शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद

By admin | Updated: June 18, 2015 00:36 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे बांधकाम केले. रस्ते बांधकाम, दुरुस्ती व देखभालची जबाबदारी खासगी..

नाल्यात घनकचरा : रात्री होतो त्रास, खोलगट जागेमुळे पाणी साचते, उड्डाण पुलाखाली अंधाराचे साम्राज्यजवाहरनगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे बांधकाम केले. रस्ते बांधकाम, दुरुस्ती व देखभालची जबाबदारी खासगी कंत्राटदाराला दिली असून तसा करारनामा करण्यात आला आहे. मात्र, दोन महिन्यापासून पथदिवे व उड्डाण पूलाखालील दिवे बंद अवस्थेत आहे. परिणामी रस्त्यावरील वाहनधारक व पादचारी यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुजबी येथील ४८५ मैल दगडापासून ते नागपूर येथील ५४३.६३० मैल पारडी नाका पर्यंत दगड रस्त्यावर उड्डाण पुलाखाली व बायपास रस्त्यावरील बोगद्यामध्ये विद्युत व्यवस्था खासगी कंत्राटदारातर्फे करारनाम्यानुसार करण्यात यायला पाहिले. मात्र, ठाणा पेट्रोलपंप, खरबी (नाका), शहापूर, फुलमोगरा येथील पथदिवे मागील महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. ठाणा पेट्रोलपंप येथील उड्डाण पुलाखालील एका बाजूचे पथदिवे दोन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तथा वाहनधारकांना गाव व गावचे नामफलक वाचण्यास कमालीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अस्तित्वात असलेले पथदिवे रात्री अपरात्री बंद केले जाते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील चोरटी आयात निर्यातीला व गाव खेड्यातील चोरट्या भामट्यांना रान मोकळे झाले आहे. माथनी येथील टोलनाका सुरु झाला आहे. संक्षिप्त टिप्पण क्रमांक २.०१ मध्ये उल्लेखीत करारानुसार वैद्यकीय सोयीसुविधा, रस्ता बांधकाम, रस्त्यावरील पथदिवे, नाल्याचा रखरखाव, रस्त्यावरील अडथळे दूर करण्याकरिता मोबाईल पथक चालविणे याकरिता हलके व जड चारचाकी व वरील वाहन धारकाकडून करारस्वरुपात पथकर घेतला जातो. मात्र सद्य:स्थितीत महामार्गावरील नवीन नाल्यामध्ये घनकचरा साचलेला आहे. काही ठिकाणी अपुरे व योग्य दिशा नसलेल्या नाल्या भूईसपाट झालेल्या आहेत. पावसाचे आगमन झालेले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पाणी हे रहदारी किंवा रस्त्यावरच साचत आहे. बायपास रस्त्यावरील बोगदा व खोलगड असल्यामुळे पाणी साचून राहत आहे. परिणामी पादचारी, दुचाकी वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी एकाच ठिकाणी संग्रहित करून परिसरातील पाण्याची पातळी वाढीसाठीची रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी ५०० मिटर मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची तरतूद आहे. मात्र असे कुठेच बांधकाम करण्यात आलेले नाही. रस्त्यावरील पाणी मोकाट सोडण्यात आलेले आहे. बंद अवस्थेत पडलेले पथदिवे, असुविधाजनक असलेले ठिकाणाकडे जिल्ह्यातील वरिष्ठ व संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)