शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

रेतीचोरीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 00:48 IST

तालुक्यातील एकाही रेतीघाटाचे लिलाव झालेले नसतानाही मोहाडी तालुक्यातील रेतीघाटातून सर्रासपणे रेती काढून ...

सिराज शेख मोहाडीतालुक्यातील एकाही रेतीघाटाचे लिलाव झालेले नसतानाही मोहाडी तालुक्यातील रेतीघाटातून सर्रासपणे रेती काढून चढ्या भावाने रेती विक्री जोमात सुरू आहे. या प्रकाराला महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी यांचा आशिर्वाद प्राप्त असल्यानेच रेती तस्करांचे फोफावत असल्याचे बोलले जाते.मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रतील बेटाळा, मोहगाव, मुंढरी, रोहा, पांजरा तसेच सुरनदी पात्रातील रेती दिवसा ढवळ्या चोरी केल्या जात आहे. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घर बांधकामाचे कामे सुरू असून त्याठिकाणी बिनादिक्कत रेती आणली जात आहे. मात्र रेतीघाटाचे लिलाव न झाल्याने रेतीचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. नागरिक आपल्या घराचे बांधकाम थांबवून ठेवण्याऐवजी हजार दोन हजार जास्त गेले तरी चालेल म्हणून रेती तस्कराकडून अधिक भावाने रेती घेत आहेत. आम्हाला अधिकाऱ्यांचे हात ओले करावे लागतात. त्यामुळे रेतीचे भाव थोडे जास्तच ठेवावे लागतात असे रेती आणून देणाऱ्यांचे म्हणणे असते.मोहगाव, पांजरा, बेटाळा, सातोना तसेच सुरनदीवरील इतर रेतीघाटावरून दररोज हजारो ब्रास रेतीची चोरी होत असल्याने शासनाच्या लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. मात्र या रेतीव्यवसायातून जरी शासनाचा नुकसान होत असेल पण रेती तस्कर व काही महसूल अधिकारी मालामाल होत आहेत. बांधकामावर सर्रास रेती पोहचत आहे हे उच्च अधिकाऱ्यांना सुद्धा दिसते. मात्र काही तांत्रिक कारणे समोर करून तेरी भी चुप मेरी भी चुप असा कारभार बिबोभाटपणे सुरू असल्याने रेती चोरीवर आळा घालणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेतीच्या ट्रॅक्टरमुळे व ट्रकमुळे घाटाजवळील गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. आणि या जिवघेण्या रस्त्याचा सर्वात जास्त त्रास ग्रामीण जनतेला सहन करावा लागत आहे. महिन्यातून दोन चार ट्रक किंवा ट्रॅक्टरवर कारवाई करून आम्ही किती दक्ष आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न महसूल विभाग अवश्य करीत असतो.रेतीघाटांचे लिलाव नेहमीच उशीरा करण्यात येतात आणि बांधकामाला रेतीची आवश्यकता असल्याने काहीही करा रेतीचोरी करावीच लागते, असा प्रकार सुरूच असतो. प्रशासन पहिल्या लिलावाची मुदत संपण्यापूर्वीच दुसरा लिलाव कां करीत नाही, असा प्रश्न साहजिकच जनता विचारत आहे. यावरून मधातला तिनचार महिन्याचा काळात रेतीचोरी होणारच हे प्रशासनाला माहित नसते का, तसेच रेती चोरी व्हावी हा प्रशासनाचा उद्देश तर नाही ना असाही प्रश्न जनता करीत आहे. मात्र महसूल विभागातर्फे अपुरा कर्मचारीवर्ग, पोलीस व महसूल विभागाचा समन्वय तसेच रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या जिवाची सुरक्षा असे कारणे दिली जातात. बहुतांशवेळी ही कारणेही योग्यच मानावी लागतात. वेळेवर रेतीघाट लिलाव होणे हेच एक उपाय आहे.