शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
5
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
6
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
7
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
8
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
9
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
10
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
11
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
13
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
14
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
15
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
17
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
18
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
19
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
20
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सौंदडवासीयांनी काढला पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:13 IST

सौंदड पुनर्वसन सतरा दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे. असा प्रकार यापूर्वीही अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या आधीही मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते परंतु त्यातही ते ‘सपशेल फेल’ ठरले. कारवाई आरोपींवर करण्यापेक्षा निर्दोषांवर करण्यात आल्याने सौंदडवासियांनी अड्याळ पोलिसा ठाण्यावर शांततेत मोर्चा काढला.

ठळक मुद्देआक्रोश कायम : प्रकरण सौंदड येथील गौ-तस्करांकरवी मारहाणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : सौंदड पुनर्वसन सतरा दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे. असा प्रकार यापूर्वीही अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या आधीही मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते परंतु त्यातही ते ‘सपशेल फेल’ ठरले. कारवाई आरोपींवर करण्यापेक्षा निर्दोषांवर करण्यात आल्याने सौंदडवासियांनी अड्याळ पोलिसा ठाण्यावर शांततेत मोर्चा काढला.अड्याळ पोलीस ठाण्यामध्ये ग्रामस्थांनी तहसिलदार गजानन कोकुर्डे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्क्स, पोलिस निरिक्षक सुरेश ढोबळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.निवेदनात एकूण १० प्रमुख मागण्यांचा उल्लेख करण्यात आला. त्यात हल्ल्याचा खटला जलदगतीे न्यायालयाद्वारे चालविण्यात यावा, हल्लेखोरांवर ३०७ कलम लावावी, गावात सशस्त्र पोलीस चौकी द्यावी, हल्ल्यातील जखमींना आर्थिक मदत मिळावी, छेडखानी करण्यात आलेल्या महिलांना एस.सी., एस.टी. कायद्याप्रमाणे मदत करावी, ग्रामस्थांवरील लावलेले गुन्हे मागे घेणे, गोतस्करीत वापरलेले ट्रक तात्काळ जप्ती करणे, फरार आरोपींना अटक झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करावी अशी मागणी आहे. तसेच सर्वात शेवटी आणि महत्वाचे म्हणजे भंडारा जिल्ह्यातील गुरांच्या बाजारातून होणाऱ्या गोस्तकरी अड्यांवर कारवाई करून वापरण्यात येणाºया वाहनाचे परवाने रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.सौंदड पुनर्वसन वासीयांनी पोलिसांना तात्काळ मदत मागितली होती. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ मदतीचा हातही दिला नाही.फरार आरोपींना अटक झाली असती तर मोर्चा निघाला असता काय, असाही सवाल यावेळी उपस्थितांनी केला. अशा प्रकारच्या घटनेचा निषेध करून पायबंध घालण्यासाठी तसेच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चा काढला असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.