शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

पवनी तालुक्यात राजस्व अभियान ठरले नावापुरते

By admin | Updated: August 16, 2014 23:18 IST

पवनी तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे दोन महिन्यापासून महसूल अधिकाऱ्यांची सही न झाल्याने भंडारा येथे पडून आहेत. तसेच वर्ग दोनचे प्रकरण अनेक महिन्यापासून निकाली न निघाल्याने

पवनी : पवनी तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे दोन महिन्यापासून महसूल अधिकाऱ्यांची सही न झाल्याने भंडारा येथे पडून आहेत. तसेच वर्ग दोनचे प्रकरण अनेक महिन्यापासून निकाली न निघाल्याने सुवर्ण जयंती राजस्व अभियानाबद्दल पवनी तालुक्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आले. यामध्ये शाळा महाविद्यालयात प्रमाणपत्रे वाटप, फेरफार, वर्ग २ चे वर्ग १ प्रकरण निकाली काढणे असे अनेक कार्यक्रम आहेत. पण सध्या पवनी तालुक्यातील शेकडो वर्ग २ चे वर्ग १ साठी प्रकरण भंडारा येथे पडून आहेत. तसेच जातीचे, नॉन क्रिमिलीयर, अधिवास असे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी पवनी तहसील कार्यालयामध्ये प्रमाणपत्र बनविण्यासाठी दिले आहेत. ते प्रकरण भंडारा येथे पाठविण्यात आले आहेत. पण त्या प्रमाणपत्रावर दोन महिन्यापासून सह्या झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतात. वर्ग दोनचे प्रकरण वर्ग १ करण्यासाठी शेतकऱ्यांनी बंदोबस्त मिसल, हिस्सा फार्म, नवीन जुना सातबारा असे सर्व कागदपत्रे देऊन अनेक प्रकरणे तहसील कार्यालय पवनी येथे तलाठ्यामार्फत दिली. पण वर्ग दोनचे वर्ग एक प्रकरण अनेक महिन्यापासून मंजूर झाले नाही. राजस्व अभियानात देखील शेतकऱ्यांनी अनेक वर्ग १ चे प्रकरण तलाठ्याकडे दिली पण ती अजूनपर्यंत निकाली निघाले नाही. राजस्व अभियान महसूल प्रशासन गतीमान सुलभ व लोकाभिमुख होण्यासाठी की लोकांना त्रास देण्यासाठी आहे असा प्रश्न अनेक शेतकरी विचारीत आहेत. फेरफार प्रकरणे देखील लवकर निकाली लागत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तरी महसूल विभागाने गतीमान, सुलभ होण्यासाठी प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याची मागणी जनतेने केली आहे. (प्रतिनिधी)