शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

सौंदडवासीयांनी काढला पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:13 IST

सौंदड पुनर्वसन सतरा दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे. असा प्रकार यापूर्वीही अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या आधीही मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते परंतु त्यातही ते ‘सपशेल फेल’ ठरले. कारवाई आरोपींवर करण्यापेक्षा निर्दोषांवर करण्यात आल्याने सौंदडवासियांनी अड्याळ पोलिसा ठाण्यावर शांततेत मोर्चा काढला.

ठळक मुद्देआक्रोश कायम : प्रकरण सौंदड येथील गौ-तस्करांकरवी मारहाणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : सौंदड पुनर्वसन सतरा दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे. असा प्रकार यापूर्वीही अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या आधीही मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते परंतु त्यातही ते ‘सपशेल फेल’ ठरले. कारवाई आरोपींवर करण्यापेक्षा निर्दोषांवर करण्यात आल्याने सौंदडवासियांनी अड्याळ पोलिसा ठाण्यावर शांततेत मोर्चा काढला.अड्याळ पोलीस ठाण्यामध्ये ग्रामस्थांनी तहसिलदार गजानन कोकुर्डे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्क्स, पोलिस निरिक्षक सुरेश ढोबळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.निवेदनात एकूण १० प्रमुख मागण्यांचा उल्लेख करण्यात आला. त्यात हल्ल्याचा खटला जलदगतीे न्यायालयाद्वारे चालविण्यात यावा, हल्लेखोरांवर ३०७ कलम लावावी, गावात सशस्त्र पोलीस चौकी द्यावी, हल्ल्यातील जखमींना आर्थिक मदत मिळावी, छेडखानी करण्यात आलेल्या महिलांना एस.सी., एस.टी. कायद्याप्रमाणे मदत करावी, ग्रामस्थांवरील लावलेले गुन्हे मागे घेणे, गोतस्करीत वापरलेले ट्रक तात्काळ जप्ती करणे, फरार आरोपींना अटक झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करावी अशी मागणी आहे. तसेच सर्वात शेवटी आणि महत्वाचे म्हणजे भंडारा जिल्ह्यातील गुरांच्या बाजारातून होणाऱ्या गोस्तकरी अड्यांवर कारवाई करून वापरण्यात येणाºया वाहनाचे परवाने रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.सौंदड पुनर्वसन वासीयांनी पोलिसांना तात्काळ मदत मागितली होती. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ मदतीचा हातही दिला नाही.फरार आरोपींना अटक झाली असती तर मोर्चा निघाला असता काय, असाही सवाल यावेळी उपस्थितांनी केला. अशा प्रकारच्या घटनेचा निषेध करून पायबंध घालण्यासाठी तसेच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चा काढला असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.