शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच संघटनेचा वीजबिल भरण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:16 IST

पालांदूर महावितरण कार्यालयाने २६ ग्रामपंचायतीअंतर्गत ३१ गावांच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित केला. पंधराव्या वित्त आयोगातून बिल भरण्याचे सुचविले. मात्र ...

पालांदूर महावितरण कार्यालयाने २६ ग्रामपंचायतीअंतर्गत ३१ गावांच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित केला. पंधराव्या वित्त आयोगातून बिल भरण्याचे सुचविले. मात्र त्या खर्चाचे नियोजन झाले नसल्याने हा पर्याय निष्फळ ठरला. आता ग्रामपंचायतीने स्वतःच्या उत्पन्नातून बिल भरण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून आले. मात्र ग्रामपंचायतीकडे स्वतःचे उत्पन्न अल्प आहे. त्यातून वीजबिल भरणे अशक्य आहे. त्यामुळे बिल थकीत राहिले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सोमवारी गोकुळाष्टमीच्या दिवशी हा प्रकार झाल्याने जन्माष्टमी साजरी करण्यासाठी एकमेकांच्या घरी जाताना अंधाराचा सामना करावा लागला. त्यामुळे गावकऱ्यांत मोठा रोष दिसत होता. बिलाची रक्कम चार महिन्यांपासून थकीत आहे. आणखी पंधरा दिवस राहिली असती तर महावितरणचे काय बिघडले असते, असा सवाल गावकरी करीत आहेत. सणासुदीच्या दिवसाचा तरी विचार करायला हवा होता. आमचा दोष नसताना अंधारात का जगावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शासनाने ग्रामपंचायतीची वास्तव आर्थिक स्थिती लक्षात घेत वीजबिलाचा भरणा शासकीय पातळीवर जिल्हा परिषदेमार्फत करावा, अशी मागणी केली जात आहे. पाणीपुरवठा योजनेतील ५० टक्के निधी ग्रामपंचायतला तत्काळ पुरवावी, अशी मागणी लाखनी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष म. वा. बोळणे यांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून बिल न भरण्याचा पवित्रा सरपंच संघटनेने घेतला आहे.