शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यात वांग्यांना ४० रुपये किलोचा दर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:40 IST

पालांदूर : दररोजच्या महत्त्वाच्या भाज्यात वांग्याला अधिक महत्त्व आहे. हटकून बाजारात प्रत्येक घरात वांगे खरेदी केले जातात. वांग्याचे उत्पन्न ...

पालांदूर : दररोजच्या महत्त्वाच्या भाज्यात वांग्याला अधिक महत्त्व आहे. हटकून बाजारात प्रत्येक घरात वांगे खरेदी केले जातात. वांग्याचे उत्पन्न कमी झाले असून मागणी वाढल्याने वांग्याचे दर ४० रुपये किलो प्रतिदराने विकत आहेत. राजकीय भाषेत वांग्याला अच्छे दिन आल्याची चर्चा भाजी बाजारात होत आहे.

श्राद्ध घरोघरी सुरू झालेले आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्याने एकमेकांच्या घरी ये-जा सुरू झालेली आहे. लहान-मोठे कार्यक्रमही पार पडत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला निश्चितच मागणी वाढली आहे. मागणी पुरवठा याचा विचार करता पुरवठा कमी झाला असून, मागणी अधिक वाढल्याने गत पंधरा दिवसांच्या पूर्वीचे भाज्यांचे दर आता दुपटीने वाढले आहेत. निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी सापडलेला आहे. गत दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाचे दिवस असल्याने वांगी पिकाला किडीचा त्रास अधिकच जाणवत आहे. किडीने चांगले वांग्याचा बाजारात पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे वांग्याला अच्छे दिन आलेले आहेत. शेतकऱ्याच्या वांगी कमी जरी निघत असला तरी भाव अर्थात दर चांगला असल्याने शेतकरीसुद्धा समाधानी दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात भाजीपाल्याची शेती सुधारलेली आहे. ठिबक मल्चिंगचा आधार घेत भाजीपाल्याची शेती केली जात आहे. अख्ख्या पावसातही जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पन्न सुमार आहे. गत पंधरा दिवसांपूर्वी भाजीपाल्याचे भाव जमिनीवर आले होते. मात्र आता भाजीपाल्याला अच्छे दिन आले असून सर्वात जास्त भाव वांग्याला मिळत आहे.

प्रतिकिलो ४० रुपये दराने अगदी काही वेळातच व्यापारी वांग्याला मागणी मिळत आहे. बीटीबी सब्जी मंडी भंडारा येथे चवळी शेंग ३५रुपये किलो, वांगे ४० रुपये किलो, कारले ३० रुपये किलो, फुलकोबी २० रुपये किलो, टमाटर २२० रुपये कॅरेट, मिरची २० रुपये किलो, मेथी भाजी शंभर रुपये किलो, भेंडी २० रुपये किलो, दोडका/ तुरई २० रुपये किलो दर सुरू आहे.

कोट

सर्वाधिक भाव वांग्याला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे वांगी पिकाला फूल आणि फळ कमी झालेले आहे. वांग्याच्या पिकाला किडीचासुद्धा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याने कीडग्रस्त वांग्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे निरोगी वांग्याचे उत्पन्न कमी झालेले आहे. त्यामुळे भाव चाळीस रुपयांच्या घरात आहे.

टिकाराम भुसारी, वांगा उत्पादक शेतकरी, पालांदूर

कोट

भंडारा जिल्हा भाजीपाल्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे. मात्र मागणीच्या तुलनेत वांग्याची आवक कमी झाल्याने बाजारपेठेत वांग्याला सर्वाधिक भाव आहे. वांग्याच्या खालोखाल इतरही भाज्यांना बरा भाव आहे. शेतकऱ्यांनी बागेची नीट काळजी वेळेत घेऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करावा. वांग्याला ४० रुपये किलोचा दर मिळत आहे.

बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी भंडारा.

कोट

वांगा पिकावरील कीड नियंत्रणाकरिता रासायनिक कीटकनाशकाव्यतिरिक्त आणखी इतर उपाय शेतकऱ्यांना सुचविलेले आहेत. विषमुक्त अन्न उपक्रमांतर्गत कीडनाशकात काही पर्याय सुचविलेले आहेत. नैसर्गिकता काही प्रमाणात कीड नियंत्रण शक्य आहे. शेतकऱ्यांनी वांग्याच्या बागेत प्रयोग करून अभ्यास घ्यावा.

किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी, लाखनी