शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

धान रोवणीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

जांब (लोहारा) : गतवर्षी झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडुंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात ७५ टक्के ...

जांब (लोहारा) : गतवर्षी झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडुंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ५० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ७५ टक्के भरला आहे.

यापूर्वी या प्रकल्पातून उन्हाळी धान पिकांसाठी तीन टप्प्यात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी खरीप पिकांसाठी ही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती असली तरी शेतकरी वर्ग खरीप हंगामातील धान नर्सरी उन्हाच्या दाहकतेने कोमेजून जात आहेत. सुरूवातीच्या काळात पावसाने दमदार सुरूवात केली असली तरी, आता मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल व चिंतातुर झाला आहे.

शेतकऱ्यांच्या धान नर्सरी व धान पीक रोवणी करीता बावनथडी प्रकल्पाचे पाणी त्वरित सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. मोहाडी तालुक्यातील, डोंगरगाव, कुशारी, काटेबाम्हणी, धोप, टाकला, उसर्रा, सालई (बू) ताडगाव, सालई (खु) सिहरी, मोरगाव महालगाव, नेरला, बपेरा, पालडोंगरी, टांगा, पिंपळगाव, अकोला टोला, आंधळगाव, मलिदा, आदी परिसरात पावसाने गेल्या कित्येक दिवसांपासून हुलकावणी दिली आहे. त्यामुळे प्रखर उन्हाने पेरणी केलेले धान नर्सरी कोमेजून गेले आहे.

बहुतेक शेतकऱ्यांच्या धान नर्सरी रोवणी योग्य आले असल्याने धान पीक लागवडीकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची गरज आहे. त्यातच पावसाअभावी धान नर्सरी मरणासन्न अवस्थेत सापडले आहे. व धान रोवणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतात पेरणी केलेल्या धान नर्सरी वाचविण्यासाठी व धान रोवणी करीता आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाचे पाणी खरीप हंगामात धान पिकाला सोडण्याची मागणी केली आहे अन्यथा डोंगरगाव व मोहाडी येथील चौकात शेतकऱ्यां‍सोबत आंदोलन करण्याचा इशारा भंडारा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष देवा ईलमे यांनी निवेदनातून दिला आहे.