शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेच्या प्रारुपावर आक्षेप नोंदवा

By admin | Updated: February 20, 2015 00:28 IST

देशात दर दहा वर्षांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि जातनिहाय जनगणना करण्याची तरतूद असतानाही अनुसूचित जाती व जमाती या दोनच प्रवर्गांचा उल्लेख करीत जनगणना केली जाते.

भंडारा : देशात दर दहा वर्षांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि जातनिहाय जनगणना करण्याची तरतूद असतानाही अनुसूचित जाती व जमाती या दोनच प्रवर्गांचा उल्लेख करीत जनगणना केली जाते. ओबीसी आणि अन्य जातींचा उल्लेखच त्या प्रपत्रात नसतो. त्यामुळे, देशातील मागास जातींची खरी संख्या समोर येत नसल्याचे सांगत, जनगणनेच्या प्रारूपावर सामान्य लोकांनी आक्षेप नोंदवावे, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले. भंडारा येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.यासंदर्भात माहिती देताना खा. पटोले म्हणाले, इंग्रजांची सत्ता असताना १९३१ पर्यंत या देशात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि जातनिहाय जनगणना करण्यात आली. १९४१ मध्ये युद्धामुळे जनगणना झाली नाही. १९५१ पासून भारतात जनगणनेची पद्धत बदलण्यात आली असून, जातीनिहाय जनगणना केली जात नाही. जातनिहाय जनगणना करण्याचे आदेश असतानाही केवळ अनु. जाती व जमातीची तशी गणना केली जात असून, ओबीसी आणि अन्य जातींची मोजणी होत नाही. परिणामी, लोकसंख्येच्या आधारवर त्या त्या जाती प्रवर्गांना आरक्षण व त्यानुसार दिल्या जाणाऱ्या सोयी सवलतींचा लाभ मिळत नाही. अनुसूचित जातींसाठी १३ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता ७ टक्के आरक्षणाची तरतूद असली तरी, गेल्या अनेक वर्षात या प्रवर्गांची लोकसंख्या प्रचंड वाढल्याने त्यांच्या आरक्षणाचे प्रमाणही वाढणे गरजेचे आहे. ओबीसी आणि अन्य मागास नागरिकांची जातनिहाय जनगणना झाल्यास त्यांनाही वाढीव आरक्षणाचा लाभ मिळून, विकासासाठी अधिक निधी प्राप्त होवू शकतो. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेवर आक्षेप नोंदविण्यासाठी आता गावात प्रारूप पाठविण्यात आले आहेत. ग्रामसभेत तसे आक्षेप नोंदवायचे असून, जातीनिहाय जनगणना झाली नसल्याने, सर्व लोकांनी आक्षेप नोंदवावे, जनतेचे आक्षेप आल्यानंतरच हा विषय लोकसभेत व्यापकपणे मांडता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)