ७०० लोकवस्ती असलेल्या गावाला बसत आहे. शासन व प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.

ठळक मुद्देरेल्वेचे ढिसाळ नियोजन : पर्यायी रस्ता न करता सिवनी येथे पूलाचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिवनी (तुमसर) : गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेने उड्डाणपुलाचे काम सुरू केले. परंतु पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे चिमूकल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ७०० लोकवस्ती असलेल्या गावाला बसत आहे. शासन व प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.तुमसर शहरापासून अवघ्या तीन कि़मी. अंतरावर सिवनी हे ७०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. गाव शिवारातून तुमसर तिरोडी रेल्वे ट्रॅक आहे. रेल्वे प्रशासनाने येथे उड्डाणपूल तयार करीत आहे. येथील ग्रामस्थांना तुमसर शहरात जाण्याकरिता हा एकमेव रस्ता आहे. पावसाळा सुरू झाला. उड्डाणपूलाकरीता जूना रस्ता खोदण्यात आला. या खड्ड्यात कंबरभर पाणी साचले आहे. सध्या चिमूकल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला निवेदन तथा तक्रारी देण्यात आल्या. परंतु रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले नाही. ग्रामस्थ येथे आंदोलनाच्या मार्गावर आहेत. तुमसर तालुक्यात आतापर्यंत केवळ ५२७ मि.मी. पाऊस पडला. जोरदार पावसात या खड्ड्यातून मुळीच जाता येणार नाही. पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटणार आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता तयार न करता उड्डाणपुलाचे काम येथे सुरू केले.स्थानिक महसूल प्रशासनाचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे. युवती, महिला, वृद्ध पुरूषांना पाण्यातून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे ग्रामस्थात प्रचंड रोष व्याप्त आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.सध्या रेल्वेने उड्डाणपुलाचे बांधकाम बंद केले आहे. पावसाळ्यापुर्वी येथे बांधकामाला सुरूवात करण्यात आली. किमान पावसाळाभर जीवघेण्या पाण्यातूनच ग्रामस्थांना प्रवास करावा लागणार आहे. आधी पर्यायी रस्ता व नंतर नवीन रस्ता बांधकाम असा शासनाचा नियम आहे. या नियमाला येथे तिलांजली देण्यात आली. परंतु हा जाब कोण वचिारणार हाच मुख्य प्रश्न आहे. स्थानिक महसूल विभागाशी उड्डाणपूल बांधकामापूर्वी रेल्वेने साधी चर्चा केली नाही, अशी माहिती पुढे आली आहे. येथे रेल्वे व स्थानिकांचा रस्त्यासंदर्भात समस्या असल्याचे समजते.महसूल विभागाने प्रत्यक्षात मौका चौकशी करून पाहणी केली. पर्यायी रस्त्याकरीता भूसंपादन प्रक्रिया करण्याचा अहवाल तयार केला. परंतु भूसंपादन करण्याकरीता अडचणी निर्माण होत आहेत.रेल्वेने पर्यायी रस्ता न करता प्रत्यक्ष उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले. मौका चौकशीनंतर पर्यायी रस्ता रेल्वेने तयार करण्याचा अहवाल रेल्वेला दिला. रेल्वेने तो मंजूर केला. येथे संपादन प्रक्रिया सुरू आहे, परंतु शेतकºयांचा विरोध सुरू असून त्यांना रेल्वेने मोबदला द्यावा, त्यानंतरच येथे तोडगा निघेल.-गजेंद्र बालपांडे,तहसीलदार तुमसर.