शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निसर्गाच्या वक्रदृष्टीने धान उत्पादनात रेकॉर्ड घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:18 IST

गत दोन वर्षांपासून लोहारा, जांब, परिसरात शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मार्च महिन्यांपासून शेतकरी संकटात आहे. लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संपूर्ण ...

गत दोन वर्षांपासून लोहारा, जांब, परिसरात शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मार्च महिन्यांपासून शेतकरी संकटात आहे. लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संपूर्ण चौपट झाली आहे. या संकटातून मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता नवीन संकट मानगुटीवर बसले असल्याचा प्रत्यय या परिसरात आलेला आहे . उभ्या धान पिकांची तणस झाली. काही प्रमाणात पीक शिल्लक होते . या धान पिकावर विविध रोगाने ताव मारण्यास सुरुवात केली . धान पीक कापणीच्या तोंडावर असताना मोठा आघात मावा तुडतुडा रोगाने दिला आहे . हातात येणारे पीक जाताना उघड्या डोळ्यांनी पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत . परंतु काहीच करता येत नाहीत. शासन अंतर्गत मदतीची अपेक्षा आहे. याच परिसरात मावा तुडतुडा रोगाने उभे धान पीक नष्ट केले होते.

शेतकऱ्यांचे घरात एक पोती धान आले नाही. तुमसर तालुक्यातील लोहारा, सोरणा, लंजेरा, रोंघा, आंबागड, लेंडेझरी तर मोहाडी तालुक्यातील जांब, ताळगाव, धोप, कांद्री, हिवरा, धुसाळा, सकरला आदी गावात चार एकरात पाच ते सहा पोते धान होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी देशोधडीला लागत आहे. भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. साधारणतः एक लाख ६० हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली. निसर्गाचा मारा झेलत धान बहरला. मात्रा ऐन कापणीच्या वेळेस धानावर तुडतड्याने आक्रमण केले. अख्खे शेत तुडतुड्याने फस्त केले . त्यामुळे धान उत्पादनात रिकार्ड तोड घट झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन पिक विमा देण्याची मागणी लोहारा, जांब, कांद्री, धोप, ताळगाव तसेच तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.