शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात साचला गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 00:26 IST

भंडारा जिल्ह्यातील अत्यंत शुद्ध पाणी असणारी नदी म्हणून वैनगंगा नदीची ख्याती होती.

दुर्लक्ष : नाग नदीच्या दूषित पाण्याचा परिणाम अशोक पारधी । लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भंडारा जिल्ह्यातील अत्यंत शुद्ध पाणी असणारी नदी म्हणून वैनगंगा नदीची ख्याती होती. इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठवण सुरु झाल्यापासून साचलेल्या पाण्यात नागपूर शहरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे पाणी मिसळल्या जात आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचे पाणी निर्मळ ऐवजी दूषित झाल्याची ख्याती पसरलेली आहे. गेल्या हंगामात उजव्या कालव्यातून धरणातील पाणी सोडण्यात आले. सोडलेले पाणी दूषित असल्याने कालव्याच्या तळाशी गाळ साचलेला आहे. येत्या हंगामात कालव्यातून पाणी सोडण्यापूर्वी गाळ उपसणे आवश्यक आहे. तरीही गाळ उपसण्याचे काम सुरु झालेले नाही.वैनगंगा नदीमध्ये नागनदीचे दूषित पाणी सोडल्या जात असल्याची बाब न्यायालयापासून मंत्रालयापर्यंत पोहचलेली आहे. निर्मल व शुध्द पाण्यात दूषित पाणी सोडण्यात येवू नये असे सर्वांनाच वाटत आहे. नाग नदीच्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने कोट्यवधीचा खर्च केल्याची चर्चा आहे परंतु पाणी शुध्द होवू शकले नाही. अशुध्द व दूषित पाणी वैनगंगा नदीमध्ये सोडल्या जात असल्याने नदीकाठावरील गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. शेतातील पिकांनासुध्दा दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.परिसरातील लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन दूषित पाण्याचे प्रश्नावर एकत्र येवून लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.