शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

पुनर्वसनासाठी राखीव जमीन हस्तांतरणाचे निर्बंध काढले

By admin | Updated: May 29, 2016 00:35 IST

आठ एकरावरील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसनासाठी राखीव करून ठेवण्यात आलेल्या होत्या.

चरण वाघमारे यांची पत्रपरिषदेत माहिती : २०१७ पर्यंत बावनथडीचा संपूर्ण मोबदला मिळणारभंडारा : आठ एकरावरील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसनासाठी राखीव करून ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनी विकण्यासाठी बंदी होती. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निर्बंध हटविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी विकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार चरण वाघमारे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.२०१७ पर्यंत बावनथडी होणार बावनथडी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु असून १४०० खातेदारांना थेट जमिनीचा मोबदला देण्याची कारवाई सुरू आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेता लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदल्याबाबत आक्षेप असल्यास कार्यालयात तक्रारी नोंदवाव्यात, असे निर्देश देऊन आक्षेप नोंदवायाचे आवाहन केले होते. त्यानुसार १५० च्यावर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यावर सुनावणी घेऊन आक्षेप निकाली काढावे, अशा सूचना देण्यात आले आहे. मागील दोन वर्षात बावनथडीला दोनशे कोटी रूपये प्रकल्पासाठी मिळाले असून २०१७ पर्यंत प्रकल्पाचे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यासह कामे पूर्ण करण्यात येतील.खिंडसी कालव्याचे पाणी कांद्री परिसरातया प्रकल्पाचे पाणी मोहाडी तालुक्यातील कांद्री परिसरातील हिवरा, वासेरा, फुटाळा, कांद्री आणि जांब परिसरातील शेतीला मिळावा म्हणून शासनाने मंजुरी दिलेली असून अंदाजपत्रक मंजुरीची कारवाई सुरु आहे. गावाच्या परिसरातील शेतीला शाश्वत सिंचनाचे साधन नसल्याने या कालव्यामुळे रामटेक तालुक्यातील अनेक गावातील शेतीला आणि मोहाडी तालुक्यातील वरील गावाच्या परिसरातील शेतीला फायदा होईल.बावनथडीच्या पाण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देशबावनथडीचे पाणी कुरमुडा वितरिकेवरून तुमसर तालुक्यातील गणेशपूर तलावात सोडण्याची मंजूरी देण्यात यावी अशी मागणी असून पाटबंधारे मंत्र्यांनी १५ दिवसात सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. याला मंजुरी मिळाल्यास सीतासावंगी, पवनारखारी, येदरबुची, सुंदरटोला, गोबरवाही या व इतर गावातील शेतजमिनीला फायदा होईल. मोहाडी तालुक्यात होणार लायनिंगची कामेपेंच प्रकल्पाचे लाभ क्षेत्रात मोहाडी तालुक्याचा बराच क्षेत्र टेलवर असल्यामुळे शेतीला पाणी पोहचण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील पिकांना फटका बसतो. कालव्यांवर लायनिंगची कामे घेण्यात यावी यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्यानुषंगाने मोहाडी तालुक्यातील कालवे मजबुत करण्यासाठी २५ कोटी रुपये निधी मंज़ुरी झालेला असून कालव्याची लायनिंग झाल्यास शेतीला पाणी मिळण्याचा प्रश्न मिटणार.सोंड्याटोला उपसा सिंचन योजनाया योजनेच्या थकीत बिलाच्या मागणीसाठी शासनस्तरावर आपला पाठपुरावा सुरु असून मागील शासनाचे काळात सिंचन प्रकल्पाच्या चौकशीकरिता चितळे समिती गठीत करण्यात आली होती. समितीने शेतकऱ्यांकडून विद्युत बिलाची वसुली करून बिल भरावे अशा सूचना मान्य केल्याने ४४ लाख थकीत वेतन बिलापोटी केवळ ८ लाख रुपये वसुली झाल्याने उर्वरीत बिलाच्या रकमेची मागणी मुख्यमंत्र्यांना केली असून लवकरच प्रश्न मार्गी लागून विद्युत बिल भरण्यात येईल. सोंड्या टोला उपसा सिंचन योजना बंद पडू देणार नाही, असेही आ.वाघमारे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)धान घोटाळ्याचा सीआयडी तपास अंतिम टप्प्यातभंडारा जिल्ह्यातील धान खरेदी घोटाळ्याचा तपास पोलिसांकडून काढून सी.आय.डी.कडे शासनाने सोपविला असून तपास अंतिम टप्प्यात असून याची माहिती अधिकृतरित्या शासनाकडून देण्यात येणार आहे. विरोधक घोटाळ्याबद्दल उलटसुलट चर्चा करीत असले तरी शासनाने केलेली कारवाई लवकरच जनतेसमोर येईल, असेही त्यांनी सांगितले.माडगी येथील युनिव्हर्सल फेरोहा कारखाना सुरु होण्यासाठी दीड वर्षात विधानसभेत तीनवेळा प्रश्न उपस्थित केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दोन वेळा बैठका घेतली. कंपनीचा मालक बैठकीत उपस्थित न झाल्याने निर्णय होऊ शकला नाही. उद्योगमंत्र्यांनी बैठकीत समाधनकारक तोडगा काढत असल्याचे पाहून काही मंडळी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रयत्न कोणीही केले तरी माझ्या प्रयत्नातच भर पडेल. हा कारखाना सुरु करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.