शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विरली विद्युत उपकेंद्राचा कारभार रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.) : सुमारे चार महिन्यांपूर्वी येथील विद्युत वितरण उपकेंद्राच्या सहायक अभियंत्यांचे स्थानांतरण झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विरली (बु.) : सुमारे चार महिन्यांपूर्वी येथील विद्युत वितरण उपकेंद्राच्या सहायक अभियंत्यांचे स्थानांतरण झाले. अद्याप या उपकेंद्रात कायमस्वरूपी अभियंत्यांची नियुक्ती झाली नाही. सद्यस्थितीत येथील प्रभारी अभियंते सरांडी (बु.) येथूनच उपकेंद्र चालवीत असल्याने या उपकेंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे.

या विद्युत वितरण उपकेंद्रांतर्गत परिसरातील २३ गावांना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, या केंद्रातील कर्मचाऱ्यांवर सध्या कुणाचाही अंकुश नसल्याने या गावातील वीज ग्राहकांना नेहमीच वीजपुरवठासंबंधीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी जानेवारी महिन्याअखेर येथील सहायक अभियंते खोब्रागडे यांचे स्थानांतरण झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासून या शाखेचा अतिरिक्त कार्यभार सरांडी (बु.) येथील अभियंते लाडके यांच्याकडे सोपविण्यात आला. दोन्ही उपकेंद्रांचा कारभार सांभाळताना त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, अभियंते लाडके यांनी मार्च एंडिंगला वीजबिल वसुलीसाठी जितकी तत्परता दाखविली त्याच्या निम्मीही तत्परता सध्या ते दाखवित नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. परिणामी, येथील नागरिकांना वीज पुरवठ्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

सद्यस्थितीत विरली (बु.) उपकेंद्राचा कार्यभार सांभाळत असलेले अभियंता लाडके प्रत्यक्षात येथे न येता तिथूनच येथील कर्मचाऱ्यांना सूचना देऊन उंटावरून शेळ्या हाकत असल्याचे समजते. या परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले आहेत, त्यामुळे विद्युत तारा लोंबकळत असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तारांपर्यंत गेलेल्या झाडांच्या फांद्या फक्त काही समस्या निर्माण झाल्यानंतर कापल्या जातात. येथील अभियंत्यांच्या अशा हलगर्जीपणामुळेच बुधवारी दुपारी स्पार्किंगमुळे येथे दोन ठिकाणी तनसीच्या ढिगांना आग लागून चार शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

येथील प्रभारी अभियंते बऱ्याचदा कार्यालयात राहात नसल्याने विजेसंबंधी काही समस्या घेऊन महावितरण कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना हात हलवत परतावे लागते. त्यामुळे या उपकेंद्रात तातडीने कायमस्वरूपी अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी जनतेची मागणी आहे.