शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

आमगावातील रस्ते चिखलात

By admin | Updated: July 18, 2016 01:30 IST

आमगाव शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची दरवर्षी दुरूस्ती व अपूर्ण बांधकामावर शासनाकडून

नागरिकांना प्रचंड त्रास : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह आमगाव : आमगाव शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची दरवर्षी दुरूस्ती व अपूर्ण बांधकामावर शासनाकडून निधी खर्च करण्यात येतो;परंतु नियोजनबध्द व कामावरील अनियमिततेमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मागील वर्षी बांधकाम झालेले डांबरीकरण रस्ते खड्यात व चिखलमय झाले आहे. या रस्त्यावरील मार्गक्रम करतांना नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. आमगाव ग्रामीण भागातील आमगाव पाऊलदौना, तिगाव, मुंडीपार, सुपलीपार, कातुर्ली, शिवनी, जवरी, सावंगी या मार्गावरील डांबरीकरण रस्ते दुरूस्ती व बांधकाम करण्यात आले. परंतु योग्य नियोजनाअभावी या रस्त्यांची वाताहात झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पडले. त्याते पाणी साचल्याने मार्गक्रम करणाऱ्यांसाठी हे खड्डे धोक्याची घंटा वाजवित आहेत. आमगाव, मुंडीपार, कट्टीपार व कालीमाटी या मार्गावरील रस्त्यांची वाताहात आहे. कालीमाटील घाटटेमनी, भोसा, कातुर्ली मार्ग डांबरीकरण रस्त्याअभावी खड्यात रुपांतर झाले आहे. जामखारी, तिगाव, पाऊलदौना, कुंभारटोली या गावातील मुख्य मार्ग डांबरीकरण रस्त्यांच्या दैनावस्थेमुळे चिखलमय झाले. एक ते दीड फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. तीच अवस्था किंडगीपार, जवरी व शिवनी मार्गावर दिसत आहे. परंतु संबंधीत विभागाने दखल घेतली नाही. या मार्गावरील नियोजनबध्द बांधकामाला लोकप्रतिनिधींनीच पाठ फिरविल्याने यापूर्वी झालेल्या बांधकामावरील निधी पाण्यात गेला. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात २०१४-१५ व २०१५-१६ या आर्थिक वर्षात डांबरीकरण रस्ते बांधकाम व दुरूस्ती करण्यात आली. या बांधकामावर निधीचा खर्च करण्यात आला. परंतु बांधकाम नियोजनबध्द व योग्य बांधकामाअभावी सदर रस्ते पुन्हा पावसाळ्यात वर्ष लोटण्याआधी खड्यात रुपांतरीत झाले. आमगाव शहरातील मुख्य रस्ते दरवर्षी बांधकाम व दुरुस्ती करूनही खड्यात का रुपांतरीत होतात हा संशोधनाचा विषय नागरिकांसाठी आहे. नगरातील गांधी मार्ग ते नटराज मार्ग, बाजार समिती मार्ग, कामठा चौक मार्ग, लांजी मार्ग, पंचायत समिती मार्ग, किडंगीपार बायपास मार्ग, आंबेडकर मार्ग ते कुंभारटोली मार्गावरील दरवर्षी दुरूस्ती व बांधकाम झाल्यावरही या रस्त्यांची दैनावस्था कायम आहे. संबंधित विभागातील अधिकारी व कंत्राटदार यांच्या अनियमिततेमुळे बांधकाम निकृष्टपणे करण्यात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची वाताहत झाली आहे. रस्त्यांवर मार्गक्रमन करण्यासाठी नागरिकांना पायी चालणे कठीण झाले आहे. या निकृष्ट रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनामुळे नागरिकांना अपघातांना समोर व्हावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)