शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

ग्रामीण भागात डॉक्टरांच्या दारातील रुग्णांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:15 IST

सिहोरा परिसरातील गावांत गेल्या पंधरवड्यात आजाराचे प्रमाण वाढले होते. घराघरांत रुग्णाची संख्या वाढली होती. कोरोना विषाणू संसर्ग असल्याचे भीतीने ...

सिहोरा परिसरातील गावांत गेल्या पंधरवड्यात आजाराचे प्रमाण वाढले होते. घराघरांत रुग्णाची संख्या वाढली होती. कोरोना विषाणू संसर्ग असल्याचे भीतीने नागरिकांनी शासकीय दवाखान्यात उपचारासाठी जाण्याचे टाळले होते. नागरिकांत गैरसमज निर्माण झाल्याने त्यांनी गावातील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी धाव घेतली होती. यानंतर ग्रामीण भागातील डॉक्टरच्या दारात रुग्णाची गर्दी सुरू झाली होती. सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. गावात तोडक्या सुविधा असताना गोठ्यातच क्लिनिक थाटले. रुग्णांना गोठ्यातच सलाईन लावले, त्यांना तिथेच औषधोपचार करण्यास सुरुवात केली. याच कालावधीत शहरात रुग्णांना बेड, औषधोपचार मिळत नसल्याची चर्चा असल्याने ग्रामीण भागातील रुग्णात कोरोना विषाणू संसर्गच्या आजार विषयी भीती निर्माण झाली होती. याच पंधरवड्याचे कालावधीत मृत्यूचे प्रमाण वाढले होते. यामुळे भीतीला बळ मिळत होते. परंतु आठवडाभरापासून नागरिकांत कोरोना संसर्गाविषयी असणारी भीती निघण्यास सुरुवात झाली आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण आजारातून बाहेर निघत असल्याने भीती नाहीशी होण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात सुरू करण्यास आलेले डॉक्टरांच्या क्लिनिकमधील गर्दी आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. याच कालावधीत गावात मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असल्याने नागरिक आता बिनधास्त होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागात नागरिक आजारातून बाहेर पडले असले तरी लॉकडाऊनचे पालन करीत आहेत. मास्क व सामाजिक सुरक्षाअंतराचे पालन करण्यात येत आहे. गावांत व शेतशिवारात वृक्षलागवड अधिक असल्याने नागरिक बहुतांश वेळ शेतशिवारात घालवत आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याचे कारणावरून शहरात धावाधाव सुरु झाली असताना ग्रामीण भागातील नागरिक ऑक्सिजनकरिता धावपळ करताना दिसत नाही. ना कुलर, ना पंखे फक्त निसर्गाच्या सानिध्यातील शुद्ध हवा घेण्यासाठी नागरिक घराचे बाहेर झोपत आहेत.

बॉक्स

दवाखान्यातील समस्यांचे काय :

चुल्हाड येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात डझनभर असणाऱ्या समस्या निकाली काढण्यात आले नाही. घाईगडबडीत दवाखाना हस्तांतरण करण्यात आले आहे. मूलभूत सुविधा नसल्याने रुग्ण आणि वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली आहे. लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर रणसंग्राम सुरू झाला आहे. आरोग्य सेवेच्या बाबतीत बेजबाबदारपणे यंत्रणा वागली असल्याने नागरिकांत संताप अन् आक्रोश आहे. आरोग्य वर्धिनी केंद्रात पाणीच नाही. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. आरोग्य यंत्रणेला हद कर दी आपणे, असे नागरिक बोलून लक्तरे ओढत आहे. आरोग्य सुविधांचे लचके तोडले जात असताना सिहोरा परिसरातील लोकप्रतिनिधी बिळात लपले असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. संकट काळात लोकप्रतिनिधी मदतीला धावून आले नाहीत.