शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

रिक्षाचालकांचे कधी राइट, तर कधी लेफ्ट पळवापळवीने प्रवाशांना वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST

भंडारा : कोरोना संसर्गाचा परिणाम सर्वच व्यवसायांवर दिसून येत आहे. अनेक व्यवसाय आता पूर्वपदावर येत असले तरीही रिक्षा व्यावसायिक ...

भंडारा : कोरोना संसर्गाचा परिणाम सर्वच व्यवसायांवर दिसून येत आहे. अनेक व्यवसाय आता पूर्वपदावर येत असले तरीही रिक्षा व्यावसायिक अद्यापही कर्जाच्या संकटातून सावरलेले नाहीत. रिक्षाचालकांना कधी एक, तर कधी दोनच प्रवासी मिळतात. त्यामुळे त्याच दोन प्रवाशांना घेऊन कधी बसस्थानक, तर कधी गांधी चौक, वरठी रेल्वे स्टेशनवर लेफ्ट, राइट करीत रिक्षाचालक सारख्या फेऱ्या मारतात. किमान पाच प्रवासी मिळेपर्यंत तरी रिक्षाचालक वरठीवरून भंडाऱ्याला येत नसल्याने प्रवासी संतापतात. त्यातच एसटी महामंडळाने ग्रामीण बसफेऱ्या कमी केल्याने प्रवासी नाइलाजास्तव रिक्षामध्ये बसतात. मात्र, वाढलेले डिझेलचे दर, तसेच पूर्वीप्रमाणे प्रवासी वाहतूक सुरू नसल्याने रिक्षाचालक दिवसभर प्रवाशांची पळवापळवी करतानाचे चित्र बसस्थानक परिसरात दिसून येते.

बॉक्स

याठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी...

भंडारा बसस्थानक परिसरात तर बाराही महिने प्रवाशांची पळवापळवी सुरू असते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वेळेवर बसफेऱ्या नसल्याने अनेक खाजगी वाहनधारक बसस्थानकात घुसून प्रवाशांच्या शोधात असतात.

वरठी रेल्वेस्थानकात प्रवाशांना नेहमीच रिक्षाचालकांच्या मनमानीचा सामना करावा लागतो. अर्धाअर्धा तास रिक्षाचालक प्रवाशांना ताटकळत थांबून ठेवतात, तर कधी सात-आठ प्रवासी रिक्षात कोंबून धोकादायक पद्धतीने रिक्षा पळवितात.

राष्ट्रीय महामार्गावर त्रिमूर्ती चौकात खाजगी वाहनधारक हे प्रवाशांच्या प्रतीक्षेत दिसतात. दररोज येथे प्रवासी मिळविण्यासाठी जणूकाही वाहनधारकांची स्पर्धाच लागल्याचे चित्र अनेकदा दिसून येते.

कोट

प्रवाशांना त्रास

खाजगी वाहनांतून प्रवास करताना अनेकदा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. यावर पोलिसांचा अंकुश असणे गरजेचे आहे. कधीकधी हे वाहनधारक हुज्जतही घालतात.

पल्लवी खोब्रागडे, प्रवासी

मी कॉलेजच्या कामासाठी नेहमीच भंडाऱ्याला जाते. मात्र, ग्रामीण भागात एसटी अजूनही येत नसल्याने मला खाजगी रिक्षानेच भंडाऱ्याला जावे लागते. प्रवासी मिळेपर्यंत तासन्तास ऑटोमध्येच बसून राहावे लागते.

बॉक्स

मनमानी भाडे ...

भंडारा ते ठाणे पेट्रोल पंपापर्यंत सुरुवातीला पंधरा रुपये घेतले जायचे. मात्र, आता वीस रुपये घेतले जातात. त्यासोबत लाखणी ते भंडारा या मार्गावरही वाहनधारक प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारतात. वरठी ते भंडाऱ्याला पूर्वी वीस रुपये तिकीट होते. मात्र, आता डिझेल महागल्याने ३० रुपये खाजगी रिक्षा चालक प्रवाशांकडून वसूल करतात. भंडारा शहरातील बसस्थानक ते तुकडोजी वाॅर्डपर्यंत ८० रुपये घेतले जात आहेत.