शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:29 IST

चुल्हाड ( सिहोरा ) : बावणथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. सुरक्षा रक्षकांचे नियुक्तीमध्ये एजन्सी ...

चुल्हाड ( सिहोरा ) : बावणथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. सुरक्षा रक्षकांचे नियुक्तीमध्ये एजन्सी धारकाने मनमानी कारभार करीत कपात केले आहे. यामुळे कार्यरत सुरक्षा रक्षकांना १२ तास सेवा बजावण्याची वेळ आली आहे. या प्रकल्पात नऊपैकी केवळ चार सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहे. शासनाचा अनुदान लाटण्याचा प्रकार एजन्सी धारकांने केला असून निविदा रद्द करण्याची मागणी होत आहे.

सिहोरा परिसरात बावणथडी नदीवर ११० कोटी रुपये खर्च करून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला आहे. प्रकल्पातून उपसा करण्यात आलेले पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. मध्यप्रदेश राज्याचे दुसऱ्या टोकावर असणाऱ्या या प्रकल्पात कोट्यवधी किंमतीचे साहीत्य असल्याने सुरक्षा करण्यासाठी स्वतंत्र पद्धतीने निविदा काढण्यात येत आहेत. वार्षिक पद्धतीने निविदा मंजूर करण्यात येत आहेत. परंतु कधीही एजन्सी धारक नियम व अटींचे पालन करतांना दिसून येत नाहीत. नियमाचे अनुषंगाने नऊ पदे सुरक्षा रक्षकाचे आहेत. सुरक्षा रक्षकांना फक्त आठ तास सेवा बजावण्याचे अटी व शर्तीत नमूद करण्यात आले आहे. त्यांना ड्रेस, ओळखपत्र आदी देण्याचे करारबद्ध करण्यात येत असताना नियम, अटी व शर्तींना एजन्सी धारकांचे करवी पायदळी तुडविण्यात येत आहे. या वर्षीचे टेंडर कुरेशी नामक एजन्सी धारकांना मंजूर करण्यात आले आहे. एजन्सी धारकाने सुरक्षा रक्षक नियुक्ती करतांना आलबेल प्रकार सुरू केला आहे. प्रकल्प स्थळात फक्त चार सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहे. दिवस असताना दोन आणि रात्री दोन अशा सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येत आहे. या सुरक्षा रक्षकाना १२ तास सेवा बजवावे लागत आहे. कार्यरत सुरक्षा रक्षकाना ड्रेस व ओळखपत्र देण्यात आले नाहीत. नियम आठ तासाचे असताना १२ तास सेवा घेतली जात आहे. पंपगृह सुरू करण्यासाठी हल्ला व श्रेय घेण्यासाठी चढाओढ करणारे नेते बंद असणारे पंपगृह सुरू व दुरुस्ती करीता ब्र काढत नाहीत. मात्र प्रकल्प सुरू केल्याचे घेण्यासाठी उदोउदो करीत आहेत. सोंड्याटोला प्रकल्पाने पाण्याचा उपसा सुरू केला आहे.

बॉक्स

स्थिरीकरण योजनेचे काय ?

बावणथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. उन्हाळ्यात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पाण्याचा उपसा करीत नाहीत. वैनगंगा नदीच्या पात्रात बारमाही पाणी राहत असल्याने माजी आमदार चरण वाघमारे यांनी बपेरा चांदपूर स्थिरीकरण योजना मंजुरीचा प्रस्ताव सादर केला आहे. ही योजना चांदपूर जलाशयाला बारमाही तारणारी असून शासनाने या योजनेला मंजुरी दिल्यास रोटेशन पद्धतीला पूर्णविराम मिळणार आहे. या दिशेने भरीव प्रयत्न झाले पाहिजे. यामुळे १२ हजार हेक्टर आर शेती बारमाही ओलिताखाली येणार असून योजनेला मंजुरी देण्याची मागणी युवा नेते किशोर रांहगडाले, ग्रामपंचायत सदस्य शितल चिंचखेडे, सरपंच वैशाली पटले, सरपंच ममता राऊत यांनी केली आहे.