शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

अपंग कर्मचाऱ्यांची फेरतपासणी करा

By admin | Updated: May 27, 2016 00:56 IST

केंद्र शासन व राज्य शासनाकडून अपंग दिव्यांग कर्मचाऱ्यांना विविध सूट व सवलती देण्यात येतात.

जिल्ह्यात अनेक बोगस अपंग कर्मचारी : काशिनाथ ढोमणे यांची मागणीभंडारा : केंद्र शासन व राज्य शासनाकडून अपंग दिव्यांग कर्मचाऱ्यांना विविध सूट व सवलती देण्यात येतात. मात्र याचा लाभ खऱ्या अपंग कर्मचाऱ्यांना मिळण्यापेक्षा बोगस अपंगांना मिळत आहे. कुठल्याही प्रकारचे अपंगत्व नसताना अनेक कर्मचारी बोगस अपंगत्वाचे सर्टिफिकेट मिळवून त्या आधारे अपंग कर्मचारी म्हणून लाभ घेत आहेत. यामुळे खऱ्या अपंग कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. परिणामत: खऱ्या अपंगांना लाभ मिळण्यासाठी सर्व अपंग कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बोर्डाकडून फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी, कर्मचारी संघटनेचे राज्य संचालक काशिनाथ ढोमणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व अपंग आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.अपंग कर्मचारी यांना शासनाने अपंग वाहतूक भत्ता, व्यवसायकरातून सुट, पदोन्नतीत ३ टक्के आरक्षण, नियुक्तीत ३ टक्के आरक्षण, बदली मध्ये सुट व सवलती, निवडणूक कामातून सुट यासारख्या विविध सोयी-सवलती लागू केल्या आहेत. या सवलती खऱ्या व नैसर्गीक अपंगांना मंजूर करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी, कर्मचारी संघटना मुंबईच्या वतीने सतत प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या सहा-सात वर्षापासून शंकास्पद व बोगस अपंग कर्मचारी यांचे प्रमाण अचानक वाढले आहेत. शासनाने सन २०१२ मध्ये अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील १ भाग मधील तरतुदीनुसार अपंग कर्मचारी, शिक्षक यांना प्रशासकीय बदली व समायोजन प्रक्रियेतून सूट दिल्याने या संधीचा फायदा घेवून जिल्ह्यातील कर्णबधीर, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग अपंग शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र अचानकपणे काढून जिल्हा परिषदमध्ये धुमाकूळ माजविलेला आहे. या अपंगामुळे खऱ्या नैसर्गीक अस्थिव्यंग, अंध, अल्पदृष्टी, कर्णबधीर प्रवर्गातील अपंगांना त्रास होत आहे. कोणतेही अपंगत्व नसताना बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नती सुद्धा मिळविली आहे. जिल्ह्यात सुमारे २०० ते २५०० बोगस अपंग शिक्षक, कर्मचारी या संधीचा फायदा घेत आहेत. ( प्रतिनिधी)