शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:29 IST

चुल्हाड ( सिहोरा ) : बावणथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. सुरक्षा रक्षकांचे नियुक्तीमध्ये एजन्सी ...

चुल्हाड ( सिहोरा ) : बावणथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. सुरक्षा रक्षकांचे नियुक्तीमध्ये एजन्सी धारकाने मनमानी कारभार करीत कपात केले आहे. यामुळे कार्यरत सुरक्षा रक्षकांना १२ तास सेवा बजावण्याची वेळ आली आहे. या प्रकल्पात नऊपैकी केवळ चार सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहे. शासनाचा अनुदान लाटण्याचा प्रकार एजन्सी धारकांने केला असून निविदा रद्द करण्याची मागणी होत आहे.

सिहोरा परिसरात बावणथडी नदीवर ११० कोटी रुपये खर्च करून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला आहे. प्रकल्पातून उपसा करण्यात आलेले पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. मध्यप्रदेश राज्याचे दुसऱ्या टोकावर असणाऱ्या या प्रकल्पात कोट्यवधी किंमतीचे साहीत्य असल्याने सुरक्षा करण्यासाठी स्वतंत्र पद्धतीने निविदा काढण्यात येत आहेत. वार्षिक पद्धतीने निविदा मंजूर करण्यात येत आहेत. परंतु कधीही एजन्सी धारक नियम व अटींचे पालन करतांना दिसून येत नाहीत. नियमाचे अनुषंगाने नऊ पदे सुरक्षा रक्षकाचे आहेत. सुरक्षा रक्षकांना फक्त आठ तास सेवा बजावण्याचे अटी व शर्तीत नमूद करण्यात आले आहे. त्यांना ड्रेस, ओळखपत्र आदी देण्याचे करारबद्ध करण्यात येत असताना नियम, अटी व शर्तींना एजन्सी धारकांचे करवी पायदळी तुडविण्यात येत आहे. या वर्षीचे टेंडर कुरेशी नामक एजन्सी धारकांना मंजूर करण्यात आले आहे. एजन्सी धारकाने सुरक्षा रक्षक नियुक्ती करतांना आलबेल प्रकार सुरू केला आहे. प्रकल्प स्थळात फक्त चार सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहे. दिवस असताना दोन आणि रात्री दोन अशा सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येत आहे. या सुरक्षा रक्षकाना १२ तास सेवा बजवावे लागत आहे. कार्यरत सुरक्षा रक्षकाना ड्रेस व ओळखपत्र देण्यात आले नाहीत. नियम आठ तासाचे असताना १२ तास सेवा घेतली जात आहे. पंपगृह सुरू करण्यासाठी हल्ला व श्रेय घेण्यासाठी चढाओढ करणारे नेते बंद असणारे पंपगृह सुरू व दुरुस्ती करीता ब्र काढत नाहीत. मात्र प्रकल्प सुरू केल्याचे घेण्यासाठी उदोउदो करीत आहेत. सोंड्याटोला प्रकल्पाने पाण्याचा उपसा सुरू केला आहे.

बॉक्स

स्थिरीकरण योजनेचे काय ?

बावणथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. उन्हाळ्यात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पाण्याचा उपसा करीत नाहीत. वैनगंगा नदीच्या पात्रात बारमाही पाणी राहत असल्याने माजी आमदार चरण वाघमारे यांनी बपेरा चांदपूर स्थिरीकरण योजना मंजुरीचा प्रस्ताव सादर केला आहे. ही योजना चांदपूर जलाशयाला बारमाही तारणारी असून शासनाने या योजनेला मंजुरी दिल्यास रोटेशन पद्धतीला पूर्णविराम मिळणार आहे. या दिशेने भरीव प्रयत्न झाले पाहिजे. यामुळे १२ हजार हेक्टर आर शेती बारमाही ओलिताखाली येणार असून योजनेला मंजुरी देण्याची मागणी युवा नेते किशोर रांहगडाले, ग्रामपंचायत सदस्य शितल चिंचखेडे, सरपंच वैशाली पटले, सरपंच ममता राऊत यांनी केली आहे.