शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सिंचन प्रकल्पांना पुनरुज्जीवित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:31 IST

सिंचनाची सोय करणाऱ्या प्रकल्पांना सौर उर्जेची जोड देण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. यामुळे थकीत विज देयकाने भंगारात निघालेल्या सिहोरा परिसरातील दोन प्रकल्पांना संजिवनी....

ठळक मुद्देबपेरा, पिपरी चुन्हीचे प्रकल्प भंगारात : बारमाही सिंचनाची सोय होणार

ऑनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : सिंचनाची सोय करणाऱ्या प्रकल्पांना सौर उर्जेची जोड देण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. यामुळे थकीत विज देयकाने भंगारात निघालेल्या सिहोरा परिसरातील दोन प्रकल्पांना संजिवनी व पुनरुज्जीवित करण्याची ओरड सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे अनेक हेक्टर शेती बारमाही ओलिताखाली येणार आहे.बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन योजना मंजूर होण्यापूर्वी सिहोरा परिसरात असणाºया वैनगंगा नदीवर शेतकºयांनी स्वत:च सिचंनाची सोय करण्यासाठी प्रकल्प उभारले आहे. गाव व शेजारी गावाचे हद्दीत अंदाजे ६०० हेक्टर आर शेती ओलिताखाली आणण्याचे कार्य या बंद असणाºया प्रकल्पांनी केले आहे. बारमाही १२०० हेक्टर आरहून अधिक शेती सिंचित करण्याची क्षमता दोन प्रकल्पात आहे. बपेरा आणि पिपरी चुन्ही गावात स्वत: प्रकल्पाचे नहर असणारी ही प्रकल्प दिमाखात उभी आहे. प्रकल्पस्थळात वाढते विजेचे देयक आणि धान पिकाचे नुकसान यामुळे पाणीपट्टी कराचे देयक शेतकºयांनी केले नाही.याशिवाय निधीअभावी पंपगृहांची दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे प्रकल्प बंद करण्याचा निर्णय समितीने घेतला. गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पाची वास्तू उभी असताना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले नाही. याच काळात वैनगंगा नदी पात्रात उन्हाळ्यात पाण्याची समस्या होती. परंतु आता नदी पात्रात बारमाही पाणी राहत आहे. या प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आर्थिक मदतीची जोड देण्याची गरज आहे. बारमाही सिंचनाची सोय करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन योजना असली तरी या योजनेने १४ हजार हेक्टर आर शेतीला बारमाही कधी ओलीताखाली आणले नाही. यामुळे वैनगंगा नदी काठावर असणारे बपेरा आणि पिपरी चुन्ही गावातील दोन्ही प्रकल्प शेतकºयांना 'सोने पे सुहागा' ठरणारी आहेत. दरम्यान शासनाने प्रकल्पांना सौर उर्जेवर आणण्याचे प्रयत्न सुरू केली आहेत. यामुळे शेतकºयांना स्वस्त दरात पाणी सिंचनासाठी मिळणार असले तरी, उन्हाळ्यात सोंड्याटोला प्रकल्प नदी पात्रातून पाण्याचा उपसा करू शकत नाही. यामुळे बारमाहीचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार असल्याने बपेरा व पिपरी चुन्हीचे बंद असणारे प्रकल्प सुरू करण्याची ओरड आहे.बपेरा आणि पिपरी चुन्हीत बंद असणाºया प्रकल्पांना नव्याने पुनरुज्जीवित केल्यास शेतकºयांना बारमाही सिंचनाची सोय होणार आहे. राज्य शासनाने लक्ष केंद्रीत करण्यासाठी शेतकºयांचे स्वाक्षरीनिशी पत्र पाठविणार आहे.-मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ, सिंदपुरी.