शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

महावितरणच्या अस्तित्वासाठी वीजबिलाची वसुली आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

०४ लोक ०६ के भंडारा : ‘गोंदिया परिमंडलात थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट ...

०४ लोक ०६ के

भंडारा : ‘गोंदिया परिमंडलात थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महावितरण कंपनी ही देखील वीज निर्मिती व पारेषण कंपन्यांची ग्राहक आहे. महावितरणला या कंपन्यांची देयके वेळेत अदा करावी लागतात. ही देयके वेळेत न भरल्यास महावितरण कंपनीला नाहक विलंब आकार व व्याज यांचा भुर्दंड बसतो. ग्राहकांनी वीजबिल भरणा न केल्यास कंपनीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महावितरण ही जनतेची वीज वितरण कंपनी असून ही कंपनी टिकवायची असल्यास वीज बिलाची वेळेत वसुली होणे अत्यंत आवश्यक आहे.’ असे मत कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी व्यक्त केले.

गोंदिया परिमंडलातील उपविभागीय स्तरावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता (प्रभारी) राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाशगड, मुंबई येथील कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे हे गोंदिया व भंडारा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बैठकी दरम्यान जून महिन्यात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच बिल भरणा केलेल्या या ग्राहकांचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी आभार मानले. उर्वरित ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक काम करत, वसुली मोहीम राबविताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही रेशमे यांनी केले.

ग्राहकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील चालू विकास कामांचीही पाहणी केली. ‘आयपीडीएस’ योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना यांच्या कामाची पाहणी केली. झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ‘एचव्हीडीएस’ योजनेचे काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बॉक्स

शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज धोरणाचा लाभ घ्यावा

शासनाने शेतकऱ्यांना विविध लाभ देणारे ‘कृषी पंप वीजजोडणी धोरण-२०२०’ जाहीर केले आहे. या धोरणानुसार शेतकऱ्यांना वीज बिलात मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. थकबाकीमुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांना ही चांगली संधी आहे. या योजनेची माहिती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचवून त्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे. याचबरोबर कर्मचाऱ्यांनी थकीत कृषी वीज बिल वसुलीकडेही लक्ष द्यावे, असे आदेश कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले आहे.