शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

कारधा ते निलज रस्ता झाला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:36 IST

कारधा ते निलज या रस्ता बांधकामासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे तर काही ठिकाणी माती ...

कारधा ते निलज या रस्ता बांधकामासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे तर काही ठिकाणी माती टाकून ठेवली आहे. पवनी पुलापासून ते नगरपरिषद महाविद्यालय पवनीपर्यंतचा रोड या ठिकाणी मातीचे भरण टाकून सहा महिने लोटून गेले. परंतु अजूनही काम केले नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. माती टाकून ठेवल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून या रोडवरुन जावे लागते. रस्त्याच्या कडेला असलेली घरे आणि दुकानांमध्ये धुळच धूळ असते. धुळीचा त्रास सहन न झाल्याने काही दिवसांपूर्वी नागरिकांना रस्त्यावर येऊन आंदोलन देखील करावे लागले होते. पवनीच्या पुलावर मोठे खड्डे व पुलाच्या दोन्ही बाजूला माती जमा झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील तर त्याला ब्लॅक स्पॉट घोषित करून तेथे बदल करावा, असे सांगितले आहे. परंतु इतके अपघात होऊन व मृत्यू होऊन बांधकाम कंपनी, कंत्राटदार आणि प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. अपघाताच्या तांत्रिक चुका काय, याचे विश्लेषण करण्याची तसदी सुद्धा संबंधित अधिकारी घेत नाही. याकडे लक्ष घालून लवकरात लवकर योग्य ते नियोजन करून नागरिकांचे जाणारे नाहक प्राण वाचवावे व दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, यानंतर अपघातात कुणाचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.