शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

राजकारणात युवकांची भूमिका महत्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 00:20 IST

राजकारणाबाबद वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत झाले आहे. त्यामुळेच राजकारण नको रे बाबा म्हणत युवकवर्ग पळवाटा काढताना दिसत आहे.

हेमंत मलेवार यांचे प्रतिपादन : एनएसयुआयची कार्यकारणी व पक्ष प्रवेश समारंभतुमसर : राजकारणाबाबद वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत झाले आहे. त्यामुळेच राजकारण नको रे बाबा म्हणत युवकवर्ग पळवाटा काढताना दिसत आहे. परंतू राजकारणाची परिभाषा काही औरच असून ती समाजकार्याचे व्रत आहे. चांगला समाज घडविण्यासाठी युवकांनी राजकारणात सहभाग नोंदवून महत्वाची भूमिका नोंदवावी, असे प्रतिपादन एनएसयुआयचे तालुका अध्यक्ष हेमंत मलेवार यांनी केले. एनएसयुआयची नवीन कार्यकारणी तसेच युवकांचा पक्ष प्रवेश समारंभाच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद तितिरमारे, अरविंद कारेमोरे, मनोहर सिंगनजुडे, सिमा भुरे, शंकर राऊत, भूषण टेंभूर्णे, बाळा ठाकूर, जयप्रकाश भवसागर, कान्हा बावनकर, दिलीप चोपकर, शिवदास मलेवार, सद्दाम शेख, अस्मिता वाघमारे, विवेक गायधने, पवन वंजारी, सुनिल बन्सोड उपस्थित होते. मलेवार म्हणाले, भाजप पक्षात बेरोजगार युवकांना सुवर्ण स्वप्ने दाखवून, भुलथापा देत केंद्रात व राज्यात सत्ता स्थापित केली. मात्र अवघ्या दोन वर्षातच त्यांचे पितळ उघडे पडले आहे. भाजपचे दाखवायचे दात वेगळे व खायायचे दात वेगळेच असल्याचे चित्र जनतेसमोर आले आहे. ते चित्र गावागावातील तळागाळातल्या युवकापर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पोहचविण्याचे सामर्थ केवळ युवकातच आहे. युवकांनीही सदविवेक बुद्धीचा वापर करून पक्षाची निवड करण्याच्याही सल्ला दिला. दरम्यान या प्रसंगी ५० च्या वर युवक-विद्यार्थ्यांनी एनएसयुआयमध्ये प्रवेश घेतला. संचालन व आभार अनिल मांडके यांनी केला. (शहर प्रतिनिधी)