शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी समितीचा अहवाल येण्यास होणार विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST

ज्ञानेश्वर मुंदे भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल येण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता ...

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल येण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्र्यांनी तीन दिवसात अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समितीच्या अध्यक्षांची उचलबांगडी केली. नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली. मंगळवारी हा अहवाल अपेक्षित होता. मात्र आणखी काही दिवस अहवाल येण्यास लागतील आणि त्यानंतरच कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे अग्नितांडव होऊन दहा निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेला होता. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह डझनभर मंत्री भंडाऱ्यात दाखल झाले. शनिवारी तातडीने आरोग्यमंत्री राजेश टोपे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी अग्निकांडाच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक साधना तायडे यांची नियुक्ती केली होती. सहा सदस्यीय समिती तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी या समितीच्या अध्यक्षांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी नागपूरचे विभागीय आयुक्त डाॅ. संजयकुमार यांची नियुक्ती केली. तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, या समितीचा अहवाल मंगळवारपर्यंत येणे अपेक्षित होते. परंतु आणखी दोन ते तीन दिवस अहवाल येण्यास लागतील, अशी माहिती आहे. या अहवालावरच या घटनेत कोण दोषी आहे हे ठरणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा चौकशी समितीच्या अहवालाकडे लागल्या आहेत. चौकशी समितीने आपले काम सुरू केले असून रुग्णालयाच्या पाहणीसोबत बयाण नोंदविणे सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता चौकशी समितीच्या अहवालानंतर जी तक्रार प्राप्त होईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले. एकंदरीत, या चौकशी अहवालावर या घटनेला जबाबदार कोण आहे, याची निश्चिती होणार असल्याने सर्वांना अहवालाची उत्सुकता आहे.

बाॅक्स

भंडारा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणात भंडारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुनीता बढे यांच्या वतीने परिसेविका ज्योती शेखर भारसाकरे यांनी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून शनिवारी सायंकाळी ७.४६ वाजता आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केदार करीत असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पाठविण्यात येणाऱ्या दैनंदिन प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.