शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

४१ हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात

By admin | Updated: January 3, 2016 01:06 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ९१.८२ टक्के रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १२०.४१ टक्के लाखलाखोळी तर १३० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली.

वातावरण बदलाचा फटका रबीची पेरणी ९१ टक्के, यावर्षी तीळ, लाखोळीचा पेरा वाढलादेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात आतापर्यंत ९१.८२ टक्के रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १२०.४१ टक्के लाखलाखोळी तर १३० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली. १०२ टक्क्यामध्ये हरभरा तर ७६.१७ टक्क्यांमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे. मात्र वातावरण बदलामुळे ४१ हजार हेक्टरमधील रबी पीके धोक्यात आले असून शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे कोठाराला खिंंड पडली. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची आस रबी पिकावर आहे. वातावरण बदलाचा फटका बसत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. यावर्षी कृषी विभागाने ४५,११५ हेक्टर क्षेत्र रबी पिकांसाठी निर्धारित केले आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ९१.८२ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. ४१,४२४ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. आजपर्यंत गहू पिकाची ७६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. १० हजार ९९० हेक्टर क्षेत्र या पिकासाठी निर्धारित करण्यात आले. त्यापैकी ८,३७१ हेक्टर क्षेत्रात गहू, हरभरा ८,२३३.७० हेक्टर, लाखोळी ८,२३३, पोपट ८९५, वटाणा १,७३९, उडीद २,५६०, मुंग ३,०८६ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ६४.९४ आहे. जवस २,५१२, करडई ०.४०, मोहरी ७८, तीळ ३९ व इतर गळीत धान्य ४७.५० हेक्टर क्षेत्रामध्ये पीक लागवड करण्यात आली आहे. ज्वारी ४० हेक्टर, भाजीपाला २,२८९.४०, बटाटा १३४, मिरची ८६७ हेक्टर क्षेत्रामध्ये पीक लागवड करण्यात आली आहे. ही आकडेवारी ३० डिसेंबरची आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, भंडारा तालुक्यात रबी पिकासाठी ८,६३० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले. त्यापैकी ७,०९२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेली आहे. पवनी तालुक्यात ८,९८० हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी ११,५२८, मोहाडी ५,७४० पैकी ४,३०२, तुमसर ४,६३५ हेक्टर क्षेत्रापैकी ३,७६३ हेक्टर क्षेत्रामध्ये रबीची लागवड करण्यात आली. साकोली तालुक्यात ४,३३० हेक्टर क्षेत्रापैकी २,८४२, लाखांदूर तालुक्यात ८,४५० हेक्टर क्षेत्रापैकी ७,०७० हेक्टरमध्ये, लाखनी तालुक्यात ४,३५० हेक्टर क्षेत्रापैकी ४,८२६ हेक्टर क्षेत्रात रबीची लागवड करण्यात आली. एकाही ठिकाणी सुर्यफुलाची लागवड करण्यात आली नाही. महिनाभरापासून वातावरण बदल असल्याने खरीप हंगामाप्रमाणे रबी हंगामात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून पीके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभागाने धीर देऊन त्यांना उपाययोजना सुचविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.