शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

२ एकरात २.५० लाखांचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:24 IST

शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत ....

चवळी शेंगांचे पीक : प्रगत शेतकरी वीरेंद्र मदनकर, धानाला उत्तम पर्यायमुखरू बागडे। लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत कमी खर्चात अधिक उत्पादनाची किमया पालांदुरातील विरेंद्र मदनकर यांनी करून दाखविली आहे.शेती परवतडत नसल्याचे बोंब सगळीकडूनच कानावर ऐकू येताना दिसते. मात्र काही तरूण जोखीम पत्करत कृषी क्षेत्रात झालेले नवीन बदल स्विकारत काळ्या मातीतून बाजारात काय व केव्हा कसे विकणे याचा नजरअंदाज, अभ्यास घेत पिकपद्धत बदलवितात. याच सुत्राने विरू मदनकरने धान पिक कमी करू मागील ३ वर्षापासून बागायतीत शेंगाचे उत्पादन घेणे आरंभ केले. याकरीता मंगे घोडके व त्यांची टिम सदोचित नवीन अभ्यासासह शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात अग्रेसर आहेत. पालांदुरातील मंडळ कृषी कार्यालयामार्फत परिसरात विविध भाज्यांचे प्रात्यक्षिके दाखवून शेतकऱ्यांना शहाणे करणे सुरू आहे. बराचदा प्रोत्साहन निधी म्हणून वांगे, भेंडी उत्पादकांना याच कार्यालयामार्फत अनुदान दिल्या गेले हे येथे उल्लेखनीय. हल्ली विरू मदनकरच्या शेतात ३०-४० मजूर श्रम उपसत ४००-५०० चपकी चे उत्पादन सुरू आहे. मागील ४० दिवसापासून उत्पादन सुरू आहे. २० ते ४५ रूपये एवढा भाव भंडारा येथील मंडीत मिळत आहे. बंडू बारापात्रे यांचया प्रामाणिकतेने पालांदूर परिसरातील बागायती उत्पादकांना मोठा आधार मिळला असून रोजच नव नवे शेतकरी भंडाऱ्याला माल विक्रीला नेतात. विक्रीला अडचण नसल्याने शेतकरी तिथे माल विकणे पसंद करीत आहे. नगदी रक्कम हातात मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.चुलबंधच्या खोऱ्यात पाण्याची पातळी खूपच खोल गेल्याने अधिक जागेत धान पिक घेणे अवघड झाले आहे. जमिन आहे पण पाणी कमी झाल्याने बागायतीला पसंती वाढली आहे. स्थानिक बाजारात लहान व्यापारी माल विकत घेतात परंतू पैसेच देत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी मुस्कुटदाबी होत असते. यामुळे हक्काची बाजारपेठ म्हणून बीटीबी मंडीला अधिक महत्त्व आले आहे. मोठा पाऊस येईपर्यंत चवळी शेंग उत्पादन देतच राहणार असून हपत्याच्या सातही दिवस माल तोडणे सुरू आहे. सकाळच्या सत्रात दोन तासात मजुराकडून माल तोडून १० वाजेपर्यंत मंडिला माल पोहचविला जातो. नागपूर, वर्धा, बुटीबोरी, उमरेड भीसी व संपूर्ण भंडाऱ्या जिल्ह्यात मंडीतून माल विकल्या जात आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी धानपिकाला उत्तम पर्याय म्हणून बागायतीकडे वळून वांगे, भेंडी, चवळी, कोबी, कोहळा आदी पिकाकडे वळून कमी पाण्यात अधिक उत्पादनाची आस धरावी व विरेंद्र मदनकरचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शेती कसावी.