शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या वक्रदृष्टीने धान उत्पादनात रेकॉर्ड घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:18 IST

गत दोन वर्षांपासून लोहारा, जांब, परिसरात शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मार्च महिन्यांपासून शेतकरी संकटात आहे. लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संपूर्ण ...

गत दोन वर्षांपासून लोहारा, जांब, परिसरात शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मार्च महिन्यांपासून शेतकरी संकटात आहे. लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संपूर्ण चौपट झाली आहे. या संकटातून मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता नवीन संकट मानगुटीवर बसले असल्याचा प्रत्यय या परिसरात आलेला आहे . उभ्या धान पिकांची तणस झाली. काही प्रमाणात पीक शिल्लक होते . या धान पिकावर विविध रोगाने ताव मारण्यास सुरुवात केली . धान पीक कापणीच्या तोंडावर असताना मोठा आघात मावा तुडतुडा रोगाने दिला आहे . हातात येणारे पीक जाताना उघड्या डोळ्यांनी पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत . परंतु काहीच करता येत नाहीत. शासन अंतर्गत मदतीची अपेक्षा आहे. याच परिसरात मावा तुडतुडा रोगाने उभे धान पीक नष्ट केले होते.

शेतकऱ्यांचे घरात एक पोती धान आले नाही. तुमसर तालुक्यातील लोहारा, सोरणा, लंजेरा, रोंघा, आंबागड, लेंडेझरी तर मोहाडी तालुक्यातील जांब, ताळगाव, धोप, कांद्री, हिवरा, धुसाळा, सकरला आदी गावात चार एकरात पाच ते सहा पोते धान होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी देशोधडीला लागत आहे. भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. साधारणतः एक लाख ६० हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली. निसर्गाचा मारा झेलत धान बहरला. मात्रा ऐन कापणीच्या वेळेस धानावर तुडतड्याने आक्रमण केले. अख्खे शेत तुडतुड्याने फस्त केले . त्यामुळे धान उत्पादनात रिकार्ड तोड घट झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन पिक विमा देण्याची मागणी लोहारा, जांब, कांद्री, धोप, ताळगाव तसेच तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.