शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात डॉक्टरांच्या दारातील रुग्णांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:15 IST

सिहोरा परिसरातील गावांत गेल्या पंधरवड्यात आजाराचे प्रमाण वाढले होते. घराघरांत रुग्णाची संख्या वाढली होती. कोरोना विषाणू संसर्ग असल्याचे भीतीने ...

सिहोरा परिसरातील गावांत गेल्या पंधरवड्यात आजाराचे प्रमाण वाढले होते. घराघरांत रुग्णाची संख्या वाढली होती. कोरोना विषाणू संसर्ग असल्याचे भीतीने नागरिकांनी शासकीय दवाखान्यात उपचारासाठी जाण्याचे टाळले होते. नागरिकांत गैरसमज निर्माण झाल्याने त्यांनी गावातील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी धाव घेतली होती. यानंतर ग्रामीण भागातील डॉक्टरच्या दारात रुग्णाची गर्दी सुरू झाली होती. सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. गावात तोडक्या सुविधा असताना गोठ्यातच क्लिनिक थाटले. रुग्णांना गोठ्यातच सलाईन लावले, त्यांना तिथेच औषधोपचार करण्यास सुरुवात केली. याच कालावधीत शहरात रुग्णांना बेड, औषधोपचार मिळत नसल्याची चर्चा असल्याने ग्रामीण भागातील रुग्णात कोरोना विषाणू संसर्गच्या आजार विषयी भीती निर्माण झाली होती. याच पंधरवड्याचे कालावधीत मृत्यूचे प्रमाण वाढले होते. यामुळे भीतीला बळ मिळत होते. परंतु आठवडाभरापासून नागरिकांत कोरोना संसर्गाविषयी असणारी भीती निघण्यास सुरुवात झाली आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण आजारातून बाहेर निघत असल्याने भीती नाहीशी होण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात सुरू करण्यास आलेले डॉक्टरांच्या क्लिनिकमधील गर्दी आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. याच कालावधीत गावात मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असल्याने नागरिक आता बिनधास्त होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागात नागरिक आजारातून बाहेर पडले असले तरी लॉकडाऊनचे पालन करीत आहेत. मास्क व सामाजिक सुरक्षाअंतराचे पालन करण्यात येत आहे. गावांत व शेतशिवारात वृक्षलागवड अधिक असल्याने नागरिक बहुतांश वेळ शेतशिवारात घालवत आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याचे कारणावरून शहरात धावाधाव सुरु झाली असताना ग्रामीण भागातील नागरिक ऑक्सिजनकरिता धावपळ करताना दिसत नाही. ना कुलर, ना पंखे फक्त निसर्गाच्या सानिध्यातील शुद्ध हवा घेण्यासाठी नागरिक घराचे बाहेर झोपत आहेत.

बॉक्स

दवाखान्यातील समस्यांचे काय :

चुल्हाड येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात डझनभर असणाऱ्या समस्या निकाली काढण्यात आले नाही. घाईगडबडीत दवाखाना हस्तांतरण करण्यात आले आहे. मूलभूत सुविधा नसल्याने रुग्ण आणि वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली आहे. लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर रणसंग्राम सुरू झाला आहे. आरोग्य सेवेच्या बाबतीत बेजबाबदारपणे यंत्रणा वागली असल्याने नागरिकांत संताप अन् आक्रोश आहे. आरोग्य वर्धिनी केंद्रात पाणीच नाही. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. आरोग्य यंत्रणेला हद कर दी आपणे, असे नागरिक बोलून लक्तरे ओढत आहे. आरोग्य सुविधांचे लचके तोडले जात असताना सिहोरा परिसरातील लोकप्रतिनिधी बिळात लपले असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. संकट काळात लोकप्रतिनिधी मदतीला धावून आले नाहीत.