शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

साकोली, लाखनीचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: July 12, 2014 00:50 IST

कधी ओला तर कधी सुका दुष्काळ. या निसर्गाच्या चक्रव्युहात शेतकरी व जनसामान्य माणूस विसरल्या जात आहे.

संजय साठवणे साकोलीकधी ओला तर कधी सुका दुष्काळ. या निसर्गाच्या चक्रव्युहात शेतकरी व जनसामान्य माणूस विसरल्या जात आहे. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र यावर्षी निसर्ग मात्र जास्तच कोपलेला दिसतो. पावसाळा लागून एक महिना लोटला तरी पाऊस बेपत्ता आहे. सकाळ आशेचा किरण घेऊन येते. मात्र आता आकाशाकडे पाहावे तर आकाशही कोरडे व नदीनाले तलावही कोरडेच.साकोली तालुक्यातून चुलचंद नदी वाहते. या चुलबंद नदीवर म्हणजेच दुर्गाबाई डोह आहे. या डोहात दरवर्षी मुबलक पाणी राहते. या डोहाची खोली अजूनपर्यंत कुणी मोजली नसली तरी एका खाटेला जेवढी दारी लागते तेवढी खोली या डोहाची आहे. अशी माहिती आहे. मात्र यावर्षी या डोहाचेही पाणी सुकले आहे. त्यामुळे नागरिकांना या दुष्काळाची परिस्थिती येणार याची शक्यता वाटत आहे. याच चुलबंद नदीवर दुर्गाबाई डोहाच्या जवळच निम्न चुलबंद प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे सर्व गेट लाऊन तयार आहेत. फक्त उर्वरित कॅनल व पंपहाऊसचे काम बाकी आहेत. यावर्षी उशिरा पाणी अडविण्यात आले. मात्र दुर्बळ क्षेत्रातील शेतकऱ्यांना अजूनही शेतीचा मोबदला मिळाला नाही.पाणी अडविल्यामुळे या प्रकल्पावर आधारित साकोली व लाखनी तालुक्यातील जलशुद्धीकरण योजना सुरु करण्यात आली. या योजनेकडून दोन्ही तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा सुरु होता.या पाणीपुरवठ्यासाठी दररोज ४० ते ५० लाख लिटर पाणी दररोज लागत होते. मात्र पावसाने दगा दिल्यामुळे हे अडविलेले पाणी व डोहातील पाणी आटल्याने प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे सर्व गेट लाऊन तयार आहेत. फक्त उर्वरीत कॅनल्स व पंपहाऊसचे काम बाकी आहेत. यावर्षी उशिरा पाणी अडविण्यात आले. मात्र डुबीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना अजूनही शेतीचा मोबदला मिळाला नाही.पाणी अडविल्यामुळे या प्रकल्पावर आधारित साकोली व लाखनी तालुक्यातील जलशुद्धीकरण योजना सुरु करण्यात आली. या योजनेकडून दोन्ही तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा सुरु होता. या पाणीपुरवठ्यासाठी दररोज ४० ते ५० लाख लिटर पाणी दररोज लागत होते. मात्र पावसाने दगा दिल्यामुळे हे अडविलेले पाणी व डोहातील पाणी आटल्याने दि. १ जुलै पासून साकोली व लाखनी तालुक्यातील पाणी पुरवठा ठप्प पडला आहे.