शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

४१ हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात

By admin | Updated: January 3, 2016 01:06 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ९१.८२ टक्के रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १२०.४१ टक्के लाखलाखोळी तर १३० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली.

वातावरण बदलाचा फटका रबीची पेरणी ९१ टक्के, यावर्षी तीळ, लाखोळीचा पेरा वाढलादेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात आतापर्यंत ९१.८२ टक्के रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १२०.४१ टक्के लाखलाखोळी तर १३० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली. १०२ टक्क्यामध्ये हरभरा तर ७६.१७ टक्क्यांमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे. मात्र वातावरण बदलामुळे ४१ हजार हेक्टरमधील रबी पीके धोक्यात आले असून शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे कोठाराला खिंंड पडली. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची आस रबी पिकावर आहे. वातावरण बदलाचा फटका बसत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. यावर्षी कृषी विभागाने ४५,११५ हेक्टर क्षेत्र रबी पिकांसाठी निर्धारित केले आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ९१.८२ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. ४१,४२४ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. आजपर्यंत गहू पिकाची ७६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. १० हजार ९९० हेक्टर क्षेत्र या पिकासाठी निर्धारित करण्यात आले. त्यापैकी ८,३७१ हेक्टर क्षेत्रात गहू, हरभरा ८,२३३.७० हेक्टर, लाखोळी ८,२३३, पोपट ८९५, वटाणा १,७३९, उडीद २,५६०, मुंग ३,०८६ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ६४.९४ आहे. जवस २,५१२, करडई ०.४०, मोहरी ७८, तीळ ३९ व इतर गळीत धान्य ४७.५० हेक्टर क्षेत्रामध्ये पीक लागवड करण्यात आली आहे. ज्वारी ४० हेक्टर, भाजीपाला २,२८९.४०, बटाटा १३४, मिरची ८६७ हेक्टर क्षेत्रामध्ये पीक लागवड करण्यात आली आहे. ही आकडेवारी ३० डिसेंबरची आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, भंडारा तालुक्यात रबी पिकासाठी ८,६३० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले. त्यापैकी ७,०९२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेली आहे. पवनी तालुक्यात ८,९८० हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी ११,५२८, मोहाडी ५,७४० पैकी ४,३०२, तुमसर ४,६३५ हेक्टर क्षेत्रापैकी ३,७६३ हेक्टर क्षेत्रामध्ये रबीची लागवड करण्यात आली. साकोली तालुक्यात ४,३३० हेक्टर क्षेत्रापैकी २,८४२, लाखांदूर तालुक्यात ८,४५० हेक्टर क्षेत्रापैकी ७,०७० हेक्टरमध्ये, लाखनी तालुक्यात ४,३५० हेक्टर क्षेत्रापैकी ४,८२६ हेक्टर क्षेत्रात रबीची लागवड करण्यात आली. एकाही ठिकाणी सुर्यफुलाची लागवड करण्यात आली नाही. महिनाभरापासून वातावरण बदल असल्याने खरीप हंगामाप्रमाणे रबी हंगामात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून पीके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभागाने धीर देऊन त्यांना उपाययोजना सुचविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.