शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

२ एकरात २.५० लाखांचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:24 IST

शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत ....

चवळी शेंगांचे पीक : प्रगत शेतकरी वीरेंद्र मदनकर, धानाला उत्तम पर्यायमुखरू बागडे। लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत कमी खर्चात अधिक उत्पादनाची किमया पालांदुरातील विरेंद्र मदनकर यांनी करून दाखविली आहे.शेती परवतडत नसल्याचे बोंब सगळीकडूनच कानावर ऐकू येताना दिसते. मात्र काही तरूण जोखीम पत्करत कृषी क्षेत्रात झालेले नवीन बदल स्विकारत काळ्या मातीतून बाजारात काय व केव्हा कसे विकणे याचा नजरअंदाज, अभ्यास घेत पिकपद्धत बदलवितात. याच सुत्राने विरू मदनकरने धान पिक कमी करू मागील ३ वर्षापासून बागायतीत शेंगाचे उत्पादन घेणे आरंभ केले. याकरीता मंगे घोडके व त्यांची टिम सदोचित नवीन अभ्यासासह शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात अग्रेसर आहेत. पालांदुरातील मंडळ कृषी कार्यालयामार्फत परिसरात विविध भाज्यांचे प्रात्यक्षिके दाखवून शेतकऱ्यांना शहाणे करणे सुरू आहे. बराचदा प्रोत्साहन निधी म्हणून वांगे, भेंडी उत्पादकांना याच कार्यालयामार्फत अनुदान दिल्या गेले हे येथे उल्लेखनीय. हल्ली विरू मदनकरच्या शेतात ३०-४० मजूर श्रम उपसत ४००-५०० चपकी चे उत्पादन सुरू आहे. मागील ४० दिवसापासून उत्पादन सुरू आहे. २० ते ४५ रूपये एवढा भाव भंडारा येथील मंडीत मिळत आहे. बंडू बारापात्रे यांचया प्रामाणिकतेने पालांदूर परिसरातील बागायती उत्पादकांना मोठा आधार मिळला असून रोजच नव नवे शेतकरी भंडाऱ्याला माल विक्रीला नेतात. विक्रीला अडचण नसल्याने शेतकरी तिथे माल विकणे पसंद करीत आहे. नगदी रक्कम हातात मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.चुलबंधच्या खोऱ्यात पाण्याची पातळी खूपच खोल गेल्याने अधिक जागेत धान पिक घेणे अवघड झाले आहे. जमिन आहे पण पाणी कमी झाल्याने बागायतीला पसंती वाढली आहे. स्थानिक बाजारात लहान व्यापारी माल विकत घेतात परंतू पैसेच देत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी मुस्कुटदाबी होत असते. यामुळे हक्काची बाजारपेठ म्हणून बीटीबी मंडीला अधिक महत्त्व आले आहे. मोठा पाऊस येईपर्यंत चवळी शेंग उत्पादन देतच राहणार असून हपत्याच्या सातही दिवस माल तोडणे सुरू आहे. सकाळच्या सत्रात दोन तासात मजुराकडून माल तोडून १० वाजेपर्यंत मंडिला माल पोहचविला जातो. नागपूर, वर्धा, बुटीबोरी, उमरेड भीसी व संपूर्ण भंडाऱ्या जिल्ह्यात मंडीतून माल विकल्या जात आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी धानपिकाला उत्तम पर्याय म्हणून बागायतीकडे वळून वांगे, भेंडी, चवळी, कोबी, कोहळा आदी पिकाकडे वळून कमी पाण्यात अधिक उत्पादनाची आस धरावी व विरेंद्र मदनकरचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शेती कसावी.