शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

तक्रार निवारणदिनी तालुकास्तरावर होणार सरपंच सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:34 IST

वाकेश्वर : ग्रामीण समुदाय अनेक समस्यांचे माहेरघर समजले जाते. ग्रामीण माणसाला पदोपदी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता, ...

वाकेश्वर : ग्रामीण समुदाय अनेक समस्यांचे माहेरघर समजले जाते. ग्रामीण माणसाला पदोपदी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता, पाणी, शिक्षण या गावातील समस्यांकडे कुणाचेच लक्ष नसते. आता मात्र हे चित्र बदलण्यासाठी राज्यात तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन केले जाणार आहे. ज्या समस्या गावस्तरावरून सोडविणे शक्य होणार नाही, त्या समस्या शासनदरबारी पोहोचणार आहेत.

ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुसंगाने आता राज्यात तालुकास्तरांवर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन केले जाणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचाकडून गावातील जनतेचे प्रश्न व समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकताच घेतला आहे. गावातील विकासकामे जलद गतीने होण्यासाठी घेतला गेलेला हा निर्णय त्या विभागाचा स्तुत्य निर्णय आहे. या निर्णयाचे गावागावातून स्वागत होत आहे. ग्रामपंचायतची कामे वेळेवर होत नसल्याबाबत तक्रारी व निवेदने शासनास प्राप्त होत असतात. याबाबी विचारात घेऊन राज्यात सर्व जिल्ह्यात तालुकापातळीवर गटविकास अधिकारी यांच्या मार्फत सरपंच सहभाग घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या सभेत संबंधित विस्तार अधिकारी (पंचायत) व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी, ग्रामपंचायतची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी, गाऱ्हाणी अडचणींची सोडवणूक करावी या हेतूने दर तीन महिन्यांनी तक्रार निवारणदिनी या सभेचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत .

बॉक्स

सभेचा अहवाल शासनाकडे जाणार

गटविकास अधिकारी यांनी सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अहवाल एकत्र करून ते संबंधित विभागीय आयुक्त यांना सात दिवसात, तर त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातून आलेले अनुपालन अहवाल शासनास दहा दिवसात सादर करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. या अहवालाची शासन स्तरावर दखल घेण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवून गावांमधील समस्यांची सोडवणूक करावी, अशा सूचना संबंधित विभागाने दिल्या आहेत.