शहरं
Join us  
Trending Stories
1
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
4
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
5
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
6
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
7
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
8
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
9
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
10
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
11
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
12
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
13
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
14
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
15
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
16
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
17
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
18
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
19
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
20
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात युवकांची भूमिका महत्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 00:20 IST

राजकारणाबाबद वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत झाले आहे. त्यामुळेच राजकारण नको रे बाबा म्हणत युवकवर्ग पळवाटा काढताना दिसत आहे.

हेमंत मलेवार यांचे प्रतिपादन : एनएसयुआयची कार्यकारणी व पक्ष प्रवेश समारंभतुमसर : राजकारणाबाबद वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत झाले आहे. त्यामुळेच राजकारण नको रे बाबा म्हणत युवकवर्ग पळवाटा काढताना दिसत आहे. परंतू राजकारणाची परिभाषा काही औरच असून ती समाजकार्याचे व्रत आहे. चांगला समाज घडविण्यासाठी युवकांनी राजकारणात सहभाग नोंदवून महत्वाची भूमिका नोंदवावी, असे प्रतिपादन एनएसयुआयचे तालुका अध्यक्ष हेमंत मलेवार यांनी केले. एनएसयुआयची नवीन कार्यकारणी तसेच युवकांचा पक्ष प्रवेश समारंभाच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद तितिरमारे, अरविंद कारेमोरे, मनोहर सिंगनजुडे, सिमा भुरे, शंकर राऊत, भूषण टेंभूर्णे, बाळा ठाकूर, जयप्रकाश भवसागर, कान्हा बावनकर, दिलीप चोपकर, शिवदास मलेवार, सद्दाम शेख, अस्मिता वाघमारे, विवेक गायधने, पवन वंजारी, सुनिल बन्सोड उपस्थित होते. मलेवार म्हणाले, भाजप पक्षात बेरोजगार युवकांना सुवर्ण स्वप्ने दाखवून, भुलथापा देत केंद्रात व राज्यात सत्ता स्थापित केली. मात्र अवघ्या दोन वर्षातच त्यांचे पितळ उघडे पडले आहे. भाजपचे दाखवायचे दात वेगळे व खायायचे दात वेगळेच असल्याचे चित्र जनतेसमोर आले आहे. ते चित्र गावागावातील तळागाळातल्या युवकापर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पोहचविण्याचे सामर्थ केवळ युवकातच आहे. युवकांनीही सदविवेक बुद्धीचा वापर करून पक्षाची निवड करण्याच्याही सल्ला दिला. दरम्यान या प्रसंगी ५० च्या वर युवक-विद्यार्थ्यांनी एनएसयुआयमध्ये प्रवेश घेतला. संचालन व आभार अनिल मांडके यांनी केला. (शहर प्रतिनिधी)