शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका ठरली रोजगाराचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

चिखलीसह परिसरात आजही मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले जात. मात्र यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून मिरचीची रोपे आणावी लागत होती. ...

चिखलीसह परिसरात आजही मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले जात. मात्र यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून मिरचीची रोपे आणावी लागत होती. यासाठी अधिकचा खर्च मोजावा लागत होता. शिवाय रोपे दर्जेदार नसल्याने पाहिजे असलेले वाहन मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अल्प उत्पादन व्हायचे. मात्र कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांनी परिसरातील शेतकर्‍यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आपल्या रोपवाटिकेतून कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार त्यांना पाहिजे असलेल्या वाणाची रोपे देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी त्यांच्याकडे आतापर्यंत दोन लाख मिरची, वांगे रोपांची ऑर्डर बुक झाली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या वाणाच्या प्रजातींसह दर्जेदार रोपांची रोपवाटिकेत लागण केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लागवड आधुनिक पद्धतीने केली असून, एक एकरातील भाजीपाल्यातून त्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे. यासोबतच त्यांनी गावातील आठ महिलांसह दोन पुरुषांना कायमस्वरूपी रोजगार दिल्याने त्यांची भटकंती थांबली आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने कृषी विभागाची अहिल्यादेवी रोपवाटिका ही शेतकरी तानाजी गायधने यांच्यासह गावातील मजुरांना अर्थार्जनाचे साधन ठरली आहे. रोपवाटिकेसाठी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, शांतिलाल गायधने, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी सहायक रेणुका दराडे, खेमा टिचकुले, कृषीमित्र श्याम आकरे यांचे सहकार्य मिळाले आहे.

कोट

मी अर्ध्या एकरात कृषी विभागातर्फे अहिल्यादेवी रोपवाटिका उभारली आहे. या रोपवाटिकेतून शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मिरची व भाजीपाला, फळपिकांची रोपे देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे गावातील मजुरांना रोजगार मिळालाच; शिवाय शेतकऱ्यांकडून आतापर्यंत दोन लाख रोपांचे बुकिंगही झाले आहे.

तानाजी गायधने, कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी, चिखली

कोट

शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांसह फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे. त्यामुळे दूरवरून रोपे विकत आणण्यापेक्षा परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून भंडारा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना अहिल्यादेवी फळ रोपवाटिकेचा लाभ दिला आहे. त्यांना दर्जेदार रोपे निर्मितीसाठी सातत्याने भेटी देत मार्गदर्शन कृषी विभागातर्फे केले जात आहे.

अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा