शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

रेती वाहतुकीने रस्त्यांची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:40 IST

रेती वाहतुकीतील अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे. रेतीघाटालगतच्या गावातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. याचा नाहक भुर्दंड बांधकाम विभागाला बसत असून महसूल आणि परिवहन विभाग मात्र अशा वाहन धारकांवर कोणतीही कारवाही करताना दिसत नाही.

ठळक मुद्देबांधकाम विभागाला भुर्दंड : लिलावापूर्वीच सुरू आहे घाटांमध्ये खनन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेती वाहतुकीतील अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे. रेतीघाटालगतच्या गावातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. याचा नाहक भुर्दंड बांधकाम विभागाला बसत असून महसूल आणि परिवहन विभाग मात्र अशा वाहन धारकांवर कोणतीही कारवाही करताना दिसत नाही.भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदीपात्रासह चुलबंद, सुर नदी, बावनथडी आणि नाल्यांमधून रेतीचे मोठ्या प्रमाणात खनन केले जात आहे. पवनी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून वाहणाऱ्या वैनगंगेच्या पात्रातून रेतीचे उत्खनन अहोरात्र सुरु आहे. जेसीबी मशीनद्वारे उत्खनन करुन ट्रक व ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. बहुतांश वाहने क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेतात. राज्य व जिल्हा मार्गावरुन रेतीची वाहने धावत असल्याने रस्त्याची दुदर्शा झाली आहे. अनेक रेतीघाटालगतचे रस्ते या वाहनांमुळे उखडले आहेत. महसूल विभागाला यातून महसूल मिळत असला तरी त्याचा भुर्दंड मात्र बांधकाम विभागाला सोसावा लागत आहे.रस्त्यांवर पडलेल्या या खड््यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेकदा बांधकाम विभाग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करतात. मात्र अहोरात्र सुरु असलेल्या या वाहतुकीने पुन्हा खड्डे जैसे थे होतात. याचा त्रास या मार्गावरुन जाणाºया वाहनधारकांसह गावकऱ्यांनाही सहन करावा लागतो. विशेष म्हणजे अवजड वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार परिवहन विभागाला आहे. परंतू रेती वाहतुकीच्या संदर्भात कारवाई करताना केवळ पोलीस व महसूल विभागच दिसतो. परिवहन विभाग अशा वाहनांवर कारवाई करीत नाही. त्यांना दंड आकारत नाही. त्यामुळे अशा वाहन चालकांचे मनोबल वाढले आहे. यंदा तर अद्यापही जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे महसुल विभागालाही महसुल प्राप्त नाही. परंतु रस्त्याची दुदर्शा मात्र होत आहे.रेतीचा परवाना काढताना त्यावरच किती ब्रास रेती वाहुन न्यायची आहे, हे ठरलेली असते. परंतु अधिक पैसे कमविण्याच्या नादात रेती तस्कर रस्त्यांची वाट लावत आहेत.