शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका ठरली रोजगाराचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

चिखलीसह परिसरात आजही मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले जात. मात्र यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून मिरचीची रोपे आणावी लागत होती. ...

चिखलीसह परिसरात आजही मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले जात. मात्र यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून मिरचीची रोपे आणावी लागत होती. यासाठी अधिकचा खर्च मोजावा लागत होता. शिवाय रोपे दर्जेदार नसल्याने पाहिजे असलेले वाहन मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अल्प उत्पादन व्हायचे. मात्र कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांनी परिसरातील शेतकर्‍यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आपल्या रोपवाटिकेतून कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार त्यांना पाहिजे असलेल्या वाणाची रोपे देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी त्यांच्याकडे आतापर्यंत दोन लाख मिरची, वांगे रोपांची ऑर्डर बुक झाली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या वाणाच्या प्रजातींसह दर्जेदार रोपांची रोपवाटिकेत लागण केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लागवड आधुनिक पद्धतीने केली असून, एक एकरातील भाजीपाल्यातून त्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे. यासोबतच त्यांनी गावातील आठ महिलांसह दोन पुरुषांना कायमस्वरूपी रोजगार दिल्याने त्यांची भटकंती थांबली आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने कृषी विभागाची अहिल्यादेवी रोपवाटिका ही शेतकरी तानाजी गायधने यांच्यासह गावातील मजुरांना अर्थार्जनाचे साधन ठरली आहे. रोपवाटिकेसाठी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, शांतिलाल गायधने, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी सहायक रेणुका दराडे, खेमा टिचकुले, कृषीमित्र श्याम आकरे यांचे सहकार्य मिळाले आहे.

कोट

मी अर्ध्या एकरात कृषी विभागातर्फे अहिल्यादेवी रोपवाटिका उभारली आहे. या रोपवाटिकेतून शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मिरची व भाजीपाला, फळपिकांची रोपे देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे गावातील मजुरांना रोजगार मिळालाच; शिवाय शेतकऱ्यांकडून आतापर्यंत दोन लाख रोपांचे बुकिंगही झाले आहे.

तानाजी गायधने, कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी, चिखली

कोट

शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांसह फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे. त्यामुळे दूरवरून रोपे विकत आणण्यापेक्षा परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून भंडारा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना अहिल्यादेवी फळ रोपवाटिकेचा लाभ दिला आहे. त्यांना दर्जेदार रोपे निर्मितीसाठी सातत्याने भेटी देत मार्गदर्शन कृषी विभागातर्फे केले जात आहे.

अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा