शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयाच्या सदस्यांपेक्षा सरपंच ‘लय भारी’!

By admin | Updated: November 3, 2016 00:43 IST

ग्रामपंचायतींना अधिकार दिले जात नसल्याची ओरड आता संपणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाचे अनुदान थेट ...

अधिकार वाढले : ग्रामपंचायती होणार श्रीमंत, १४ व्या वित्त आयोगाचे अनुदान थेट ग्रामपंचायतलाभंडारा : ग्रामपंचायतींना अधिकार दिले जात नसल्याची ओरड आता संपणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाचे अनुदान थेट ग्रामपंचायतींलाच मिळणार असून जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा सरपंच वरचढ ठरणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ५४३ ग्रामपंचायतींना होणार आहे.पूर्वी जिल्हा परिषद सदस्यांना विकास निधीतून कामे करता येत होती. त्या निधीवर त्यांचा अधिकार राहत होता. मात्र, कालांतराने शासनाने जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार कमी केले आहेत. त्यांच्या तुलनेत विकास कामांचे अधिकार व निधीचा वापर ग्रामपंचायत सरपंच यांना करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे. यावर्षीपासून राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींना आगामी पाच वर्षांत सुमारे १५ हजार कोटींचा निधी मिळणार आहे. निधीमधून कुठली कामे करायची किंवा नाही याचे सर्व अधिकार ग्रामपंचायतींना असतील. ग्रामपंचायत बळकटीकरणासाठी निर्णय घेतला असला तरी जि.प. व पं.स. मधील सदस्यांना फटका बसेल. केंद्र शासनाने ग्रामपंचायतींना जास्तीचे आर्थिक अधिकार देण्यासाठी २०१३ मध्ये डी. वा. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना केली. आयोगाने केलेल्या शिफारसी शासनाने आता स्वीकारल्या आहेत. आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१५ ते २०२० पर्यंत १५ हजार ३५ कोटींचे अनुदान केंद्र शासन देणार आहे. राज्यातील जवळपास २९ हजार ग्रामपंचायतींना पंचावार्षिक योजनेतून ५२ लाखांचे भरीव अनुदान थेट मिळेल. अकराव्या वित्त आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या १०० टक्के निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्यात आला. त्यानंतर बाराव्या वित्त आयोगाकडून उपलब्ध झालेला निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रत्येकी २५ टक्के व ग्रामपंचायतींना ५० टक्के वर्ग करण्यात आला. तेराव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद १०, पंचायत समिती २० आणि ग्रामपंचायती ७० टक्के खर्च करण्यात आला. आता चौदाव्या वित्त आयोगाने हा निधी १०० टक्के ग्रामपंचायतींना मिळणार आहे. मागील तीन वर्षांपासून रखडलेली मागणी यंदा सरकारने मान्य केली आहे. (शहर प्रतिनिधी) पंचायत समिती कोलमडणार !ग्रामपंचायतींना अधिकार दिले तर मध्यस्थी स्थानिक स्वराज्य संस्थांचे काय होणार ? त्या कोलमडून तर जाणार नाहीत नाही, असाही प्रश्न आहे. गावामध्ये सरपंच ग्रामसेवक निर्णय घेत असतात. ग्रामपंचायतींना अधिकार दिले ही बाब चांगली आहे, मात्र जिल्हा परिषद, पंचायत समितीचीही भूमिका महत्त्वाची आहे. चौदाव्या वित्त आयोगामुळे पंचायत समिती कोलमडणार का, अशी भिती निर्माण होत आहे.