शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

पालांदूर येथील शेळी बाजार स्मशानभूमीच्या जागेत स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:06 IST

पालांदूर : जागेच्या अभावाने पालांदूर येथील शेळी बाजार नव्याने स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत हलविण्यात आला. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचे व्यापारी ...

पालांदूर : जागेच्या अभावाने पालांदूर येथील शेळी बाजार नव्याने स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत हलविण्यात आला. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचे व्यापारी इथे हिरिरीने सहभाग नोंदवतात. दिवसेंदिवस शेळी बाजार वाढत असल्याने प्रशस्त जागेत व्यापारी व शेतकरी यांनी नव्या जागेला प्राधान्य दिलेले आहे.

लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील शनिवारी भरणारा आठवडी बाजार खूप मोठ्या स्वरुपाचा आहे. बाजाराचा व्याप वाढत असल्याने व अतिक्रमण झाल्याने बाजाराची जागा व्यापाऱ्यांना कमी पडत आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला आग्रह करीत शेळी बाजार मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीने ग्रामपंचायतला विचारत स्मशानभूमीच्या पुढील मोकळ्या जागेत सपाटीकरण करून बाजार स्थलांतरित केला. खूप मोठी मोकळी जागा असल्याने वाहनांच्या रहदारीसाठी व बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी जागा मुबलक व सोयीची असल्याचे प्राथमिक अभ्यासात व्यापारी व शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नियोजित बाजार चौकातला बाजार हा मुख्य रस्त्यावर भरत असल्याने सगळ्यांनाच अडचणीचे जाणवत आहे. मात्र जागाच अपुरी असल्याने बाजार हलवायचा कुठे, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

गत दहा वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतंत्र जमीन खरेदीकरिता प्रयत्न करीत आहे. परंतु गावाशेजारची जमिनी महागडी असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती नियोजन अजूनही पूर्ण झालेले नाही. शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात वाहतूक खोळंबलेली असते. मात्र दिवसेंदिवस पशुपालन वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेळ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. प्रभू कुरेकर, महादेव पडोळे यांच्या पुढाकारातून हा बाजार पालांदूरच्या स्मशानभूमीत मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यात आला.

कोट

पालांदूरचा आठवडी बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आम्ही हा बाजार स्थलांतरित केलेला आहे. स्वतंत्र पिण्याच्या पाण्याचीसुद्धा व्यवस्था आम्ही करू. दर शनिवारी सुमारे आठ ते दहा हजार रुपयांचा महसूल गोळा होतो.

किशोर भैसारे,

कनिष्ठ लिपिक कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी.

भविष्याच्या दृष्टीने पालांदूर हे शेळी व्यवसायात मोठी बाजारपेठ आहे. येथे व्यापार मोठ्या स्वरूपात होत आहे. दूरदृष्टीचा विचार करता व्यापाऱ्यांना हा बाजार स्मशानभूमीच्या ठिकाणी चांगला वाटत आहे.

दिगंबर दुर्गेश कोंढा /कोसरा