शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विरली विद्युत उपकेंद्राचा कारभार रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.) : सुमारे चार महिन्यांपूर्वी येथील विद्युत वितरण उपकेंद्राच्या सहायक अभियंत्यांचे स्थानांतरण झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विरली (बु.) : सुमारे चार महिन्यांपूर्वी येथील विद्युत वितरण उपकेंद्राच्या सहायक अभियंत्यांचे स्थानांतरण झाले. अद्याप या उपकेंद्रात कायमस्वरूपी अभियंत्यांची नियुक्ती झाली नाही. सद्यस्थितीत येथील प्रभारी अभियंते सरांडी (बु.) येथूनच उपकेंद्र चालवीत असल्याने या उपकेंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे.

या विद्युत वितरण उपकेंद्रांतर्गत परिसरातील २३ गावांना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, या केंद्रातील कर्मचाऱ्यांवर सध्या कुणाचाही अंकुश नसल्याने या गावातील वीज ग्राहकांना नेहमीच वीजपुरवठासंबंधीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी जानेवारी महिन्याअखेर येथील सहायक अभियंते खोब्रागडे यांचे स्थानांतरण झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासून या शाखेचा अतिरिक्त कार्यभार सरांडी (बु.) येथील अभियंते लाडके यांच्याकडे सोपविण्यात आला. दोन्ही उपकेंद्रांचा कारभार सांभाळताना त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, अभियंते लाडके यांनी मार्च एंडिंगला वीजबिल वसुलीसाठी जितकी तत्परता दाखविली त्याच्या निम्मीही तत्परता सध्या ते दाखवित नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. परिणामी, येथील नागरिकांना वीज पुरवठ्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

सद्यस्थितीत विरली (बु.) उपकेंद्राचा कार्यभार सांभाळत असलेले अभियंता लाडके प्रत्यक्षात येथे न येता तिथूनच येथील कर्मचाऱ्यांना सूचना देऊन उंटावरून शेळ्या हाकत असल्याचे समजते. या परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले आहेत, त्यामुळे विद्युत तारा लोंबकळत असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तारांपर्यंत गेलेल्या झाडांच्या फांद्या फक्त काही समस्या निर्माण झाल्यानंतर कापल्या जातात. येथील अभियंत्यांच्या अशा हलगर्जीपणामुळेच बुधवारी दुपारी स्पार्किंगमुळे येथे दोन ठिकाणी तनसीच्या ढिगांना आग लागून चार शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

येथील प्रभारी अभियंते बऱ्याचदा कार्यालयात राहात नसल्याने विजेसंबंधी काही समस्या घेऊन महावितरण कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना हात हलवत परतावे लागते. त्यामुळे या उपकेंद्रात तातडीने कायमस्वरूपी अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी जनतेची मागणी आहे.