शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

रस्ता दुरुस्तीचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: January 27, 2015 23:28 IST

सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी अंतर्गत असलेल्या खडकी पालोरा ३ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन महिन्यापूर्वी मंजूर झाले. मात्र कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

युवराज गोमासे - करडी पालोरासार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी अंतर्गत असलेल्या खडकी पालोरा ३ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन महिन्यापूर्वी मंजूर झाले. मात्र कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची पार एैसीतैसी झाली आहे. रस्त्यावर दोन मोठे अपघात झाले. १५ दिवसापूर्वी खडकी येथील एका मुलीचा अपघातात मृत्यू झाला. परंतु विभाग जाणे व्हायला तयार नाही. आणखी बळी हवे आहेत काय? विभाग आणि ठेकेदाराला असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.खडकी ते पालोरा ३ कि.मी. अंतरामध्ये मोजून ३५० खड्डे पडले आहेत. रस्ता आहे की मृत्यूचा द्वार हे समजण्याअगोदर वाहन चालक खड्ड्यात कोसळतो. विभागाला मात्र काहीही देणे घेणे वाटत नाही. शासनाने सदर कामाला दोन महिन्यापूर्वीच मंजूरी दिली आहे. पॅचेसचे काम मंजूर करून ६ लाखाचा निधीही दिला आहे. संबंधित ठेकेदाराला कामाचे कंत्राट झाले असताना बांधकामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. ठिकठिकाणी रस्ता उखडला असून गिट्टी सर्वदूर पसरली आहे. खोल खड्डे, आडव्या नाल्या रस्त्यावर पडल्याने वाहन चालक रस्त्यावरून वाहने न चालविता काठाने चालवित आहेत. काही खड्यांजवळ चार ते पाच ठिकाणी गिट्टी टाकली गेली असून संपूर्ण रस्ताच बंद करण्यात आला आहे. वाहने चालविणे फार धोक्याचे काम होऊन बसले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. वाहने वारंवार बिघडत असून पंक्चर होणे, इंधनाची नासाडी होणे, प्रवाशांच्या वेदना होणे नेहमीच बाब होऊन बसली आहे. सर्वच राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींचे सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असून सत्ता पक्षाचे लोक शब्द काढायला तयार नाहीत. सत्ताधारी पक्षांनी साधलेली चुप्पी दु:खदायक आहेत. कसे येणार अच्छे दिन? कुठे आहेत नागरिकांसाठी अच्छे दिन? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जबाबदारी स्वीकारण्यास लोकप्रतिनिधी घाबरत आहेत. आतापर्यंत इतरांना दोष देणारे, मोठमोठी भाषणे ठोकणारे या विषयावर बोलत नाहीत, ही शोकांतिका आहे. या रस्त्यावर दोनदा मोठे अपघात घडले. १५ दिवसापूर्वी घरासमोर खडकी येथील मुलीचा खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालकाकडून हकनाक जीव गेला. ठेकेदाराची मनमानी हा चिंतेचा विषय असला तरी सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचा जवळचा व तालुक्याचा प्रमुख पदाधिकारी असल्याने अधिकारी कंत्राटदाराचा मनमानी कारभार खपवून घेत आहेत. रस्ता मात्र नागरिकांना हैराण करीत आहे.