शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

पक्का रस्ता खोदून तयार केला कच्चा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:26 IST

कच्चे रस्ते डांबरी, सिमेंटचे होताना सर्वांनीच बधितले आहे. मात्र गुळगुळीत डांबरी रस्ता खोदून मुरुमाचा रस्ता तयार करण्याचा प्रकार कुणी बघीतला नसेल. हा अजब प्रकार बघायचा असेल तर तुम्हाला भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात यावे लागेल.

ठळक मुद्देअजब प्रकार : जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक रस्ता दुपदरीकरणाचे भिजत घोंगडे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कच्चे रस्ते डांबरी, सिमेंटचे होताना सर्वांनीच बधितले आहे. मात्र गुळगुळीत डांबरी रस्ता खोदून मुरुमाचा रस्ता तयार करण्याचा प्रकार कुणी बघीतला नसेल. हा अजब प्रकार बघायचा असेल तर तुम्हाला भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात यावे लागेल. वर्दळीच्या या रस्त्याचे दुपदरीकरण रखडल्यानंतर आता तात्पुरता मुरुमाचा रस्ता करुन पुन्हा नागरिकांना मनस्ताप देण्याचा हा प्रकार आहे.शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या मार्गाचे दुपदरीकरण सध्या शहरात चर्चेचा आणि वादाचा विषय झाला आहे. बरोबर महिन्याभरापूर्वी या रस्त्याच्या चौपदरीकरण कामासाठी खोदकाम सुरु झाले. अवघ्या तीन दिवसात अर्धा किलोमीटर रस्ता एका बाजुने खोदुन काढला. त्यानंतर अचानक रस्त्याचे काम बंद झाले. नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही म्हणून आक्षेप घेत काम थांबविले. महिन्याभरापासून या मार्गावरुन जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी आणि अपघाताने या रस्त्यावरुन जाताना नागरिक चांगलेच धास्तावलेले दिसतात.आता या रस्त्याचे काम कधी सुरु होईल हे कुणालाही सांगता येत नाही. शहराच्या विकासाच्या मुद्दावरुन काम थांबविल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला. पंधरा दिवसांपूर्वी महामार्ग प्राधिकरण आणि नगर परिषद यांच्यात बैठक होवून तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यात अपेक्षित यश आले नाही. एका बाजूने खोदलेला रस्ता आणि दुसऱ्या बााजूने भरधाव वाहतूक असे चित्र आहे. अशातच बुधवारी या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याचे चित्र दिसले. ट्रकमधून या ठिकाणी मुरुम आणणे सुरु झाले. नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु हा दिलासा औटघटकेचा ठरला. कारण या रस्त्याचे सिमेंटीकरण नाही तर मुरुम टाकून तात्पुरता तयार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मुरुम टाकून खोदलेला रस्ता जुन्या रस्त्याच्या समतल आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.मुरुमाचा हा तलकादू रस्ता म्हणजे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे होय. जो काही वाद असेल तो वाद मिटवून नियोजनाप्रमाणे या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. परंतु त्याऐवजी मुरुमाचा रस्ता तयार केला जात आहे. या रस्त्यामुळे अवघ्या आठ दिवसातच धुळीचे प्रचंड लोट उठतील. एखादा पाऊस आला तर चिखल होईल. त्यातुन पुन्हा अपघाताची शक्यता बळावेल.बावीस अतिक्रमणधारकांना नोटीसजिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याच्या दुपदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावरील २२ अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसाच्या आत संबंधितांनी आपले अतिक्रमण काढून टाकावे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. संबंधित नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंत्यांनी बजावली आहे. एकीकडे रस्त्याचे काम थांबले असून दुसरीकडे या नोटीस बजावल्याने आता नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रस्ता बांधकामाचे कवित्वशहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याचे कवित्व सध्या सुरु आहे. प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभावी हा रस्ता अपुर्ण आहे. एकदा मुरुम टाकलेल्या रस्त्यावरुन वाहतूक सुरु झाली की कुणी त्यावर आवाज उठविणार नाही आणि हा रस्ता पुर्णत्वास जाण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सामोपचाराने या रस्त्यावर मंथन करुन प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. परंतु तसे होताना सध्या तरी दिसत नाही.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक