शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

४१ हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात

By admin | Updated: January 3, 2016 01:06 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ९१.८२ टक्के रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १२०.४१ टक्के लाखलाखोळी तर १३० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली.

वातावरण बदलाचा फटका रबीची पेरणी ९१ टक्के, यावर्षी तीळ, लाखोळीचा पेरा वाढलादेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात आतापर्यंत ९१.८२ टक्के रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १२०.४१ टक्के लाखलाखोळी तर १३० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली. १०२ टक्क्यामध्ये हरभरा तर ७६.१७ टक्क्यांमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे. मात्र वातावरण बदलामुळे ४१ हजार हेक्टरमधील रबी पीके धोक्यात आले असून शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे कोठाराला खिंंड पडली. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची आस रबी पिकावर आहे. वातावरण बदलाचा फटका बसत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. यावर्षी कृषी विभागाने ४५,११५ हेक्टर क्षेत्र रबी पिकांसाठी निर्धारित केले आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ९१.८२ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. ४१,४२४ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. आजपर्यंत गहू पिकाची ७६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. १० हजार ९९० हेक्टर क्षेत्र या पिकासाठी निर्धारित करण्यात आले. त्यापैकी ८,३७१ हेक्टर क्षेत्रात गहू, हरभरा ८,२३३.७० हेक्टर, लाखोळी ८,२३३, पोपट ८९५, वटाणा १,७३९, उडीद २,५६०, मुंग ३,०८६ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ६४.९४ आहे. जवस २,५१२, करडई ०.४०, मोहरी ७८, तीळ ३९ व इतर गळीत धान्य ४७.५० हेक्टर क्षेत्रामध्ये पीक लागवड करण्यात आली आहे. ज्वारी ४० हेक्टर, भाजीपाला २,२८९.४०, बटाटा १३४, मिरची ८६७ हेक्टर क्षेत्रामध्ये पीक लागवड करण्यात आली आहे. ही आकडेवारी ३० डिसेंबरची आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, भंडारा तालुक्यात रबी पिकासाठी ८,६३० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले. त्यापैकी ७,०९२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेली आहे. पवनी तालुक्यात ८,९८० हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी ११,५२८, मोहाडी ५,७४० पैकी ४,३०२, तुमसर ४,६३५ हेक्टर क्षेत्रापैकी ३,७६३ हेक्टर क्षेत्रामध्ये रबीची लागवड करण्यात आली. साकोली तालुक्यात ४,३३० हेक्टर क्षेत्रापैकी २,८४२, लाखांदूर तालुक्यात ८,४५० हेक्टर क्षेत्रापैकी ७,०७० हेक्टरमध्ये, लाखनी तालुक्यात ४,३५० हेक्टर क्षेत्रापैकी ४,८२६ हेक्टर क्षेत्रात रबीची लागवड करण्यात आली. एकाही ठिकाणी सुर्यफुलाची लागवड करण्यात आली नाही. महिनाभरापासून वातावरण बदल असल्याने खरीप हंगामाप्रमाणे रबी हंगामात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून पीके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभागाने धीर देऊन त्यांना उपाययोजना सुचविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.