शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

६ कोटीकरिता २४ कोटींचा निधी थकीत

By admin | Updated: September 10, 2014 23:25 IST

बावनथडी प्रकल्पाच्या उर्वरित कामाकरिता केंद्र शासनाने सहा कोटींचा निधी न दिल्याने राज्य शासनाचा २४ कोटींचा निधी प्राप्त होण्यास अडचणी निर्माण झाल्याची माहिती आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या

बावनथडीसाठी मुंबईत बैठक : एआयबीपी समावेशामुळे केंद्राची निधी मिळणे गरजेचेतुमसर : बावनथडी प्रकल्पाच्या उर्वरित कामाकरिता केंद्र शासनाने सहा कोटींचा निधी न दिल्याने राज्य शासनाचा २४ कोटींचा निधी प्राप्त होण्यास अडचणी निर्माण झाल्याची माहिती आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या एआयबीपी अंतर्गत येत असल्याने केंद्र शासन येथे २५ टक्के निधी देते.सन २०१३ मध्ये देशात व राज्यात गारपीट व इतर नैसर्गीक आपत्तीमुळे या प्रकल्पाला २५ टक्के निधी मिळाला नव्हता त्यामुळे मागील वर्षी राज्य शासनाचाही निधी प्राप्त झाला नाही. जलसंपदा विभागाच्या सचिवांनी विदर्भ पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी दि.९ रोजी मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाच्या कामाची सविस्तर माहिती, त्रृट्या, रखडलेली कामे, पुनर्वसन पॅकेज यासंदर्भात चर्चा झाली. यावर्षी पुन्हा केंद्र सरकारकडे २५ टक्के रकमेची मागणी करण्यात आली. केंद्र शासनाला येथे २५ टक्के रक्कम म्हणजे सहा कोटी देणे आहे. त्यानंतर राज्य सरकार २४ कोटींचा निधी मंजूर करेल, अशी माहिती आहे. बावनथडी प्रकल्प केंद्राच्या एआयबीपी योजनेत समाविष्ट असल्याने प्रथम केंद्र शासनाला २५ टक्के निधी द्यावा लागतो. प्रकल्प पूर्णत्वास ७० ते ८० कोटी निधीची गरज असून संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास एक ते दीड वर्षे पुन्हा लागतील. मंगळवारी मुंबई मंत्रालयात झालेल्या वरिष्ठ सचिव व अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम उपस्थित होते. गेडाम यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. (तालुका प्रतिनिधी)