शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाणी साठवा-गाव वाचवा अभियानापासून जिल्हा दूरच

By admin | Updated: August 18, 2014 23:18 IST

पाणी साठवा - गाव वाचवा या अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित करून ग्रामपंचायतीची निवड केली जाणार आहे. पात्र ग्रामपंचायतीचा शासनाकडून

भंडारा : पाणी साठवा - गाव वाचवा या अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित करून ग्रामपंचायतीची निवड केली जाणार आहे. पात्र ग्रामपंचायतीचा शासनाकडून गौरवही केला जाणार आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचा थेंबनथेंब अडविण्याचे शासनाचे धोरण आहे. या अभियानाला चालना देण्यासाठी पाणी साठवा - गाव वाचवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जूनपासून सुरू झालेले हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत ग्रामस्तरावर राबवायचे आहे. मात्र हे अभियान राबविण्यात अडचणी येत असल्याने जिल्ह्यात याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवून पाणी टंचाईवर मात करता येते आणि पर्यावरणाचा समतोल साधता येतो, या उद्देशाने पावसाचे पाणी अडविण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. या उपक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामविकास विभागाने पाणी साठवा - गाव वाचवा हे अभियान सुरू करण्यात आले आहे. भूजल पातळी सर्व्हेक्षण, परीक्षण महिन्यात करावे, परिसरात पर्जन्यमापक यंत्र बसवून पावसाची नोंद करणे, पाणी साठविण्यासाठी कामाचे नियोजन आणि अंदाजपत्रक तयार करणे, वॉटर अकाऊंट तंत्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यासाठी तज्जांची मदत घेणे, शासकीय, निमशासकीय, खासगी, इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टींग उभारण्यासाठी प्रत्येक कुटूंबप्रमुख, बचतगटातील महिलांना प्रवृत्त करणे, पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जागोजागी उतारात चर खोदणे, नादुरूस्त तलाव विहिरी शेततळ्यांमधील गाळ काढून तसेच आवश्यक ती दुरूस्ती करून जलसंचय करणे, भुगर्भस्तर आणि भूजल पातळीच्या क्षमतेनुसार ग्रामपंचयतीने केलेल्या कामाचे मूल्यमापन करून या स्पर्धेत सहभागी व्हावयाचे आहे. या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. गावपातळीवर कामे, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, खडकांचे पाणी, पाझर व पाणी साठविण्याची क्षमता आणि इतर तांत्रिक बाबींचा अभ्यास करून नियोजन करणे, गावातील पाण्याची पातळी मोजणे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निश्चित करून पाणी टंचाईसाठी झालेला खर्च पाहणे, पाणी टंचाई, दुष्काळामुळे कृषी उत्पादन, पशू व्यवसायात झालेली घट लक्षात घेणे, पाणी टंचाईने मानवी जीवनावर झालेला परिणाम, रोगराई, बालमृत्यूचे प्रमाण, कुपोषणाची माहिती यासह ग्रामपंचायत परिसरातील भुगर्भाचा अभ्यास करून पाणी साठविण्याचा आराखडा तयार करावयाचा आहे. (शहर प्रतिनिधी)