शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

ग्रामीण भागात डॉक्टरांच्या दारातील रुग्णांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:15 IST

सिहोरा परिसरातील गावांत गेल्या पंधरवड्यात आजाराचे प्रमाण वाढले होते. घराघरांत रुग्णाची संख्या वाढली होती. कोरोना विषाणू संसर्ग असल्याचे भीतीने ...

सिहोरा परिसरातील गावांत गेल्या पंधरवड्यात आजाराचे प्रमाण वाढले होते. घराघरांत रुग्णाची संख्या वाढली होती. कोरोना विषाणू संसर्ग असल्याचे भीतीने नागरिकांनी शासकीय दवाखान्यात उपचारासाठी जाण्याचे टाळले होते. नागरिकांत गैरसमज निर्माण झाल्याने त्यांनी गावातील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी धाव घेतली होती. यानंतर ग्रामीण भागातील डॉक्टरच्या दारात रुग्णाची गर्दी सुरू झाली होती. सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. गावात तोडक्या सुविधा असताना गोठ्यातच क्लिनिक थाटले. रुग्णांना गोठ्यातच सलाईन लावले, त्यांना तिथेच औषधोपचार करण्यास सुरुवात केली. याच कालावधीत शहरात रुग्णांना बेड, औषधोपचार मिळत नसल्याची चर्चा असल्याने ग्रामीण भागातील रुग्णात कोरोना विषाणू संसर्गच्या आजार विषयी भीती निर्माण झाली होती. याच पंधरवड्याचे कालावधीत मृत्यूचे प्रमाण वाढले होते. यामुळे भीतीला बळ मिळत होते. परंतु आठवडाभरापासून नागरिकांत कोरोना संसर्गाविषयी असणारी भीती निघण्यास सुरुवात झाली आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण आजारातून बाहेर निघत असल्याने भीती नाहीशी होण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात सुरू करण्यास आलेले डॉक्टरांच्या क्लिनिकमधील गर्दी आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. याच कालावधीत गावात मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असल्याने नागरिक आता बिनधास्त होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागात नागरिक आजारातून बाहेर पडले असले तरी लॉकडाऊनचे पालन करीत आहेत. मास्क व सामाजिक सुरक्षाअंतराचे पालन करण्यात येत आहे. गावांत व शेतशिवारात वृक्षलागवड अधिक असल्याने नागरिक बहुतांश वेळ शेतशिवारात घालवत आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याचे कारणावरून शहरात धावाधाव सुरु झाली असताना ग्रामीण भागातील नागरिक ऑक्सिजनकरिता धावपळ करताना दिसत नाही. ना कुलर, ना पंखे फक्त निसर्गाच्या सानिध्यातील शुद्ध हवा घेण्यासाठी नागरिक घराचे बाहेर झोपत आहेत.

बॉक्स

दवाखान्यातील समस्यांचे काय :

चुल्हाड येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात डझनभर असणाऱ्या समस्या निकाली काढण्यात आले नाही. घाईगडबडीत दवाखाना हस्तांतरण करण्यात आले आहे. मूलभूत सुविधा नसल्याने रुग्ण आणि वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली आहे. लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर रणसंग्राम सुरू झाला आहे. आरोग्य सेवेच्या बाबतीत बेजबाबदारपणे यंत्रणा वागली असल्याने नागरिकांत संताप अन् आक्रोश आहे. आरोग्य वर्धिनी केंद्रात पाणीच नाही. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. आरोग्य यंत्रणेला हद कर दी आपणे, असे नागरिक बोलून लक्तरे ओढत आहे. आरोग्य सुविधांचे लचके तोडले जात असताना सिहोरा परिसरातील लोकप्रतिनिधी बिळात लपले असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. संकट काळात लोकप्रतिनिधी मदतीला धावून आले नाहीत.