शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारणदिनी तालुकास्तरावर होणार सरपंच सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:34 IST

वाकेश्वर : ग्रामीण समुदाय अनेक समस्यांचे माहेरघर समजले जाते. ग्रामीण माणसाला पदोपदी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता, ...

वाकेश्वर : ग्रामीण समुदाय अनेक समस्यांचे माहेरघर समजले जाते. ग्रामीण माणसाला पदोपदी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता, पाणी, शिक्षण या गावातील समस्यांकडे कुणाचेच लक्ष नसते. आता मात्र हे चित्र बदलण्यासाठी राज्यात तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन केले जाणार आहे. ज्या समस्या गावस्तरावरून सोडविणे शक्य होणार नाही, त्या समस्या शासनदरबारी पोहोचणार आहेत.

ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुसंगाने आता राज्यात तालुकास्तरांवर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन केले जाणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचाकडून गावातील जनतेचे प्रश्न व समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकताच घेतला आहे. गावातील विकासकामे जलद गतीने होण्यासाठी घेतला गेलेला हा निर्णय त्या विभागाचा स्तुत्य निर्णय आहे. या निर्णयाचे गावागावातून स्वागत होत आहे. ग्रामपंचायतची कामे वेळेवर होत नसल्याबाबत तक्रारी व निवेदने शासनास प्राप्त होत असतात. याबाबी विचारात घेऊन राज्यात सर्व जिल्ह्यात तालुकापातळीवर गटविकास अधिकारी यांच्या मार्फत सरपंच सहभाग घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या सभेत संबंधित विस्तार अधिकारी (पंचायत) व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी, ग्रामपंचायतची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी, गाऱ्हाणी अडचणींची सोडवणूक करावी या हेतूने दर तीन महिन्यांनी तक्रार निवारणदिनी या सभेचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत .

बॉक्स

सभेचा अहवाल शासनाकडे जाणार

गटविकास अधिकारी यांनी सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अहवाल एकत्र करून ते संबंधित विभागीय आयुक्त यांना सात दिवसात, तर त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातून आलेले अनुपालन अहवाल शासनास दहा दिवसात सादर करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. या अहवालाची शासन स्तरावर दखल घेण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवून गावांमधील समस्यांची सोडवणूक करावी, अशा सूचना संबंधित विभागाने दिल्या आहेत.