शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

२ एकरात २.५० लाखांचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:24 IST

शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत ....

चवळी शेंगांचे पीक : प्रगत शेतकरी वीरेंद्र मदनकर, धानाला उत्तम पर्यायमुखरू बागडे। लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत कमी खर्चात अधिक उत्पादनाची किमया पालांदुरातील विरेंद्र मदनकर यांनी करून दाखविली आहे.शेती परवतडत नसल्याचे बोंब सगळीकडूनच कानावर ऐकू येताना दिसते. मात्र काही तरूण जोखीम पत्करत कृषी क्षेत्रात झालेले नवीन बदल स्विकारत काळ्या मातीतून बाजारात काय व केव्हा कसे विकणे याचा नजरअंदाज, अभ्यास घेत पिकपद्धत बदलवितात. याच सुत्राने विरू मदनकरने धान पिक कमी करू मागील ३ वर्षापासून बागायतीत शेंगाचे उत्पादन घेणे आरंभ केले. याकरीता मंगे घोडके व त्यांची टिम सदोचित नवीन अभ्यासासह शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात अग्रेसर आहेत. पालांदुरातील मंडळ कृषी कार्यालयामार्फत परिसरात विविध भाज्यांचे प्रात्यक्षिके दाखवून शेतकऱ्यांना शहाणे करणे सुरू आहे. बराचदा प्रोत्साहन निधी म्हणून वांगे, भेंडी उत्पादकांना याच कार्यालयामार्फत अनुदान दिल्या गेले हे येथे उल्लेखनीय. हल्ली विरू मदनकरच्या शेतात ३०-४० मजूर श्रम उपसत ४००-५०० चपकी चे उत्पादन सुरू आहे. मागील ४० दिवसापासून उत्पादन सुरू आहे. २० ते ४५ रूपये एवढा भाव भंडारा येथील मंडीत मिळत आहे. बंडू बारापात्रे यांचया प्रामाणिकतेने पालांदूर परिसरातील बागायती उत्पादकांना मोठा आधार मिळला असून रोजच नव नवे शेतकरी भंडाऱ्याला माल विक्रीला नेतात. विक्रीला अडचण नसल्याने शेतकरी तिथे माल विकणे पसंद करीत आहे. नगदी रक्कम हातात मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.चुलबंधच्या खोऱ्यात पाण्याची पातळी खूपच खोल गेल्याने अधिक जागेत धान पिक घेणे अवघड झाले आहे. जमिन आहे पण पाणी कमी झाल्याने बागायतीला पसंती वाढली आहे. स्थानिक बाजारात लहान व्यापारी माल विकत घेतात परंतू पैसेच देत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी मुस्कुटदाबी होत असते. यामुळे हक्काची बाजारपेठ म्हणून बीटीबी मंडीला अधिक महत्त्व आले आहे. मोठा पाऊस येईपर्यंत चवळी शेंग उत्पादन देतच राहणार असून हपत्याच्या सातही दिवस माल तोडणे सुरू आहे. सकाळच्या सत्रात दोन तासात मजुराकडून माल तोडून १० वाजेपर्यंत मंडिला माल पोहचविला जातो. नागपूर, वर्धा, बुटीबोरी, उमरेड भीसी व संपूर्ण भंडाऱ्या जिल्ह्यात मंडीतून माल विकल्या जात आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी धानपिकाला उत्तम पर्याय म्हणून बागायतीकडे वळून वांगे, भेंडी, चवळी, कोबी, कोहळा आदी पिकाकडे वळून कमी पाण्यात अधिक उत्पादनाची आस धरावी व विरेंद्र मदनकरचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शेती कसावी.