शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

महसूल मंडळनिहाय पिकांचे फेर सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात धानपिक उध्वस्त झाला. शेतकरी देशोधडीला लागले. मात्र शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात धानपिक उध्वस्त झाला. शेतकरी देशोधडीला लागले. मात्र शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड रोश निर्माण झाला आहे. आता महसूल मंडळनिहाय पीक पाहणी करून फेरसर्व्हेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाश्वभूमीवर शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बावनकुळे यांनी लोकप्रतीनिधीवर प्रशासकीय अधिकाऱ्याशी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा महसूल मंडळनिहाय फेरसर्व्हेक्षण करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.या बैठकीला आमदार चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, बाळा काशीवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, महसूल उपजिल्हाधिकारी सुहास चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत सर्व आमदारांनी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आग्रही मागणी लावून धरली. दुष्काळातून सुटलेल्या तालुक्यांसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीसमोर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.नुकसानग्रस्त व गरजु एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. नुकसानग्रस्त महसूल मंडळात ग्रामपंचायतीमध्ये पीक पाहणीचा अंदाज घेण्यासाठी पीक कापणीचे अतिरिक्त चार प्रयोग करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिली.दुष्काळात सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जास्तीत जास्त शेतकºयांना मदत मिळेल याची काळजी घ्यावी. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पालकमंत्री म्हणून शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळून देण्यात येईल. अजुनही वेळ गेली नाही. शेतकºयांनी काळजी करू नये, असे आश्वासन त्यांनी दिले.पीक कापणी प्रयोगाला पालकमंत्री उपस्थित राहणारजिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निश्चितच मदत करणार, अशी ग्वाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले ज्या महसूल मंडळात अधिक नुकसान झाले, अशा सर्व मंडळातील गावात पीक कापणीचे अतिरिक्त प्रयोग घेवून फेर सर्व्हेक्षण करण्यात यावा. यावेळी आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोबत घ्यावे. त्यांच्या सहमतीने अहवाल तयार करावा, पीक कापणी प्रयोगाला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.