शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

विरलीत अतिसाराची साथ!

By admin | Updated: April 20, 2015 00:39 IST

लाखांदूर तालुक्यातील विरली येथे मागील तीन दिवसांपासून अतिसाराची साथ सुरु आहे.

२५ जणांना रूग्णालयात हलविले : महिलेचा मृत्यू, नागरिकांमध्ये दहशतविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली येथे मागील तीन दिवसांपासून अतिसाराची साथ सुरु आहे. गावात अतिसाराचे २५ रुग्ण आढळले असून यात एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. अतिसार नियंत्रणासाठी येथील आरोगय उपकेंद्रात शिबिर सुरु असून येथील दोन रुग्णांवर लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.इटाण येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजनेमार्फत विरली येथील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याची चाचणी घेतली असून सर्व नमुन्यांचा अहवाल २० एप्रिल रोजी प्राप्त होणार आहे. मात्र, प्राथमिक चाचणीत गावातील पिण्याच्या पाण्यात योग्य प्रमाणात ब्लिचिंग आणि क्लोरीन आढळल्याचे आरोग्य सहाय्यक जे. एम. कढोले यांनी सांगितले.गावात अतिसाराची साथ सुरु होताच स्थानिक प्रशासनाने अतिसार नियंत्रणासाठी येथील आरोग्य उपकेंद्रात शिबिर सुरु केले. या आरोग्य शिबिरात सरांडी (बु.) आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश जांभुळकर, डॉ. स्वाती महाजन, बेलाटी उपकेंद्राचे डॉ. प्रेमराज कुटे, आरोग्य सेवक बी. एच. उके आदींनी अतिसार बाधीत रुग्णांवर उपचार करित आहेत. विरली येथील सुरेखा विठोबा चौधरी (३२) या महिलेचा मृत्यू झाला तसेच आकांक्षा मिलिंद हुमणे (१३) आणि जयवर्धन गुलाब रामटेके (२३) या दोघांना पुढील उपचारार्थ लाखांदुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. (वार्ताहर)पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी केव्हा मिळणार?येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. सध्या आठवड्यातून तीन दिवस डॉ. स्वाती महाजन या उपकेंद्रात सेवा देत आहेत. साथीच्या काळात अनेक रुग्णांवर खासगी दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ आली. त्यामुळे येथे अतिसाराच्या रूग्णसंख्येचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरली (बु.) आरोग्य उपकेंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी केव्हा मिळणार, असा सवाल विरली व परिसरातील ग्रामवासीयांनी उपस्थित केला आहे.येथील सुरेखा चौधरी हिचा मृत्यू अतिसाराने झालेला नसून ‘बिगो-रेमिया’ या आजारामुळे झालेला आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक तपासणीत गावातील पिण्याचे पाणी योग्य असल्याचे आढळले आहे. विरली येथे सुरु असलेली अतिसाराची साथ लग्नसमारंभातील पाणी प्यायल्यामुळे किंवा वातावरणातील बदलामुळे झाली असावी, अशी शक्यता आहे.- डॉ. प्रकाश जांभुळकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरांडी (बु.)