शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

महावितरणच्या अस्तित्वासाठी वीजबिलाची वसुली आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

भंडारा : ‘गोंदिया परिमंडलात थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढल्यामुळे थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महावितरण कंपनी ...

भंडारा : ‘गोंदिया परिमंडलात थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढल्यामुळे थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महावितरण कंपनी हीदेखील वीजनिर्मिती व पारेषण कंपन्यांची ग्राहक आहे. महावितरणला या कंपन्यांची देयके वेळेत अदा करावी लागतात. ही देयके वेळेत न भरल्यास महावितरण कंपनीला नाहक विलंब आकार व व्याज यांचा भुर्दंड बसतो. ग्राहकांनी वीज बिल भरणा न केल्यास कंपनीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महावितरण ही जनतेची वीज वितरण कंपनी असून, ही कंपनी टिकवायची असल्यास वीज बिलाची वेळेत वसुली होणे अत्यंत आवश्यक आहे,’ असे मत कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी व्यक्त केले.

गोंदिया परिमंडलातील उपविभागीय स्तरावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता(प्रभारी) राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाशगड, मुंबई येथील कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे हे गोंदिया व भंडारा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बैठकीदरम्यान जून महिन्यात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच बिल भरणा केलेल्या या ग्राहकांचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी आभार मानले. उर्वरित ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन आहे. या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक काम करीत, वसुली मोहीम राबविताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही रेशमे यांनी केले.

ग्राहकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने गोंदिया व भंडारा जिल्ह्यांतील चालू विकासकामांचीही पाहणी केली. ‘आयपीडीएस’ योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना यांच्या कामांची पाहणी केली. झालेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ‘एचव्हीडीएस’ योजनेचे काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बॉक्स

शेतकऱ्यांनी कृषिपंप वीज धोरणाचा लाभ घ्यावा

शासनाने शेतकऱ्यांना विविध लाभ देणारे ‘कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२०’ जाहीर केले आहे. या धोरणानुसार शेतकऱ्यांना वीज बिलात मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. थकबाकीमुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांना ही चांगली संधी आहे. या योजनेची माहिती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे. याचबरोबर कर्मचाऱ्यांनी थकीत कृषी वीज बिल वसुलीकडेही लक्ष द्यावे, असे आदेश कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले आहेत.