शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच संघटनेचा वीजबिल भरण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:16 IST

पालांदूर महावितरण कार्यालयाने २६ ग्रामपंचायतीअंतर्गत ३१ गावांच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित केला. पंधराव्या वित्त आयोगातून बिल भरण्याचे सुचविले. मात्र ...

पालांदूर महावितरण कार्यालयाने २६ ग्रामपंचायतीअंतर्गत ३१ गावांच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित केला. पंधराव्या वित्त आयोगातून बिल भरण्याचे सुचविले. मात्र त्या खर्चाचे नियोजन झाले नसल्याने हा पर्याय निष्फळ ठरला. आता ग्रामपंचायतीने स्वतःच्या उत्पन्नातून बिल भरण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून आले. मात्र ग्रामपंचायतीकडे स्वतःचे उत्पन्न अल्प आहे. त्यातून वीजबिल भरणे अशक्य आहे. त्यामुळे बिल थकीत राहिले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सोमवारी गोकुळाष्टमीच्या दिवशी हा प्रकार झाल्याने जन्माष्टमी साजरी करण्यासाठी एकमेकांच्या घरी जाताना अंधाराचा सामना करावा लागला. त्यामुळे गावकऱ्यांत मोठा रोष दिसत होता. बिलाची रक्कम चार महिन्यांपासून थकीत आहे. आणखी पंधरा दिवस राहिली असती तर महावितरणचे काय बिघडले असते, असा सवाल गावकरी करीत आहेत. सणासुदीच्या दिवसाचा तरी विचार करायला हवा होता. आमचा दोष नसताना अंधारात का जगावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शासनाने ग्रामपंचायतीची वास्तव आर्थिक स्थिती लक्षात घेत वीजबिलाचा भरणा शासकीय पातळीवर जिल्हा परिषदेमार्फत करावा, अशी मागणी केली जात आहे. पाणीपुरवठा योजनेतील ५० टक्के निधी ग्रामपंचायतला तत्काळ पुरवावी, अशी मागणी लाखनी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष म. वा. बोळणे यांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून बिल न भरण्याचा पवित्रा सरपंच संघटनेने घेतला आहे.