शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अस्तित्वासाठी वीजबिलाची वसुली आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

०४ लोक ०६ के भंडारा : ‘गोंदिया परिमंडलात थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट ...

०४ लोक ०६ के

भंडारा : ‘गोंदिया परिमंडलात थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महावितरण कंपनी ही देखील वीज निर्मिती व पारेषण कंपन्यांची ग्राहक आहे. महावितरणला या कंपन्यांची देयके वेळेत अदा करावी लागतात. ही देयके वेळेत न भरल्यास महावितरण कंपनीला नाहक विलंब आकार व व्याज यांचा भुर्दंड बसतो. ग्राहकांनी वीजबिल भरणा न केल्यास कंपनीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महावितरण ही जनतेची वीज वितरण कंपनी असून ही कंपनी टिकवायची असल्यास वीज बिलाची वेळेत वसुली होणे अत्यंत आवश्यक आहे.’ असे मत कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी व्यक्त केले.

गोंदिया परिमंडलातील उपविभागीय स्तरावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता (प्रभारी) राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाशगड, मुंबई येथील कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे हे गोंदिया व भंडारा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बैठकी दरम्यान जून महिन्यात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच बिल भरणा केलेल्या या ग्राहकांचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी आभार मानले. उर्वरित ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक काम करत, वसुली मोहीम राबविताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही रेशमे यांनी केले.

ग्राहकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील चालू विकास कामांचीही पाहणी केली. ‘आयपीडीएस’ योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना यांच्या कामाची पाहणी केली. झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ‘एचव्हीडीएस’ योजनेचे काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बॉक्स

शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज धोरणाचा लाभ घ्यावा

शासनाने शेतकऱ्यांना विविध लाभ देणारे ‘कृषी पंप वीजजोडणी धोरण-२०२०’ जाहीर केले आहे. या धोरणानुसार शेतकऱ्यांना वीज बिलात मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. थकबाकीमुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांना ही चांगली संधी आहे. या योजनेची माहिती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचवून त्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे. याचबरोबर कर्मचाऱ्यांनी थकीत कृषी वीज बिल वसुलीकडेही लक्ष द्यावे, असे आदेश कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले आहे.