शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

विरली विद्युत उपकेंद्राचा कारभार रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.) : सुमारे चार महिन्यांपूर्वी येथील विद्युत वितरण उपकेंद्राच्या सहायक अभियंत्यांचे स्थानांतरण झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विरली (बु.) : सुमारे चार महिन्यांपूर्वी येथील विद्युत वितरण उपकेंद्राच्या सहायक अभियंत्यांचे स्थानांतरण झाले. अद्याप या उपकेंद्रात कायमस्वरूपी अभियंत्यांची नियुक्ती झाली नाही. सद्यस्थितीत येथील प्रभारी अभियंते सरांडी (बु.) येथूनच उपकेंद्र चालवीत असल्याने या उपकेंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे.

या विद्युत वितरण उपकेंद्रांतर्गत परिसरातील २३ गावांना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, या केंद्रातील कर्मचाऱ्यांवर सध्या कुणाचाही अंकुश नसल्याने या गावातील वीज ग्राहकांना नेहमीच वीजपुरवठासंबंधीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी जानेवारी महिन्याअखेर येथील सहायक अभियंते खोब्रागडे यांचे स्थानांतरण झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासून या शाखेचा अतिरिक्त कार्यभार सरांडी (बु.) येथील अभियंते लाडके यांच्याकडे सोपविण्यात आला. दोन्ही उपकेंद्रांचा कारभार सांभाळताना त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, अभियंते लाडके यांनी मार्च एंडिंगला वीजबिल वसुलीसाठी जितकी तत्परता दाखविली त्याच्या निम्मीही तत्परता सध्या ते दाखवित नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. परिणामी, येथील नागरिकांना वीज पुरवठ्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

सद्यस्थितीत विरली (बु.) उपकेंद्राचा कार्यभार सांभाळत असलेले अभियंता लाडके प्रत्यक्षात येथे न येता तिथूनच येथील कर्मचाऱ्यांना सूचना देऊन उंटावरून शेळ्या हाकत असल्याचे समजते. या परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले आहेत, त्यामुळे विद्युत तारा लोंबकळत असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तारांपर्यंत गेलेल्या झाडांच्या फांद्या फक्त काही समस्या निर्माण झाल्यानंतर कापल्या जातात. येथील अभियंत्यांच्या अशा हलगर्जीपणामुळेच बुधवारी दुपारी स्पार्किंगमुळे येथे दोन ठिकाणी तनसीच्या ढिगांना आग लागून चार शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

येथील प्रभारी अभियंते बऱ्याचदा कार्यालयात राहात नसल्याने विजेसंबंधी काही समस्या घेऊन महावितरण कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना हात हलवत परतावे लागते. त्यामुळे या उपकेंद्रात तातडीने कायमस्वरूपी अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी जनतेची मागणी आहे.