शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

विरलीत अतिसाराची साथ!

By admin | Updated: April 20, 2015 00:39 IST

लाखांदूर तालुक्यातील विरली येथे मागील तीन दिवसांपासून अतिसाराची साथ सुरु आहे.

२५ जणांना रूग्णालयात हलविले : महिलेचा मृत्यू, नागरिकांमध्ये दहशतविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली येथे मागील तीन दिवसांपासून अतिसाराची साथ सुरु आहे. गावात अतिसाराचे २५ रुग्ण आढळले असून यात एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. अतिसार नियंत्रणासाठी येथील आरोगय उपकेंद्रात शिबिर सुरु असून येथील दोन रुग्णांवर लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.इटाण येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजनेमार्फत विरली येथील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याची चाचणी घेतली असून सर्व नमुन्यांचा अहवाल २० एप्रिल रोजी प्राप्त होणार आहे. मात्र, प्राथमिक चाचणीत गावातील पिण्याच्या पाण्यात योग्य प्रमाणात ब्लिचिंग आणि क्लोरीन आढळल्याचे आरोग्य सहाय्यक जे. एम. कढोले यांनी सांगितले.गावात अतिसाराची साथ सुरु होताच स्थानिक प्रशासनाने अतिसार नियंत्रणासाठी येथील आरोग्य उपकेंद्रात शिबिर सुरु केले. या आरोग्य शिबिरात सरांडी (बु.) आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश जांभुळकर, डॉ. स्वाती महाजन, बेलाटी उपकेंद्राचे डॉ. प्रेमराज कुटे, आरोग्य सेवक बी. एच. उके आदींनी अतिसार बाधीत रुग्णांवर उपचार करित आहेत. विरली येथील सुरेखा विठोबा चौधरी (३२) या महिलेचा मृत्यू झाला तसेच आकांक्षा मिलिंद हुमणे (१३) आणि जयवर्धन गुलाब रामटेके (२३) या दोघांना पुढील उपचारार्थ लाखांदुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. (वार्ताहर)पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी केव्हा मिळणार?येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. सध्या आठवड्यातून तीन दिवस डॉ. स्वाती महाजन या उपकेंद्रात सेवा देत आहेत. साथीच्या काळात अनेक रुग्णांवर खासगी दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ आली. त्यामुळे येथे अतिसाराच्या रूग्णसंख्येचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरली (बु.) आरोग्य उपकेंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी केव्हा मिळणार, असा सवाल विरली व परिसरातील ग्रामवासीयांनी उपस्थित केला आहे.येथील सुरेखा चौधरी हिचा मृत्यू अतिसाराने झालेला नसून ‘बिगो-रेमिया’ या आजारामुळे झालेला आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक तपासणीत गावातील पिण्याचे पाणी योग्य असल्याचे आढळले आहे. विरली येथे सुरु असलेली अतिसाराची साथ लग्नसमारंभातील पाणी प्यायल्यामुळे किंवा वातावरणातील बदलामुळे झाली असावी, अशी शक्यता आहे.- डॉ. प्रकाश जांभुळकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरांडी (बु.)